India vs Pakistan match : भाजप आणि शिवसेनेची भूमिका काय? हिंदुत्व सोडलेल्या उबाठा यांना विचारत नाही

भारतात होणा-या भारत-पाकिस्तान सामन्याविरुद्ध संदीप देशपांडेंची खोचक टीका


मुंबई : यंदा भारताकडे यजमानपद असलेला क्रिकेट वर्ल्डकपचा (Crickert World cup) सामना ऑक्टोबर महिन्यात रंगणार आहे. विशेष बाब म्हणजे आयसीसीने (ICC) जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार १५ ऑक्टोबर रोजी भारत-पाकिस्तान सामना (India vs Pakistan match) हा अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये (Narendra Modi Stadium) असणार आहे. याच बाबीवरुन आता राजकारण रंगत आहे. या पाकिस्तानसोबतच्या सामन्याला विरोध करण्यात येत आहे, ज्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचाही (MNS) समावेश आहे.


मनसेचे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी ट्विट करत याबाबत आपली भूमिका मांडली. "भारत विरुद्ध पाकिस्तान सामना भारतात होणं हे अजिबात पटणारं नाही. बाळासाहेब ठाकरे यांनाही कदापि पटलं नसतं," असं संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे. तसंच याबाबत भाजप आणि शिवसेनेची भूमिका काय असा सवालही त्यांनी विचारला आहे. यावेळेस उद्धव ठाकरेंवर मात्र निशाणा साधत 'उ बा ठा यांना विचारत नाही आहे कारण त्यांनी हिंदुत्व सोडलं आहे' अशी खोचक टीका त्यांनी केली.





नेमका वाद कशामुळे ?

या वादाचे मुख्य कारण म्हणजे बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते की, पाकिस्तानच्या संघाने भारतात येऊन खेळू नये. या गोष्टीला त्यांचा विरोध होता. त्यामुळे हिंदुत्वाचा मुद्दा अग्रस्थानी ठेवून सत्तेवर आलेले आणि बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांनी प्रेरित असलेले राज्याचे सद्यकालीन मुख्यमंत्री यावर काय भूमिका घेतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. सोबतच ठाकरे गटदेखील बाळासाहेबांच्या विचारांशी किती एकनिष्ठ आहे, हे यातून दिसेल.


दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे सुपुत्र जय शाह हे बीसीसीआयचे सचिव आहेत, तर आशिष शेलार हे खजिनदार आहेत. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आयसीसी (ICC) आणि बीसीसीआयकडे (BCCI) भारताविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या सामन्याचे ठिकाण बदलण्याची मागणी केली होती, मात्र ती विनंती फेटाळून लावण्यात आली होती. त्यामुळे बाळासाहेबांना मानणा-या दोन्ही गटांचं यावर काय म्हणणं आहे, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

EL Nino : 'अल निनो'मुळे दुष्काळाचा धोका ? पाणी जपून वापरण्याचे हवामान खात्याचे आवाहन

मुंबई : भारतीय हवामान विभागाने व्‍यक्‍त केलेल्‍या अंदाजानुसार यावर्षी एल निनो परिस्थितीचा प्रभाव राहण्‍याची

Pranit More - Sejal Pawar Controversy : वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी MBBS ची विद्यार्थिनी सेजल पवार सक्तीच्या रजेवर, चौकशी सुरू - माहिती

मुंबई : स्टॅन्ड अप कॉमेडियन प्रणित मोरेच्या कार्यक्रमाचा एक वादग्रस्त व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

Sheetal Mhatre : सिद्धिविनायक मंदिराच्या पुनर्विकासात देऊबाई पाटील यांच्या स्मृती जपण्याची मागणी

शिवसेना उपनेत्या, प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांची मागणी न्यासाचे अध्यक्ष सदा सरवणकर यांच्याकडे पत्राद्वारे

Ashish Shelar : आपत्कालीन परिस्थितीचा इंटिग्रेटेड प्लँन करा

मुंबई उपनगर पालकमंत्री अँड आशिष शेलार यांची रेल्वे, महापालिका, बेस्टला सूचना मुंबई, पावसाळ्यात पूर परिस्थितीचे

Stand-up comedian Pranit More controversy : प्रणित मोरेच्या सर्व व्हिडिओंची सखोल तपासणी होणार

 गृह राज्यमंत्री पंकज भोयर; गृह विभागाकडून सायबर पोलिसांना आदेश जारी मुंबई : अश्लील आणि विकृत विनोदांमुळे

Bhandup News : भांडुपमध्ये फेरीवाल्यांचा वाद चिघळला; ज्येष्ठ नागरिकाला मारहाण? पोलिसांची कारवाई

भांडुप : भांडुपमधील शक्तीधाम मंदिर (Shaktidham Temple) परिसरात एका ज्येष्ठ नागरिकाला (Senior Citizen) झालेल्या कथित मारहाणीनंतर