Australia Vs England: ऑसींच्या गोलंदाजीपुढे इंग्लडची घसरगुंडी

लॉर्ड्स (वृत्तसंस्था) : ॲशेस मालिकेतील दुसऱ्या सामन्याचा तिसरा दिवस ऑस्ट्रेलियाच्या (Australia) गोलंदाजांनी गाजवला. मिचेल स्टार्कने इंग्लंडच्या (England) तीन फलंदाजांना माघारी धाडले. तर अन्य गोलंदाजांनीही दमदार गोलंदाजी करत इंग्लंडला मोठी धावसंख्या करण्यापासून रोखले. इंग्लंडचा डाव ३२५ धावांवर सर्वबाद झाला. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा ऑस्ट्रेलियाने बिनबाद ४७ धावा केल्या होत्या.


तिसऱ्या दिवशी २७८ धावांवर ४ फलंदाज बाद असे खेळायला आलेल्या इंग्लंडच्या संघाला ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी एकामागोमाग एक धक्के दिले. त्यामुळे यजमानांचा डाव अवघ्या ३२५ धावांवर आटोपला. इंग्लंड पहिल्या डावात मोठी धावसंख्या उभारेल अशी अपेक्षा होती. परंतु कांगारूंच्या गोलंदाजांनी त्यांचे मनसुबे धुळीस मिळवले. मिचेल स्टार्कने संघातर्फे सर्वाधिक ३ विकेट मिळवले. हेझलवूड आणि हेड यांनी प्रत्येकी २ फलंदाजांना माघारी धाडले. कमिन्स, लायन आणि ग्रीन यांनी प्रत्येकी एक विकेट मिळवली.


शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा ऑस्ट्रेलियाचा संघ दुसऱ्या डावात फलंदाजीला आला होता. त्यांनी २० षटकांत नाबाद ४७ धावा केल्या होत्या. उस्मान ख्वाजा ३१, तर डेविड वॉर्नर १५ धावांवर खेळत आहे. दुसऱ्या दिवशी इंग्लंडच्या फलंदाजांनी चांगली कामगिरी केली होती. परंतु तिसरा दिवसाची सुरुवात त्यांच्यासाठी खराब झाली.

Comments
Add Comment

राष्ट्रध्वजाचा अपमान टाळण्यासाठी विराट कोहलीने केलेल्या कृतीचे अनेकांनी केले कौतुक

सिडनी : रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या जबरदस्त बॅटिंग भारतानं ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात

ऑस्ट्रेलियात पॅरा बॅडमिंटनमध्ये भारताला ११ पदके

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया पॅरा बॅडमिंटन इंटरनॅशनल २०२५ मध्ये भारतीय पॅरा-बॅडमिंटन खेळाडूंनी शानदार कामगिरी करत

उपांत्य फेरीत भारतीय संघ खेळणार 'या' संघाविरूद्ध!

मुंबई: महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ अखेरच्या टप्प्यात येऊन पोहोचला असून उपांत्य फेरीची उत्सुकता क्रिकेट

'रो-को'ने ऑस्ट्रेलियाचा विजयरथ रोखला, रोहितचे शतक आणि विराटचे अर्धशतक; 'रो-को'ची ऐतिहासिक कामगिरी

सिडनी : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सिडनीच्या मैदानावर रंगलेला एकदिवसीय सामना भारताने नऊ गडी राखून जिंकला.

“विकसित भारत चॅलेंज ट्रॅक” मुंबईत युवा महोत्सव २७ ऑक्टोबरला

मुंबई : युवकांचा सर्वांगीण विकास, भारतीय संस्कृती आणि परंपरेचे जतन, सुप्त गुणांना प्रोत्साहन तसेच राष्ट्रीय

तिसऱ्या युथ आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला सुवर्ण

मुंबई : बहरीनमधील मनामा येथे आशियाई युवा क्रीडा स्पर्धा २०२५ मध्ये भारताने कबड्डीमध्ये पूर्ण विजय मिळवत सुवर्ण