Eid mubarak : राज्यात आज बकरी ईदला कुर्बानी नाही!

आषाढी एकादशी व बकरी ईद एकाच दिवशी आल्याने मुस्लिम बांधवांनी घेतला सामाजिक सलोखा कायम राखण्यासाठी पुढाकार


मुंबई : आज आषाढी एकादशी (Aashadhi Ekadashi) निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रातील वातावरण विठुमय झाले आहे. याच दिवशी बकरी ईदसुद्धा (Bakari Eid) साजरी केली जाणार आहे. मात्र बकरी ईदला दिली जाणारी कुर्बानी त्या दिवशी न देता दुसऱ्या दिवशी देण्याचा आदर्श निर्णय राज्यातील मुस्लीम बांधवांनी घेतला आहे. तर जळगावच्या अमळनेर शहरात तर यंदा कुर्बानीच दिली जाणारा नसल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुस्लीम बांधवांकडून घेण्यात आला आहे.


सोशल मीडियावरील वादग्रस्त मेसेजच्या कारणावरून राज्यात काही समाजकंटक तणाव निर्माण करत असताना दुसरीकडे राज्यभरातील अनेक गावांमधील हिंदू-मुस्लिम बांधवांनी सामाजिक सलोखा कायम राहण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यंदा आषाढी एकादशी व बकरी ईदचा सण २९ जून या एकाच दिवशी आला आहे. त्यामुळे या दिवशी कुर्बानी न देण्याचा निर्णय महाराष्ट्रातील अनेक गावातील मुस्लिम बांधवांनी घेऊन एक आदर्श निर्माण केला आहे. त्याऐवजी ३० जून रोजी कुर्बानी देण्यात येईल, असे शांतता समितीच्या बैठकीतून जाहीर केले जात आहे.



हे पण वाचा - Eid Mubarak : यंदा बकरी ईदला कुर्बानी देणार नाही!


‘एकादशीच्या दिवशी उपवास करून सर्वांना सुखी ठेवण्याची प्रार्थना केली जाते. बकरी ईदलाही आपण पैगंबरांजवळ हीच मागणी करतो. मग या दिवशी पशुहत्या करीत आपण काय साध्य करतो? यंदा एकादशी आणि बकरी ईद एकत्र आल्याने या दिवशी पशुहत्या टाळणे गरजेचे आहे,’ असे मत नगर जिल्ह्यातील निघोज येथे झालेल्या शांता समितीच्या बैठकीत डॉ. रफिक सय्यद यांनी व्यक्त केले. त्याला सर्व गावकऱ्यांनी एकमुखाने पाठिंबा दिल्याने या गावांचेही कौतुक होत आहे.


नगर जिल्ह्यातील नेवासे, घोडेगाव, शेवगाव, श्रीगोंदे तालुक्यातील बेलवंडी, विसापूर, मढेवडगाव, श्रीरामपूर, बेलापूर, जामखेड आदी गावातील मुस्लिम बांधवांनीही असाच निर्णय घेतला आहे. आषाढी वारीच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रासह शेजारी राज्यातील वारकरी मोठ्या संख्येने पंढरपूर शहर व सोलापूर जिल्ह्यात दाखल झाले आहेत. त्यामुळे पंढरपूर तालुक्यातील १०० गावे, मंगळवेढा तालुक्यातील ८१ गावे व करमाळा, वैराग या शहरांनीही शुक्रवारी कुर्बानी देण्याचे ठरवले आहे.


मराठवाड्यातील २१८, तर विदर्भातील ८० गावे


मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, धाराशिव जिल्ह्यातील २१८ गावांतील मुस्लिम बांधवांनीही बुधवारी कुर्बानी न देण्याचा एकमुखी ठराव केला. विदर्भातील बुलडाणा जिल्ह्यात ३३ गावे, यवतमाळचे चार तालुके, वाशिमच्या ४७ गावांनीही हा आदर्श कायम ठेवला आहे. त्याचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगरच्या जवळच्या असलेल्या छोट्या पंढरपूरच्या आसपासच्या गावांनी असाच निर्णय घेतला होता. या निर्णयाचे कौतुक झाले होते.


 
Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

Agriculture Minister Dattatray Bharne : शेतकरी कर्जमाफी योजनेची १० दिवसांत अंमलबजावणी - कृषिमंत्री दत्तात्रय भरणे

- ५६ लाख शेतकऱ्यांना लाभ, राज्याच्या तिजोरीवर ३६ हजार कोटी रुपयांचा भार पडणार मुंबई : सततचा अवकाळी पाऊस, दुष्काळ,

Pune-Miraj Railway 21 Days Block : रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी! पुणे-मिरज मार्गावर २१ दिवसांचा मेगा ब्लॉक; अनेक गाड्या रद्द

- जाणून घ्या वेळापत्रकातले मोठे बदल पुणे : पुणे-मिरज रेल्वे मार्गावरील दुहेरीकरणाचे काम आणि नीरा यार्डच्या

Jalgaon Accident : जळगावात भीषण अपघात! देवदर्शनावरून परतणाऱ्या भाविकांच्या वाहनाला धडक; दोन महिलांचा मृत्यू

जळगाव : जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात रविवारी एक भीषण अपघात झाला. देवदर्शन करून परतणाऱ्या भाविकांच्या

Satara Suicide : WhatsApp स्टेटसमुळे वाचले महिला पोलिसाचे प्राण; नेमकं काय घडलं?

Rajendra Jain : मंत्री भुजबळांचे आशीर्वाद घेत राजेंद्र जैन यांच्याकडून राज्यसभेसाठी अर्ज दाखल

मुंबई : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार  (Sunetra Pawar) यांनी विधानसभा पोटनिवडणुकीत विजय मिळवल्यानंतर राज्यसभेच्या

KIDNAPPING : विवाहित महिलेशी संभाषणाच्या संशयातून तरुणाचे अपहरण; पोलिसांनी फिल्मी स्टाईलने केली सुटका

BARAMATI: बारामती तालुक्यातील सुपा परिसरातून एका तरुणाचे अपहरण झाल्याची खळबळजनक घटना शनिवारी रात्री उघडकीस आली.