Accident: रत्नागिरी हादरले! दापोलीत वाहनाचा झाला चक्काचूर, चिमुकल्यांवर काळाचा घाला

रत्नागिरी : रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यात दापोली (Dapoli) हर्णै राज्य मार्गावर आसूद येथे रविवारी दुपारच्या सुमारास ट्रक व मॅजिक प्रवासी रिक्षा यांच्यात भीषण अपघात झाला आहे. यात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. या भीषण अपघात (Fatal accident) काहीजण जखमी झाले आहेत.


ट्रक आणि मॅजिकच्या भीषण अपघातातील मृतांमध्ये दोन लहान मुलांचा समावेश असल्याचं समोर आलं आहे. या अपघातात हर्णै येथील प्रवासी मॅजिक गाडीचालक अनिल उर्फ बॉबी सारंग यांचाही मृत्यू झाला आहे. या अपघातामुळे मोठी खळबळ उडाली असून प्रथमदर्शनी ट्रक चालकाच्या चुकीमुळे चार जणांना जीव गमवावा लागल्याचा अंदाज आहे.


अपघाताची माहिती मिळताच दापोली पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. अपघात जिथं झाला तिथं स्थानिकांसह वाहनधारकांनी मोठी गर्दी केली आहे. काही जखमी प्रवाशांना दापोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून प्राथमिक उपचारानंतर काही प्रवाशांना पुढील उपचार करता पाठवण्यात आले आहे.


मरियम गौफिक काझी ६ वर्षे, स्वरा संदेश कदम ८ वर्षे, संदेश कदम, ५५ वर्ष, अनिल सारंग ४५ वर्षं, फराह तौफिक काझी, २७ वर्ष अशी मृतांची नावे आहेत.



जखमींची यादी


१) विनायक हशा चौगुले-४५ पाजपंढरी
२) श्रध्दा संदेश कदम-१४ अडखळ
३) मिरा महेश बोरकर-२२ पाडले
४) भुमी सावंत-१७ हर्णे (मुंबई ट्रान्सफर)
५) मुग्धा सावंत-१४ हर्णे (मुंबई ट्रान्सफर)
६)वंदना चोगले-३८ पाजपंढरी
७)ज्योती चोगले-०९पाजपंढरी
८)विनोद चोगले-३० पाजपंढरी



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

Nagpur-Madgaon Biweekly Train Regular : कोकणवासीयांसाठी आनंदाची बातमी! नागपूर-मडगाव द्विसाप्ताहिक एक्स्प्रेस आता नियमित धावणार

कोकण : मे महिन्याच्या सुट्ट्यांमध्ये तसेच भविष्यातही कोकणात ये-जा करणाऱ्या प्रवाशांसाठी मोठा दिलासा देणारा

Sindhuratna Samruddhi Yojana 2.0 : 'सिंधुरत्न समृद्ध योजना २.०'ला मंजुरी

मंत्रिमंडळ बैठकीत तीन वर्षांच्या मुदतवाढीवर शिक्कामोर्तब; पालकमंत्र्यांकडे अध्यक्षपद, कोकणच्या सर्वांगीण

Raigad : रायगड जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील : पर्यटनमंत्री शंभूराज देसाई

मुंबई: रायगड जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी जिल्ह्यात सुरू असलेल्या पर्यटनांच्या कामांना गती

Revenue Minister Chandrashekhar Bawankule : कोकणातील आंबा-काजू बागायतदारांना वाऱ्यावर सोडणार नाही!

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे; मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून तोडगा काढू मुंबई : हवामान बदल आणि अवकाळी पावसामुळे

Nitesh Rane : कोकण रेल्वेच्या प्रकल्पग्रस्तांना रोजगारात प्राधान्य द्या!

पालकमंत्री नितेश राणे यांचे निर्देश; प्रकल्पबाधितांची स्वतंत्र यादी तयार करण्याच्या रेल्वे प्रशासनाला

Ratnagiri : रत्नागिरीत वादळाने विद्युतपुरवठा विस्कळित

रत्नागिरी : रत्नागिरीत आज संध्याकाळी अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे सर्वांची दाणादाण उडाली. यावर्षी