Ed Raid: ५०० कोटींच्या भ्रष्टाचारप्रकरणातील त्या अधिकाऱ्याला ५ दिवसांची ईडी कोठडी

मुंबई: भ्रष्टाचार प्रकरणी ईडीकडून अटक करण्यात आलेले वरिष्ठ आयआरएस अधिकारी (Senior IRS Officer) सचिन सावंत (Sachin Sawant) यांना ५ जुलैपर्यंत ईडी कोठडी (ED Custody) सुनावण्यात आली आहे. आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. दरम्यान, सचिन सावंत हे माजी ईडी अधिकारी (Former ED Employee) आहेत. एका हिरे व्यापाऱ्यांकडून ५०० कोटींहून अधिक रक्कम बेकायदेशीरपणे वळवणं आणि हस्तांतरित केल्याचा सावंत यांच्यावर आरोप आहे. याप्रकरणात त्यांचा सहभाग असल्याचे पुरावे ईडीच्या हाती लागले आहेत.


सीमाशुल्क आणि अप्रत्यक्ष कर विभागात कार्यरत असलेल्या सचिन सावंत (Former ED Employee Sachin Sawant) यांच्या मुंबईतील (Mumbai News) निवासस्थानावर ईडीकडून मंगळवारी छापा टाकण्यात आला. भ्रष्टाचार आणि बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी ही कारवाई करण्यात आली. काल मध्यरात्रीपर्यंत सावंत यांच्या घरी ईडीचा तपास सुरू होता. 500 कोटी रुपये बेकायदेशीररित्या वळवल्याच्या एका प्रकरणातील आरोपीनं सावंत यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यावरून सीबीआयनं (CBI) एफआयआर (FIR) दाखल केली. आणि याच प्रकरणी काल ईडीनं (ED) छापेमारी केली होती.

Comments
Add Comment

शाई पुसून पुन्हा मतदान करणे शक्य नाही!

राज्य निवडणूक आयुक्तांचे स्पष्टीकरण; मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न मुंबई : महापालिका

Ashish Shelar : मेंदूत केमिकल लोचा अन् हातावर...'रडके' म्हणत आशिष शेलारांनी ठाकरे बंधूना काढला चिमटा

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज उत्साहात मतदान पार पडत असतानाच, शाईच्या

मतदानानंतर बोटावर शाई का लावली जाते? हात किंवा बोट नसल्यास काय असते नियम?

मुंबई : राज्यातील अनेक महापालिकांमध्ये आज मतदान प्रक्रिया सुरू असून नागरिक उत्साहाने आपला मतदानाचा हक्क बजावत

'मशिदीवर पुन्हा भोंगे लावण्याचे उबाठाचे वचन'

मुंबई :मशिदीवरील भोंगे पुन्हा लावण्याचे वचन देत उद्धव ठाकरेंनी निवडणूक प्रचार केला, असा गंभीर आरोप मुख्यमंत्री

मुंबईत दुपारी दीड वाजेपर्यंत २९.९६ टक्के मतदान

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांसाठी मतदान सुरू आहे.

मुंबईच्या इस्लामीकरणाचे षडयंत्र ‘टीस’च्या अहवालातून उघड

मुंबई  : २०५१ पर्यंत मुंबईतील हिंदू लोकसंख्या केवळ ५४ टक्के उरेल, अशी धक्कादायक माहिती देशातील अग्रगण्य टाटा