Rain Tradition: कायच्या काय! पाऊस पडावा म्हणून गावात दोन मुलांचे लग्न लावून दिले

बंगळूरू: वरुणदेवाला प्रसन्न करण्यासाठी महाराष्ट्रात (Maharashtra) बेडकाचे लग्न लावले जाते. मात्र कर्नाटकातील (Karnataka) मंड्या जिल्ह्यात गंगेनहल्ली गावात भगवान इंद्राला प्रसन्न करण्यासाठी चक्क दोन मुलांचे लग्न लावण्यात आले. एक मुलगा वर आणि दुसरा वधू बनला. वधुने साडी, चोळी असा पारंपरिक वेश केला तर नवरदेवही छान पापंरपरिक कपड्यात तयार झाला होता. इतकचं नव्हे तर विवाह सोहळ्यात संपूर्ण गावाला मेजवानीही देण्यात आली.


खरंतर, हे सर्व काहीसे प्रतीकात्मक होते. पावसासाठी गावकऱ्यांनी लग्न आणि मेजवानीची जुनी परंपरा या निमित्ताने साजरी केली. गावात चांगला पाऊस व्हावा यासाठीच हे सर्व काही करण्यात आल्याचे गंगेनहल्ली गावातील लोकांनी सांगितले. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कर्नाटकात कमी पाऊस झाल्याची माहितीही त्यांनी दिली.



भारतात ही जुनी परंपरा


कर्नाटकच्या ग्रामीण भागात पावसासाठी दोन तरुणांमध्ये लग्न करण्याची परंपरा फार जुनी आहे. बंगळुरूमध्ये २०१७ मध्ये असाच एक प्रतीकात्मक विवाह झाला होता. लोकांचा असा विश्वास आहे की या प्रकारच्या लग्नामुळे गावातील लोक सुखी आणि समृद्ध होतात.


२०१७ मध्ये मध्य प्रदेशात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. यानंतर इंदूरच्या मुसाखेडी येथेही अशाचप्रकार दोन तरुणांचे लग्न लावून देण्यात आले होते. दोन्ही मुलांसाठी मंडप सजवण्यात आला आणि दोघांनी सप्तपदी घेतली. त्यात दोन्ही बाजूंनी स्थानिक नागरिकही सहभागी झाले होते.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra
Comments
Add Comment

Uttar Pradesh Road Accident : उत्तर प्रदेशामध्ये ट्रक-मॅजिकच्या धडकेत १० जणांचा मृत्यू

लखनौ : येथील लखीमपूर खेरी येथे सोमवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण रस्ते अपघातात १० जणांचा

Jammu Kashmir Drug Case : पंजाबनंतर आता जम्मू-काश्मीर ड्रग्जचे नवे हॉटस्पॉट! १३ लाखांहून अधिक युवक ड्रग्जच्या आहारी

जम्मू काश्मीर : पंजाबनंतर आता जम्मू-काश्मीर अंमली पदार्थांच्या विळख्यात (Jammu Kashmir Drug Case) अडकत असल्याचे धक्कादायक

India Population : अधिक मुले जन्माला घाला, सरकारकडून मिळणार आर्थिक मदत; पण वाढत्या लोकसंख्येमुळे निर्माण होणार नवे प्रश्न

आंध्र प्रदेश : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्रबाबू नायडू (N. Chandrababu Naidu) यांनी राज्यातील घटता जन्मदर रोखण्यासाठी

Sasaram-Patna Passenger Train Catches Fire : सासाराम-पाटणा पॅसेंजरच्या डब्याला पहाटे भीषण आग, प्लॅटफॉर्मवर उडाली एकच धावपळ!

बिहार : बिहारमधील सासाराम जंक्शन रेल्वे स्थानकावर आज पहाटे एक मोठी दुर्घटना टळली. सासारामहून पाटण्याकडे

ICEYE भारतात उपग्रह उत्पादन सुरू करणार

नवी दिल्ली : अंतराळ-आधारित गुप्तचर क्षेत्रातील जगातील आघाडीची कंपनी 'आय-साय' (ICEYE) पुढील एका वर्षात भारतात आपले

Fire : रतलामजवळ राजधानी एक्सप्रेसला आग

रतलाम : तिरुवनंतपुरम-हजरत निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेसला (गाडी क्रमांक १२४३१) मध्य प्रदेशातील रतलाम जिल्ह्यात