Nandurbar Municipality Schools : 'या' कारणामुळे नंदुरबारमध्ये अनेक पालकांचा सरकारी शाळांकडे ओढा

राज्यात १२०० हून आधिक विद्यार्थी खाजगीमधून जिल्हा परिषदेच्या शाळेत दाखल


नंदुरबार : राज्यभरात अनेक जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये (Government Schools) विद्यार्थ्यांच्या संख्येला गळती लागल्याचे म्हटले जाते. अनेक आंतरदेशीय शाळा तिथल्या सोयीसुविधांमुळे पालकांना आकर्षित करतात आणि कधीकधी तेवढी क्षमता नसतानाही पालक आपल्या पाल्याला अशा शाळांमध्ये दाखल करतात. याचं एक कारण म्हणजे अशा शाळांमध्ये उपलब्ध असणारं आधुनिक प्रकारचं डिजीटल शिक्षण. याच पार्श्वभूमीवर नगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना देखील डिजिटल शिक्षण मिळावे, याकरता नंदुरबार नगरपालिकेने (Nandurbar Municipality) मोठे पाऊल उचलले. यामुळे पालकदेखील सरकारी शाळांकडे वळत आहेत व चित्र बदलत आहे.


शाळेतील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा वाढावा यासाठी नंदुरबार नगरपालिकेने या शैक्षणिक वर्षात नगर पालिकेच्या १२ शाळांपैकी पाच शाळांमधील एक वर्गखोली डिजिटल (Digital classroom) करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाची अंमलबजावणी झाली असून यामुळे विद्यार्थ्यांना आता आधुनिक शिक्षण घेता येणार आहे. पालिकेच्या शाळांमधील हे दर्जेदार शिक्षण आपल्या पाल्यांना देण्यासाठी पालकांचा ओढा पालिकेच्या शाळांकडे वाढल्याचे दिसत आहे.



डिजिटल वर्गखोलीसाठी ४० लाखांचा निधी

हा निर्णय प्रत्यक्षात आणण्यासाठी नंदुरबार नगरपालिकेचे मुख्याधिकारी अमोल बागुल यांनी एचडीएफसी बँकेच्या (HDFC Bank) सी एस आर फंडातून (CSR Fund) ४० लाखांची मदत मिळवली. या निधीतून नगर पालिकेच्या १२ शाळांमधून ५ शाळांमधील प्रत्येकी एक खोली डिजिटल करण्यात आली आहे. प्रत्येक खोलीसाठी आठ लाखाचा खर्च आला आहे.



डिजिटल वर्गखोलीत काय सुविधा असणार?

या डिजिटल क्लासरूम साठी ६५ इंची डिजिटल टीव्ही (Digital TV) ,प्रोजेक्टर (Projector), १० बेंचेस, कार्पेट अशा आधुनिक वस्तू देण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम किंवा एखाद्या विषयाबाबत पडणारे प्रश्न या डिजिटल स्वरूपाच्या माध्यमातून सहज सोडवता येतील असे मुख्याधिकारींनी सांगितले.



पालकांचा जिल्हा परिषद शाळेकडे कल

कोविड काळात फी भरली नाही तर ऑनलाइन शिक्षणही नाही असा मार्ग बहूतांशी खाजगी शाळांनी निवडला. दुसरीकडे जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक शक्य तिथे ऑनलाइन तर जिथे शक्य नाही तेथे ऑफलाईन पद्धतीने शिक्षण देत होते. मोफत शिक्षण, प्रत्यक्ष संवाद, गुणवत्ता सुधार, सेमी इंग्रजी यामुळे जिल्हा परिषद शाळांमध्ये प्रवेश वाढू लागले आहेत. यावर्षी १२०० हून अधिक विद्यार्थ्यांनी खाजगी शाळांमधून जिल्हा परिषद शाळांमध्ये प्रवेश घेतल्याची नोंद करण्यात आली आहे. तसेच नंदुरबार नगरपालिकेसारखे आधुनिक आणि शैक्षणिक उपक्रम राज्यातील अनेक शाळांनी राबवले तर शाळा बंद पडणार नाहीत.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

ठाणे पूर्व येथील श्री जय अंबे माता नवरात्रोत्सव मंडळाच्या देवीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न; उपमुख्यमंत्री शिंदेंनी केली सहकुटुंब देवीची पूजा

ठाणे: चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे

‘गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार'मुळे भागली ११ हजार गावांची तहान

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची संकल्पना; ७७ लाख टँकर क्षमतेचा पाणीसाठा पुनर्संचयित, ७.७३ कोटी घनमीटर गाळ

अभ्यास न झाल्याने विद्यार्थाने चोरली प्रश्नपत्रिका, थेट...

मुंबई: राज्यात दहावी- बारावी बोर्ड परिक्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार सुरु असल्याचे समोर येत आहे. एकीकडे

Gudi Padwa 2026 : नवनियुक्त राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी दिल्या गुढीपाडव्यानिमित्त शुभेच्छा

मुंबई : महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी गुढीपाडवा व मराठी नवीन वर्षा निमित्त राज्यातील

भविष्य सांगता सांगता जमवली अवाढव्य संपत्ती, अशोक खरातचं साम्राज्य कुठे आणि किती?

अहिल्यानगर: महिलांचे शोषण करणाऱ्या आणि स्वतःला ज्योतिषी म्हणवून घेणाऱ्या अशोक खरात उर्फ कॅप्टन खरात याच्या

Gudi Padwa 2026 Muhurat: गुढीपाडव्याचा इतिहास काय आहे?, जाणून घ्या मुहूर्त, पूजा आणि विधी

मुंबई: हिंदू धर्मात गुढीपाडवा सणाला अतिशय महत्त्व आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला हा दिवस चैत्र शुद्ध