Ayodhya Ram Mandir : जानेवारीत येणार श्री रामाची लाट!

जय श्रीराम! अयोध्येत रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा आणि देशात 'न भूतो न भविष्यती' राम महोत्सव होणार!


अयोध्या : अयोध्येत श्रीरामजन्मभूमी मंदिरात (Ayodhya Ram Mandir) रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापना जानेवारीत होणार आहे. यावेळी उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत आणि पूर्वेकडून पश्चिमेपर्यंत संपूर्ण देशभरात चहु दिशेला 'न भूतो न भविष्यती' असा जल्लोषात दिमाखदार राम महोत्सव सोहळा होणार आहे.


श्रीरामजन्मभूमी मंदिराच्या उभारणीसह रामलल्लाच्या अभिषेकाची जय्यत तयारी सुरू आहे. याबाबत श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या मंदिर बांधकाम समितीची काल बैठक झाली. त्यात १४ ते २६ जानेवारीदरम्यान शुभ मुहूर्तावरील हा विधी अभूतपूर्व आणि अविस्मरणीय करण्यावर चर्चा करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी २१ ते २५ जानेवारीस प्राणप्रतिष्ठा करतील. लोकसभा निवडणुकीपूर्वी होणारा हा कार्यक्रम स्वातंत्र्यदिनानंतरचा सर्वात मोठा उपक्रम ठरेल. नववर्ष प्रारंभापासून राम लहर देशभरात उत्तर ते दक्षिण आणि पूर्वेकडून पश्चिमेपर्यंत असेल.


बैठकीत रूपरेषा, भाविकांच्या सुविधांवर चर्चा झाली. सोहळ्यास आध्यात्मिक केंद्रांचे प्रतिनिधी, प्रमुख मठ, आश्रम, तीर्थक्षेत्र यांचे प्रतिनिधी, नामवंत व्यक्ती, शहिदांचे नातेवाईक येतील. बौद्ध, जैन, शीख पंथांच्या देवस्थानांना निमंत्रण असेल. सर्व मंदिरांमध्ये हनुमान चालिसा, रामचरित मानस पठण होईल. दिवाळीसारखे प्रत्येक घरासमोर किमान पाच दिवे लावले जातील. ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्यगोपाल दास म्हणाले, हा प्रसंग दुसऱ्या स्वातंत्र्य दिनासारखा आहे. ५०० वर्षांनंतर देव त्यांच्या जन्मभूमीत स्थापित होणार आहेत. यासाठी अयोध्येत ३२ हजार कोटींची विकासकामे सुरू आहेत.


सोबत श्री रामलल्लाची मूर्ती कर्नाटकातील दोन, राजस्थानमधील एका प्रकारच्या संगमरवरापासून बनवली जात आहे. गणेश एल भट्ट, कर्नाटकातील योगिराज आणि राजस्थानचे सत्यनारायण पांडे श्री रामलल्लाची बालरूपी मूर्ती बनवत आहेत. त्यांचे काम ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होणार आहे.


दरम्यान, प्राणप्रतिष्ठापना सोहळा निर्विघ्न होण्यासाठी ट्रस्टने आतापासूनच महापूजेला सुरुवात केली आहे. कर्नाटकातील पुरोहित चार वेद स्वाहाकार यज्ञ, श्रीमद भागवत पठण यज्ञ करत आहेत. महाराष्ट्रातील पुरोहित यज्ञ करत आहेत. अयोध्येतील स्थानिक ब्राह्मणही पूजा करत आहेत. इतर राज्यातील पुजारीही पूजेसाठी अयोध्येत येत आहेत. यामुळे हा महोत्सव डो्याचे पारणे फेडणारा असेल, अशी कार्यक्रमाची रूपरेषा या बैठकीत तयार करण्यात आली आहे. सर्वजण त्यादृष्टीने कामाला लागले आहेत.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

Indian Seafarers Missing : धक्कादायक! होर्मुझमध्ये व्यापारी जहाजावर इराणचा हल्ला; ११ भारतीयांपैकी एक खलाशी बेपत्ता, भारताचा तीव्र निषेध

नवी दिल्ली : ओमानच्या किनाऱ्याजवळ होर्मुझ सामुद्रधुनीत सायप्रसच्या ध्वजाखालील 'जीएफएस गॅलेक्सी' या व्यापारी

House Aesthetic : कमी बजेटमध्ये घराला द्या स्टायलिश लूक!

कमी बजेटमध्ये घर सजवायचंय? https://prahaar.in/2026/07/11/upvas-food-bored-of-sabudana-khichdi-during-fasting-then-definitely-try-this-delicious-and-healthy-dishes/ या सोप्या (Simple)

Bay of Bengal : बंगालच्या उपसागरात रिश्टर स्केलवर ४.५ तीव्रतेचा भूकंप; विशाखापट्टणमपर्यंत जाणवले धक्के

नवी दिल्ली : आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यापासून दूर बंगालच्या उपसागरात रविवारी पहाटे ४.५ रिश्टर तीव्रतेचा सौम्य

Indian Railways : लोणावळा - कर्जत मार्गावर दरड कोसळल्यामुळे दिनांक १७ जुलै २०२६ पर्यंत काही गाड्यांच्या मार्गात बदल

लोणावळा - कर्जत मार्गावर दरड कोसळल्यामुळे दिनांक १७ जुलै २०२६ पर्यंत काही गाड्या शॉर्ट टर्मिनेट/ शॉर्ट ओरीजनेट/

Traffic Congestion : वाहतूक कोंडीचा अर्थव्यवस्थेला फटका;चार शहरांना दरवर्षी ₹१.४७ लाख कोटींचे नुकसान

नवी दिल्ली: देशातील प्रमुख महानगरांमधील वाढती वाहतूक कोंडी ही केवळ नागरिकांच्या गैरसोयीचा विषय राहिलेली नसून,

Heatwave in India : उष्णतेच्या विळख्यात भारतातील १४ शहरे

जागतिक धोकादायक ५० शहरांच्या यादीत पुणे, नागपूरचा समावेश; अहमदाबाद दुसऱ्या क्रमांकावर नवी दिल्ली : शहरातील सतत