Patna Opposition Meeting : मोदी हटाओ नही, परिवार बचाओ बैठक

  133

देवेंद्र फडणवीसांची जोरदार टीका


मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Elections) पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांची आज बिहारमधील पाटणा येथे बैठक (Patna Opposition Meeting) आयोजित करण्यात आली होती. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे (PM Narendra Modi) नाव जगभर गाजत आहे तर दुसरीकडे विरोधी पक्षांना हे पाहवत नसल्याने ते आज एकत्र आले आहेत. हाच धागा पकडून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis)यांनी या बैठकीचा 'मोदी हटाओ नही, परिवार बचाओ बैठक', असा उल्लेख करत जोरदार टीका केली.


आज पाटणामध्ये सगळे परिवारवादी पक्ष एकत्र आले आहेत आणि आपला परिवार कसा वाचू शकेल आणि आपल्याच कुटुंबाकडे कशी सत्ता राहू शकेल हा त्यांचा हेतू आहे. कारण यांच्यासाठी राज्य चालवणं हा धंदा आहे, तर भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी ती सेवा आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.


पुढे ते म्हणाले, मागच्याही काळामध्ये २०१९ ला या सगळ्या लोकांनी एकत्र येऊन पाहिलं होतं पण जनता मोदीजींच्याच पाठीशी आहे आणि आता तर २०२४ मध्ये मागच्या वेळेपेक्षाही जास्त ताकदीने जनता मोदीजी आणि एनडीए (NDA) पक्षाच्या पाठीशी उभी राहील. त्यामुळे अशा प्रकारचे कितीही मेळावे विरोधकांनी केले तरी त्याचा परिणाम होईल, असं मला वाटत नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.



उद्धव ठाकरेंना केले लक्ष्य

देवेंद्र फडणवीस म्हणाले, एका गोष्टीचं मला आश्चर्य वाटतं की सातत्याने मेहबुबा मुफ्तींच्या नावावर भाजपला टोमणे मारणारे उद्धव ठाकरे आता मेहबुबा मुफ्तींसोबत तर चाललेच आहेत पण त्यांच्या बाजूलाच बसले आहेत. त्यामुळे सत्तेकरता आणि परिवार वाचवण्याकरता सगळ्या प्रकारच्या तडजोडी करण्यासाठी हे तयार आहेत, पण याचा कुठलाही परिणाम होईल, असं मला बिल्कुल वाटत नाही, असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवरदेखील निशाणा साधला.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचे ९ महत्वाचे निर्णय !

विमुक्त जाती व भटक्या जमातीतील लाभार्थ्यांसाठी विविध योजनांची कार्यपद्धती प्रभावीरित्या

न्यायमूर्ती शिंदे समितीला मुदतवाढ, जरांगे मुंबईत येणार की नाही येणार लवकरच ठरणार

मुंबई : फडणवीस सरकारच्या निर्देशानुसार मराठा आरक्षण उपसमितीची महत्त्वपूर्ण बैठक मंत्रालयात झाली. उपसमितीचे

'अंबाजोगाई येथे १ हजार १५० खाटांचे रुग्णालय उभारावे'

मुंबई : मराठवाड्यातील ग्रामीण भागासाठी वैद्यकीय शिक्षण व आरोग्यसेवा अधिक सक्षम व्हावी, यासाठी बीड जिल्ह्यातील

'दिवेआगरच्या सुपारी संशोधन केंद्राची कामे लवकर सुरू करा'

मुंबई : रायगड जिल्ह्यातील दिवेआगर येथील प्रस्तावित १४ कोटी रु.ची तरतुद असलेल्या सुपारी संशोधन केंद्राचे काम

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मत्स्यव्यवसाय महाविद्यालय उभारण्याची योजना

मुंबई : मत्स्यव्यवसायाला चालना देण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवगड, मौजे सौंदाळे, जामसंडे येथे शासकीय

'नांदेड-मुंबई ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ ने उघडले मराठवाड्याच्या समृद्धीचे द्वार'

मुंबई : मराठवाड्याच्या विकासासाठी शासन दळणवळण सुविधांवर भर देत आहे. ‘वंदे भारत एक्स्प्रेस’मुळे नांदेड शहर