Rain in Maharashtra: पाऊस आला पण शेतकऱ्यावर संकट! प्रशासनाला विशेष आदेश

मुंबई: राज्यात पाऊस (Rain) काही ठिकाणी दडी मारण्याची शक्यता असल्याने अनेक ठिकाणी दुबार पेरणी करावी लागण्याची शक्यता आहे. यासंदर्भात मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली. राज्यातील शेतकऱ्यांना (Farmer) जर दुबार पेरणी करावी लागली तर बी बियाणं तयार ठेवण्याचे आदेशही मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रशासनाला देण्यात आलेले आहेत. जुलैच्या पहिल्या आठवड्यात पाऊस काही दिवस तरी दडी मारण्याची शक्यता आहे. विशेषत: मराठवाड्यामध्ये दुबार पेरणी करावी लागण्याची शक्यता मंत्रिमंडळ बैठकीत वर्तवण्यात आली  आहे.



राज्यभरामध्ये काय आहे पावसाची परिस्थिती आणि किती झाली पेरणी?


राज्यात १ जून ते २१ जून या कालावधीत १६.७ मिलिमीटर पाऊस पडला आहे. सरासरीच्या ११.५ टक्के इतक्या पावसाची नोंद झाली आहे. राज्यात खरीप पिकाचे सरासरी क्षेत्र (ऊस वगळून ) १४२.०२ लाख हेक्टर असून २१ जूनपर्यंत या वरती १.९८ लाख हेक्टर (१.३९ टक्के) क्षेत्रावर ती पेरणी झालेली आहे. तर, राज्यात खरीप पिकांचे (ऊस पिकासह ) सरासरी क्षेत्र १५२. ९७ लाख हेक्टर असून १.९८ लाख हेक्टर क्षेत्रावर म्हणजेच १.३० टक्के पेरणी झालेली आहे.



कोणत्या विभागात किती पेरणी झालेली आहे (२१ जूनपर्यंतची आकडेवारी)



  • कोकण विभाग


कोकण विभागात खरीप पिकाखाली सरासरी क्षेत्र ४.१४ लाख हेक्टर असून ०.४२ लाख हेक्टर क्षेत्रावर (१०.६ टक्के) पेरणी झाली आहे.




  • नाशिक विभाग


नाशिक विभागात खरीप पिकाखाली सरासरी क्षेत्र २०.६५ लाख हेक्टर असून १.०८ लाख हेक्टरक्षेत्रावर ५.२३ टक्के पेरणी झालेली आहे. नाशिक विभागात बागायती क्षेत्रात कापूस, तांदूळ, मका पिकांच्या पेरणीची काम सुरू आहेत. मात्र बहुतांश ठिकाणी पावसाभावी पेरण्याची कामे खोळंबली आहेत




  • पुणे विभाग


पुणे विभागात खरीप पिकाखाली सरासरी क्षेत्र 10.65 लाख हेक्टर असून 324 हेक्टर क्षेत्रावर ती पेरणी झालेली आहे.
Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

Comments
Add Comment

मुंबईतील २५२ कोटींच्या एमडी ड्रग्ज प्रकरणात मोठा खुलासा: सलीम शेखच्या कबुलीजबाबाने खळबळ

मुंबई : देशभरात खळबळ माजवणाऱ्या २५२ कोटी रुपयांच्या मेफेड्रोन (एमडी) प्रकरणात पोलिसांना आणखी एक मोठा धागा मिळाला

घाटकोपरमध्ये रस्ता रुंदीकरणातील अडथळा झाला दूर

बाधित २४ बांधकामांवर झाली अखेर कारवाई मुंबई (खास प्रतिनिधी) : घाटकोपर येथील झुणझुणवाला महाविद्यालय ते

उत्तर पश्चिम जिल्ह्यात महायुतीचे ३२ ते ३३ नगरसेवक निवडून आणणार

भाजपा जिल्हाध्यक्ष अॅड ज्ञानमूर्ती शर्मा यांनी व्यक्त केला विश्वास मुंबई (सचिन धानजी) : उत्तर पश्चिम लोकसभा

लाडकी बहीण योजनेची वेबसाईट होत आहे अपग्रेड

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महायुती सरकारची सर्वाधिक लोकप्रिय योजना आहे. या योजनेचा सोळावा

दहिसरच्या राजकारणात उलथापालथ, वॉर्ड क्रमांक १ घोसाळकर कुटुंबाच्या आवाक्याबाहेर!

मुंबई : मुंबई महानगरपालिकेची निवडणूक अद्याप जाहीर झालेली नाही. पण राजकारणात हालचाली सुरू झाल्या आहेत. दहिसरमधील

शीतल म्हात्रे यांचा मोठा निर्णय : महापालिका निवडणूक लढवणार नाही, आमदारकीवर लक्ष केंद्रित!

मुंबई : शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे मुंबईच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरल्या आहेत.