Ubatha March : ठाकरेंचा मोर्चा पण पालिका कार्यालयाला तर सुट्टी

निवेदन देणार कोणाला?


मुंबई : उबाठा सेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन ठाकरे गट मुंबई महापालिकेवर (BMC) विराट मोर्चा काढणार असून महापालिकेत प्रशासकीय राजवटीत सुरू असलेल्या उधळपट्टीला विरोध करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली. आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) या मोर्चाचं नेतृत्व करणार आहेत. परंतु आता ठाकरे गटाच्या समस्यांमध्ये आणखी भर पडली आहे. १ जुलै रोजी शनिवार असून या दिवशी पालिका मुख्यालयाला सुट्टी (Holiday) असते, त्यामुळे ठाकरे गट निवेदन देणार कोणाला? असा प्रश्न उपस्थित होत आहे.


ठाकरे गटाच्या या मोर्चाची पालिका वर्तुळात चर्चा रंगत होती. मात्र आता या नव्या बाबीमुळे ठाकरे गटाचा मोर्चा बारगळणार की काय, अशी चिन्हे दिसत आहेत. १ जुलै रोजी शनिवार असून या दिवशी पालिका मुख्यालयाला सुट्टी असते. पालिकेच्या कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा असल्याने शनिवारी व रविवारी पालिका मुख्यालय बंद असते. केवळ सुरक्षा रक्षक असतात. त्यामुळे या दिवशी मोर्चा आणून मागण्यांचे निवेदन कोणाला देणार असा प्रश्न ठाकरे गटासमोर उभा ठाकला आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

दहिसर नदी प्रदूषण रोखण्यासाठीच्या प्रकल्पांचे काम मार्च २०२६ पर्यंत पूर्ण होणार

मुंबई : दहिसर नदीतील वाढते प्रदूषण रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रकल्पांचे काम मार्च २०२६ पर्यंत पूर्ण होणार आहे,

घर खरेदीत फसवणूक करणाऱ्या बिल्डरांची मालमत्ता जप्त होणार

मुंबई : राज्यात आपले गृहस्वप्न साकार करू पाहणाऱ्या हजारो सर्वसामान्यांची बिल्डरांकडून होणारी फसवणूक आता राज्य

स्वातंत्र्यवीर सावरकर यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ द्या! - भाजप आमदार प्रसाद लाड यांची विधान परिषदेत मागणी

सकारात्मक निर्णय घेण्याचे संसदीय कार्यमंत्र्यांचे आश्वासन मुंबई : भारतीय स्वातंत्र्यचळवळीतील

मुंबई सेंट्र्ल रेल्वस्थानकाजवळील पुलाचे नामकरण; आता होणार 'पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर' पूल

- मुंबई सेंट्र्ल रेल्वस्थानकाजवळील पुलाच्या पुनर्बांधणी कामाचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते लोकार्पण मुंबई :

अंगणवाडी बांधकामासाठी १५ लाखांचा निधी प्रस्तावित; मंत्री आदिती तटकरे यांची माहिती

मुंबई : राज्यातील अंगणवाड्यांसाठी राबवल्या जाणाऱ्या 'स्मार्ट किट' खरेदी प्रक्रियेत पारदर्शकता आणि गुणवत्तेचा

मराठी भाषेचे संवर्धन ही केवळ सरकारचीच नाही, तर प्रत्येकाची जबाबदारी - मंत्री उदय सामंत

मुंबई : "मराठी भाषेचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी शासन स्तरावर मराठी भाषा विभाग सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. मात्र,