Pune Police : कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नावर पुणे पोलिसांचं महत्त्वाचं पाऊल

कोयता हल्ला प्रकरणी तीन पोलीस कर्मचार्‍यांच्या निलंबनासोबतच आणखी काही महत्त्वाचे निर्णय


पुणे : शांत, सुसंस्कृत आणि विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्यातून सध्या एकापेक्षा एक विकृत, क्रूर अशा गुन्हेगारीच्या घटना घडत आहेत. दर्शना पवार हत्या प्रकरण (Darshana Pawar), एकतर्फी प्रेमातून तरुणीवर कोयत्याने केलेला वार, पुण्यातील कोयता गँगची (Koyta gang) दहशत यामुळे संपूर्ण पुणे हादरलं आहे. पुण्यात शिक्षणासाठी मुलांना पाठवायचे की नाही याबाबत पालकवर्ग चिंताग्रस्त आहे. पुणे सुरक्षेच्या बाबतीत उणे आहे, असा ठपका लगावला जात आहे. त्याचबरोबर पुणे पोलीस (Pune Police) नक्की करतायत काय? गुन्हेगारांना पोलिसांचा वचक आहे की नाही असे सवाल उपस्थित होत आहेत. याच पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी एक महत्त्वाचं पाऊल उचललं आहे.



पुणे पोलीस प्रशासनाने घेतलेल्या निर्णयानुसार पुढील बाबी करण्यात येणार आहेत -

१. पुणे महिला पोलिसांची २५ दामिनी पथकं तयार करण्यात येतील, त्यामुळे दामीनी पथकांचा आकडा ४० वर जाणार आहे.
२. बीट मार्शलमध्ये नव्या १०० जणांचा समावेश करण्यात येणार आहे. त्यामुळे एकूण २०० बीट मार्शलद्वारे पुण्यात पेट्रोलिंग होणार आहे.
३. पोलिसांकडून शहरातील महाविद्यालयांमध्ये समुपदेशन कार्यक्रम राबवण्यात येणार आहेत.
४. पुण्यातील प्रत्येक पोलीस चौकी २४ तास सुरु राहणार आहे.



पुण्यातील कोयता हल्ला प्रकरणी तीन पोलीस कर्मचारी निलंबित

पुण्यातील सदाशिव पेठेत कोयता हल्ल्याच्या वेळी हाकेच्या अंतरावर असलेल्या पेरुगेट पोलीस चौकीत एकही पोलीस कर्मचारी उपस्थितीत नव्हता. तसंच बीट मार्शल यांनी देखील घटनास्थळी यायला २० मिनिटं लावली. त्यामुळे पुण्यातील कायदा व सुव्यवस्थेवर बोट ठेवले जात असतानाच विश्रामबाग पोलीस ठाण्याअंतर्गत पेरुगेट चौकीतील पोलीस हवालदारासह तीन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. पोलीस हवालदार सुनील शांताराम ताठे, पोलीस कर्मचारी प्रशांत प्रकाश जगदाळे आणि सागर नामदेव राणे अशी निलंबित करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत. या तीन पोलीस कर्मचाऱ्यांवर कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवण्यात आला.



तरुणवर्गाचं म्हणणं काय?

दरम्यान, 'प्रेम करताय तर नकार पचवण्याची ताकद असली पाहिजे', 'अधिकारी मुलींच्या बाबतीत हे तर सर्वसामान्य मुलींचं काय?' अशा प्रतिक्रिया तरुणवर्गातून उमटत आहेत.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

Ketan Agrawal Murder Case : ...अखेर खेळ उलटला! केतन अग्रवाल हत्या प्रकरणात सिया-चेतनला दिलासा, कोर्टाने मागणी फेटाळली

सिया चेतनला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी, पोलिसांची मागणी फेटाळली पुणे : केतन अग्रवाल हत्या (Ketan Agrawal Murder Case) प्रकरणात

Flyover accident : छावणी उड्डाणपुलावर बसचा भीषण अपघात ; ३५ प्रवासी जखमी

Chhatrapati Sambhaji Nagar : छत्रपती संभाजीनगर ते वाळूज मार्गावरील छावणी उड्डाणपुलावर रात्री ११.३० वाजता एका खासगी कंपनीच्या

Chandrashekhar Bawankule : माथेरान पर्यटकांसाठी आनंदाची बातमी; दस्तुरी येथे 22 हजार चौ.मी. जागेवर होणार नवे वाहनतळ, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय

मुंबई : माथेरानला भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. दस्तुरी येथे

Satara Loan Scam : महाबळेश्वरवाडी सोसायटीतील कथित कर्ज गैरव्यवहाराची आठवड्याभरात चौकशी; विधान परिषदेत गृहराज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांच आश्वासन

मुंबई : सातारा (Satara) जिल्ह्यातील माण तालुक्यातील महाबळेश्वरवाडी येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीत झालेला

मुंबई आणि आसपासच्या शहरांमध्ये तसेच कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज, ४ ते ६ जुलैसाठी मुसळधार पावसाचा अलर्ट

मुंबई(Mumbai)  : मुंबई शहरासह रायगड, ठाणे, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये 4 ते 6 जुलै दरम्यान मुसळधार

Pavana Dam : पवना बंद जलवाहिनी प्रकल्पाचा मार्ग मोकळा; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय

१५ वर्षांच्या प्रतीक्षेला अखेर पूर्णविराम मिळणार- अण्णा बनसोडे-विधानसभा उपाध्यक्ष मुंबई, दि. ३ जुलै :