Patna Opposition Meeting : मोदी हटाओ नही, परिवार बचाओ बैठक

देवेंद्र फडणवीसांची जोरदार टीका


मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Elections) पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांची आज बिहारमधील पाटणा येथे बैठक (Patna Opposition Meeting) आयोजित करण्यात आली होती. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे (PM Narendra Modi) नाव जगभर गाजत आहे तर दुसरीकडे विरोधी पक्षांना हे पाहवत नसल्याने ते आज एकत्र आले आहेत. हाच धागा पकडून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis)यांनी या बैठकीचा 'मोदी हटाओ नही, परिवार बचाओ बैठक', असा उल्लेख करत जोरदार टीका केली.


आज पाटणामध्ये सगळे परिवारवादी पक्ष एकत्र आले आहेत आणि आपला परिवार कसा वाचू शकेल आणि आपल्याच कुटुंबाकडे कशी सत्ता राहू शकेल हा त्यांचा हेतू आहे. कारण यांच्यासाठी राज्य चालवणं हा धंदा आहे, तर भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी ती सेवा आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.


पुढे ते म्हणाले, मागच्याही काळामध्ये २०१९ ला या सगळ्या लोकांनी एकत्र येऊन पाहिलं होतं पण जनता मोदीजींच्याच पाठीशी आहे आणि आता तर २०२४ मध्ये मागच्या वेळेपेक्षाही जास्त ताकदीने जनता मोदीजी आणि एनडीए (NDA) पक्षाच्या पाठीशी उभी राहील. त्यामुळे अशा प्रकारचे कितीही मेळावे विरोधकांनी केले तरी त्याचा परिणाम होईल, असं मला वाटत नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.



उद्धव ठाकरेंना केले लक्ष्य

देवेंद्र फडणवीस म्हणाले, एका गोष्टीचं मला आश्चर्य वाटतं की सातत्याने मेहबुबा मुफ्तींच्या नावावर भाजपला टोमणे मारणारे उद्धव ठाकरे आता मेहबुबा मुफ्तींसोबत तर चाललेच आहेत पण त्यांच्या बाजूलाच बसले आहेत. त्यामुळे सत्तेकरता आणि परिवार वाचवण्याकरता सगळ्या प्रकारच्या तडजोडी करण्यासाठी हे तयार आहेत, पण याचा कुठलाही परिणाम होईल, असं मला बिल्कुल वाटत नाही, असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवरदेखील निशाणा साधला.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

Railway : CSMT ते कल्याण आणि चर्चगेट ते विरार भुयारी रेल्वे करणार

मुंबई : मुंबई उपनगरीय रेल्वे ही मुंबई महानगर क्षेत्राची जीवनवाहिनी आहे. वाजवी दरात वेगाने प्रवास करण्याचा

Maharashtra Weather alert : महाराष्ट्रात रविवारी अवकाळी मुसळधार; या जिल्ह्यांना अलर्ट जारी

मुंबई : देशाच्या हवामानातं अनपेक्षित बदल पाहायला मिळत आहेत. काही राज्यात पाऊस, गारपीठ तर काही ठिकाणी कडाक्याचं ऊन

Central Railway : मध्य रेल्वेने साजरा केला जागतिक वारसा दिन

मुंबई : मध्य रेल्वेने जागतिक वारसा दिन-२०२६ उत्साहात साजरा केला. हा कार्यक्रम युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ व मध्य

ATS : केंद्र सरकारच्या एका निर्णयामुळे राज्यातील लाखो वाहतूक व्यावसायिकांना दिलासा

मुंबई : 'एटीएस' (ऑटोमॅटिक टेस्टिंग स्टेशन) प्रणालीतील तांत्रिक बदलांमुळे रखडलेली वाहन परवाना नूतनीकरण प्रक्रिया

Uninterrupted Power Supply : अखंड वीजपुरवठ्यासाठी राज्यात होणार ‘एआय’चा वापर

मुंबई : वाढत्या उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर विजेची विक्रमी मागणी पूर्ण करतानाच, वीजनिर्मिती आणि पुरवठ्यात

Data Centers in Maharashtra : मध्य आशियातील नामांकित कंपन्या महाराष्ट्रात डेटा सेंटर स्थापन करणार

मुंबई : राज्यातील उद्योगस्नेही वातावरणाचे सकारात्मक परिणाम आता दिसू लागले असून, मध्य आशियातील डेटा सेंटर