India vs West Indies: भारत - वेस्ट इंडिज २ सामन्यांची कसोटी मालिका १२ जुलै पासून सुरू

उमेश यादव - पुजाराला संघातून वगळले नसल्याचे बीसीसीआयचे स्पष्टीकरण


नवी दिल्ली (वृत्तसंस्था): भारत आणि वेस्ट इंडिज (India vs West Indies) यांच्यातील २ सामन्यांच्या कसोटी मालिकेला १२ जुलैपासून सुरुवात होत आहे. त्यामुळे भारतीय संघ आता वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार आहे. टीम इंडिया तिथे फक्त कसोटीच खेळणार नाही तर ३ वनडे आणि ५ टी-२० सामनेही खेळणार आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) कॅरेबियन दौऱ्यासाठी भारतीय संघाच्या कसोटी आणि एकदिवसीय संघांची घोषणा केली आहे. ज्यामध्ये अनेक बदल दिसून आले आहेत. विशेषत: कसोटीत, संघाचे २ सिनियर खेळाडू चेतेश्वर पुजारा आणि उमेश यादव यांची जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमधील पराभवानंतर निवड झालेली नाही.


वेगवान गोलंदाज उमेश यादव याला डब्ल्यूटीसी फायनलमधील पराभवानंतर वगळण्यात आलेले नाही. उलट तो जखमी झाला आहे. त्याला हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली असून तो बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये बरा होत आहे, अशी माहिती बीसीसीआयच्या सूत्राने दिली.


सध्या तरी या दोन्ही सिनियर खेळाडूंना कसोटी संघात स्थान मिळण्याचे दरवाजे बंद झालेले नाहीत. दोघांची कामगिरी टीम इंडियासाठी उत्कृष्ट ठरली आहे. बीएसीसीआयच्या एका सूत्राने सांगितले की, ‘१५ महिन्यांसाठी वगळल्यानंतर अजिंक्य रहाणे टीम इंडियाचा उपकर्णधार बनू शकतो, तर कोणीही पुनरागमन करू शकतो. ते पुढे म्हणाले, ‘तुम्हाला कुठेतरी बदलाची सुरुवात करायची आहे. निवडकर्त्यांना अशी परिस्थिती नको आहे की सर्व सीनियर एकाच वेळी मैदान सोडतील आणि ड्रेसिंग रूममध्ये अनुभवी खेळाडू नसतील’.



‘टी २०’ संघात रिंकू सिंगची एन्ट्री


आयपीएल २०२३ मध्ये आपल्या तुफानी फलंदाजीने दहशत निर्माण करणाऱ्या रिंकू सिंग याला वेस्ट इंडिजविरुद्धच्या संघात संधी मिळण्याची दाट शक्यता दिसत आहे. पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत त्याची निवड होऊ शकते. रिंकूने आयपीएल २०२३ मध्ये खेळल्या गेलेल्या १४ सामन्यांमध्ये ५९.२५ च्या सरासरीने ४७४ धावा केल्या होत्या. या मोसमात त्याच्या नावावर ४ अर्धशतकेही आहेत. यूपीचा रिंकू लवकरच भारतासाठी पदार्पण करू शकतो.

Comments
Add Comment

राष्ट्रीय खोखोपटू सुनिल लाड यांची मुंबई महानगरपालिकेत प्रमुख अधिकारी (प्र) म्हणून नियुक्ती

मुंबई : राष्ट्रीय खोखोपटू तथा क्रीडा प्रसारक श्री. सुनिल लाड यांची मुंबई महानगरपालिकेच्या दुकाने व आस्थापना

WPL 2026 Final: बंगळूरची विजयी घोडदौड दिल्ली थांबवू शकणार का?

वडोदरा: चार आठवड्यांच्या लढतीनंतर, महिला प्रीमियर लीग २०२६ आता अंतिम टप्प्यात येऊन पोहोचली आहे. रॉयल चॅलेंजर्स

IND vs PAK : "आयसीसीचे मुख्यालय भारतात असते तर बॉम्बने उडवले असते..."; पाकिस्तानी अभिनेत्याचे वादग्रस्त विधान

रविवारी (१ फेब्रुवारी) पाकिस्तान सरकारने जाहीर केले की त्यांचा संघ २०२६ च्या टी२० विश्वचषकासाठी मैदानात उतरेल,

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन निवडणुकीची स्थगिती कायम, रोहित पवारांच्या अडचणीत वाढ

नवी दिल्ली  : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि आमदार रोहित पवार यांना सर्वोच्च न्यायालयाने जोरदार

IND vs PAK : पाकिस्तान नेहमीप्रमाणे "यू-टर्न" घेईल; सुनील गावस्कर यांची पाकिस्तानवर टीका

मुंबई: टी-२० विश्वचषकापूर्वी पाकिस्तान सरकारने भारताविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली आहे.

जोकोविचला नमवत कार्लोसची ऑस्ट्रेलियन ओपनला गवसणी

मेलबर्न : ऑस्ट्रेलियन ओपन २०२६च्या पुरुष एकेरी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात स्पेनच्या युवा खेळाडू कार्लोस