नंदुरबार : राज्यभरात अनेक जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये (Government Schools) विद्यार्थ्यांच्या संख्येला गळती लागल्याचे म्हटले जाते. अनेक आंतरदेशीय शाळा तिथल्या सोयीसुविधांमुळे पालकांना आकर्षित करतात आणि कधीकधी तेवढी क्षमता नसतानाही पालक आपल्या पाल्याला अशा शाळांमध्ये दाखल करतात. याचं एक कारण म्हणजे अशा शाळांमध्ये उपलब्ध असणारं आधुनिक प्रकारचं डिजीटल शिक्षण. याच पार्श्वभूमीवर नगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना देखील डिजिटल शिक्षण मिळावे, याकरता नंदुरबार नगरपालिकेने (Nandurbar Municipality) मोठे पाऊल उचलले. यामुळे पालकदेखील सरकारी शाळांकडे वळत आहेत व चित्र बदलत आहे.
शाळेतील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा वाढावा यासाठी नंदुरबार नगरपालिकेने या शैक्षणिक वर्षात नगर पालिकेच्या १२ शाळांपैकी पाच शाळांमधील एक वर्गखोली डिजिटल (Digital classroom) करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाची अंमलबजावणी झाली असून यामुळे विद्यार्थ्यांना आता आधुनिक शिक्षण घेता येणार आहे. पालिकेच्या शाळांमधील हे दर्जेदार शिक्षण आपल्या पाल्यांना देण्यासाठी पालकांचा ओढा पालिकेच्या शाळांकडे वाढल्याचे दिसत आहे.
हा निर्णय प्रत्यक्षात आणण्यासाठी नंदुरबार नगरपालिकेचे मुख्याधिकारी अमोल बागुल यांनी एचडीएफसी बँकेच्या (HDFC Bank) सी एस आर फंडातून (CSR Fund) ४० लाखांची मदत मिळवली. या निधीतून नगर पालिकेच्या १२ शाळांमधून ५ शाळांमधील प्रत्येकी एक खोली डिजिटल करण्यात आली आहे. प्रत्येक खोलीसाठी आठ लाखाचा खर्च आला आहे.
या डिजिटल क्लासरूम साठी ६५ इंची डिजिटल टीव्ही (Digital TV) ,प्रोजेक्टर (Projector), १० बेंचेस, कार्पेट अशा आधुनिक वस्तू देण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम किंवा एखाद्या विषयाबाबत पडणारे प्रश्न या डिजिटल स्वरूपाच्या माध्यमातून सहज सोडवता येतील असे मुख्याधिकारींनी सांगितले.
कोविड काळात फी भरली नाही तर ऑनलाइन शिक्षणही नाही असा मार्ग बहूतांशी खाजगी शाळांनी निवडला. दुसरीकडे जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक शक्य तिथे ऑनलाइन तर जिथे शक्य नाही तेथे ऑफलाईन पद्धतीने शिक्षण देत होते. मोफत शिक्षण, प्रत्यक्ष संवाद, गुणवत्ता सुधार, सेमी इंग्रजी यामुळे जिल्हा परिषद शाळांमध्ये प्रवेश वाढू लागले आहेत. यावर्षी १२०० हून अधिक विद्यार्थ्यांनी खाजगी शाळांमधून जिल्हा परिषद शाळांमध्ये प्रवेश घेतल्याची नोंद करण्यात आली आहे. तसेच नंदुरबार नगरपालिकेसारखे आधुनिक आणि शैक्षणिक उपक्रम राज्यातील अनेक शाळांनी राबवले तर शाळा बंद पडणार नाहीत.
पुणे : विद्येचे माहेरघर आणि सांस्कृतिक राजधानी नंतर क्राइम शहर म्हणून ओळखले जाणाऱ्या पुणे शहरात…
मुंबई : उन्हाळ्याचा प्रभाव खुपच वाढत आहे.उन्हाळ्यात बहुतेक लोक शरीर थंड ठेवण्यासाठी दही खातात. पण…
हैदराबाद : दाक्षिणात्य अभिनेता महेश बाबू (Mahesh Babu) यांना रिअल इस्टेट (Real Estate Groups) गुंतवणूकदारांच्या…
वादळ, हिमनद्या वितळणे, अवकाळी पावसासारख्या वाढल्या आपत्तीच्या घटना ठाणे (प्रशांत सिनकर) : जगभरात २२ एप्रिल…
ऑर्लँडो : अमेरिकेतील ऑर्लँडो आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Orlando International Airport) डेल्टा एअरलाइन्सच्या विमानाला आग लागली. मात्र,…
मुंबई: यंदाच्या वर्षी ३० एप्रिलला अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त आहे. या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले…