Rain in Maharashtra: पाऊस आला पण शेतकऱ्यावर संकट! प्रशासनाला विशेष आदेश

मुंबई: राज्यात पाऊस (Rain) काही ठिकाणी दडी मारण्याची शक्यता असल्याने अनेक ठिकाणी दुबार पेरणी करावी लागण्याची शक्यता आहे. यासंदर्भात मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली. राज्यातील शेतकऱ्यांना (Farmer) जर दुबार पेरणी करावी लागली तर बी बियाणं तयार ठेवण्याचे आदेशही मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रशासनाला देण्यात आलेले आहेत. जुलैच्या पहिल्या आठवड्यात पाऊस काही दिवस तरी दडी मारण्याची शक्यता आहे. विशेषत: मराठवाड्यामध्ये दुबार पेरणी करावी लागण्याची शक्यता मंत्रिमंडळ बैठकीत वर्तवण्यात आली  आहे.



राज्यभरामध्ये काय आहे पावसाची परिस्थिती आणि किती झाली पेरणी?


राज्यात १ जून ते २१ जून या कालावधीत १६.७ मिलिमीटर पाऊस पडला आहे. सरासरीच्या ११.५ टक्के इतक्या पावसाची नोंद झाली आहे. राज्यात खरीप पिकाचे सरासरी क्षेत्र (ऊस वगळून ) १४२.०२ लाख हेक्टर असून २१ जूनपर्यंत या वरती १.९८ लाख हेक्टर (१.३९ टक्के) क्षेत्रावर ती पेरणी झालेली आहे. तर, राज्यात खरीप पिकांचे (ऊस पिकासह ) सरासरी क्षेत्र १५२. ९७ लाख हेक्टर असून १.९८ लाख हेक्टर क्षेत्रावर म्हणजेच १.३० टक्के पेरणी झालेली आहे.



कोणत्या विभागात किती पेरणी झालेली आहे (२१ जूनपर्यंतची आकडेवारी)



  • कोकण विभाग


कोकण विभागात खरीप पिकाखाली सरासरी क्षेत्र ४.१४ लाख हेक्टर असून ०.४२ लाख हेक्टर क्षेत्रावर (१०.६ टक्के) पेरणी झाली आहे.




  • नाशिक विभाग


नाशिक विभागात खरीप पिकाखाली सरासरी क्षेत्र २०.६५ लाख हेक्टर असून १.०८ लाख हेक्टरक्षेत्रावर ५.२३ टक्के पेरणी झालेली आहे. नाशिक विभागात बागायती क्षेत्रात कापूस, तांदूळ, मका पिकांच्या पेरणीची काम सुरू आहेत. मात्र बहुतांश ठिकाणी पावसाभावी पेरण्याची कामे खोळंबली आहेत




  • पुणे विभाग


पुणे विभागात खरीप पिकाखाली सरासरी क्षेत्र 10.65 लाख हेक्टर असून 324 हेक्टर क्षेत्रावर ती पेरणी झालेली आहे.
Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

Comments
Add Comment

अनिल अंबानींचे मुंबईतील करोडो रुपयांचे निवासस्थान ईडीकडून जप्त

मुंबई : रिलायन्स अनिल धीरूभाई अंबानी ग्रुपचे (रिलायन्स एडीए ग्रुप) चेअरमन अनिल अंबानी यांचे "अ‍ॅबोड" निवासस्थान

सिंधुदुर्ग किनारपट्टी सुरक्षेसाठी सीसीटीव्ही प्रकल्पाची तातडीने अंमलबजावणी करा - मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्ग, आचरा, निवती, वेंगुर्ला, मालवण आणि देवगड पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील

दक्षिण मुंबईतील बेलासीस पुलाला अहिल्यादेवी होळकर यांचे नाव; मंगलप्रभात लोढा यांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार

कॅबिनेट मंत्री श्री. मंगलप्रभात लोढा यांनी मानले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे आभार ब्रिटिशांच्या

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विधानभवन येथे "जावे विनोदाच्या गावा" या कार्यक्रमाचे विशेष आयोजन

श्रेष्ठ लेखकांच्या साहित्यकृतींचे अभिवाचन "लोकसेवेचा लोकजागर" ग्रंथाचे प्रकाशन मुंबई : महाराष्ट्र

मुंबई महापालिकेचा महसूल वाढवण्यासाठी प्रशासनाचा पुढाकार

ग्रीन ब्राँड्ससह सदनिकांची विक्री, करमणूक शुल्क, भूखंडाचा लिलावातून वाढवणार महसूलाची रक्कम मुंबई (विशेष

'मराठी भाषा गौरव दिन' आणि 'मराठी राजभाषा दिन' यात फरक काय ?

मुंबई : दरवर्षी २७ फेब्रुवारी रोजी 'मराठी भाषा गौरव दिन' आणि १ मे रोजी 'मराठी राजभाषा दिन' साजरा करतात. ज्येष्ठ कवी