मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Elections) पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांची आज बिहारमधील पाटणा येथे बैठक (Patna Opposition Meeting) आयोजित करण्यात आली होती. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे (PM Narendra Modi) नाव जगभर गाजत आहे तर दुसरीकडे विरोधी पक्षांना हे पाहवत नसल्याने ते आज एकत्र आले आहेत. हाच धागा पकडून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis)यांनी या बैठकीचा ‘मोदी हटाओ नही, परिवार बचाओ बैठक’, असा उल्लेख करत जोरदार टीका केली.
आज पाटणामध्ये सगळे परिवारवादी पक्ष एकत्र आले आहेत आणि आपला परिवार कसा वाचू शकेल आणि आपल्याच कुटुंबाकडे कशी सत्ता राहू शकेल हा त्यांचा हेतू आहे. कारण यांच्यासाठी राज्य चालवणं हा धंदा आहे, तर भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी ती सेवा आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
पुढे ते म्हणाले, मागच्याही काळामध्ये २०१९ ला या सगळ्या लोकांनी एकत्र येऊन पाहिलं होतं पण जनता मोदीजींच्याच पाठीशी आहे आणि आता तर २०२४ मध्ये मागच्या वेळेपेक्षाही जास्त ताकदीने जनता मोदीजी आणि एनडीए (NDA) पक्षाच्या पाठीशी उभी राहील. त्यामुळे अशा प्रकारचे कितीही मेळावे विरोधकांनी केले तरी त्याचा परिणाम होईल, असं मला वाटत नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, एका गोष्टीचं मला आश्चर्य वाटतं की सातत्याने मेहबुबा मुफ्तींच्या नावावर भाजपला टोमणे मारणारे उद्धव ठाकरे आता मेहबुबा मुफ्तींसोबत तर चाललेच आहेत पण त्यांच्या बाजूलाच बसले आहेत. त्यामुळे सत्तेकरता आणि परिवार वाचवण्याकरता सगळ्या प्रकारच्या तडजोडी करण्यासाठी हे तयार आहेत, पण याचा कुठलाही परिणाम होईल, असं मला बिल्कुल वाटत नाही, असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवरदेखील निशाणा साधला.
मुंबई: सध्या सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. काश्मीर खोऱ्यातील पहलगाम (Pahalgam Terror Attack) येथे दहशतवाद्यांनी…
मुंबई(ज्ञानेश सावंत):मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद हा सामना हैदराबादमध्ये राजीव गांधी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम येथे…
अतिधोकादायक उपकरप्राप्त इमारतींची संख्या ९५ वर मुंबई (प्रतिनिधी) : दक्षिण मुंबईतील अंदाने १४ हजार इमारतीची…
पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्हा नियोजनमधून २ कोटी ३७ लाख दिला निधी सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) :…
नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात भारतीय नौदलाचे एक अधिकारी आणि आयबीच्या एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचा…