Water Cut in Mumbai : मुंबईत १ जुलैपासून १० टक्के पाणीकपात!

तलावात फक्त सात टक्के पाणीसाठा शिल्लक


मुंबई : गेल्या चार दिवसांपासून मुंबईत मुसळधार पाऊस कोसळत असला तरी मान्सून लांबल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलावांत सद्यस्थितीत केवळ ७ टक्के पाणी शिल्लक आहे. हे पाणी पुढील फक्त २६ दिवस पुरणारे असल्याने मुंबईला पाणीपुरवठा करणा-या तलावांमध्ये समाधानकारक पाणीसाठा जमा होईपर्यंत १ जुलैपासून मुंबईत १० टक्के पाणीकपात करण्यात येणार आहे.


मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरण क्षेत्रात मिळून सद्यस्थितीत ६.९७ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे पाणी कपात केली जाणार असल्याची माहिती मुंबई महापालिका प्रशासनाने दिली आहे. या संदर्भात मुंबई महापालिकेच्या जल विभागाने हा प्रस्ताव मुंबई महापालिका आयुक्तांकडे पाठवला होता त्याला काल मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे एक जुलैपासून मुंबई दहा टक्के पाणी कपात केली जाणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना पाणी जपून वापरावे लागणार आहे.

Comments
Add Comment

गेटवे परिसरातील डिझेल बोटी होणार इलेक्ट्रिक; हरित आणि इंधन बचतीसाठी राज्य सरकारचा पुढाकार

इलेक्ट्रिक बोटींसाठी मुंबई बँकेने विशेष कर्ज योजना आणावी - मंत्री नितेश राणे इलेक्ट्रिक बोटिंसाठी मुंबई बँक

Palghar Accident : काळजाचा ठोका चुकवणारं दृश्य! एकाच रांगेत १२ मृतदेह, बापूगावात महिलांचा हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश

पालघर : आनंदाने नटलेले घर, साखरपुड्याच्या निमित्ताने जमलेले सर्व नातेवाईक आणि उत्साहाचे वातावरण... पण नियतीच्या

Water Shortage : राज्यातील १५ जिल्ह्यांत पाणीटंचाई

६३३ गावे, १ हजार ६५२ वाड्यांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू मुंबई : राज्यात वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे

महाराष्ट्रात होणार २५ हजार ४०० मेगावॅट अणुऊर्जा निर्मिती

६ लाख ५० हजार कोटींची गुंतवणूक; १ लाख २३ हजार ५०० नोकऱ्या उपलब्ध होणार मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी

ॲमिटी विद्यापीठाला पनवेलमध्ये १५ एकर जमीन; मंत्रिमंडळाचा निर्णय

मुंबई : ॲमिटी विद्यापीठाची मूळ संस्था असलेल्या रितनंद बलवेद एज्युकेशन फाऊंडेशन या शैक्षणिक संस्थेला मौजे भाताण

Tushar Gaikwad : खासदार वर्षा गायकवाड यांचे बंधू तुषार गायकवाड यांचे निधन

मुंबई : उत्तर-मध्य मुंबईच्या काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांचे धाकटे बंधू तुषार एकनाथ गायकवाड (Tushar Gaikwad) यांचे