Ubatha March : ठाकरेंचा मोर्चा पण पालिका कार्यालयाला तर सुट्टी

निवेदन देणार कोणाला?


मुंबई : उबाठा सेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन ठाकरे गट मुंबई महापालिकेवर (BMC) विराट मोर्चा काढणार असून महापालिकेत प्रशासकीय राजवटीत सुरू असलेल्या उधळपट्टीला विरोध करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली. आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) या मोर्चाचं नेतृत्व करणार आहेत. परंतु आता ठाकरे गटाच्या समस्यांमध्ये आणखी भर पडली आहे. १ जुलै रोजी शनिवार असून या दिवशी पालिका मुख्यालयाला सुट्टी (Holiday) असते, त्यामुळे ठाकरे गट निवेदन देणार कोणाला? असा प्रश्न उपस्थित होत आहे.


ठाकरे गटाच्या या मोर्चाची पालिका वर्तुळात चर्चा रंगत होती. मात्र आता या नव्या बाबीमुळे ठाकरे गटाचा मोर्चा बारगळणार की काय, अशी चिन्हे दिसत आहेत. १ जुलै रोजी शनिवार असून या दिवशी पालिका मुख्यालयाला सुट्टी असते. पालिकेच्या कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा असल्याने शनिवारी व रविवारी पालिका मुख्यालय बंद असते. केवळ सुरक्षा रक्षक असतात. त्यामुळे या दिवशी मोर्चा आणून मागण्यांचे निवेदन कोणाला देणार असा प्रश्न ठाकरे गटासमोर उभा ठाकला आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

जनगणना २०२७: मुंबईत पूर्व चाचणी चेंबूर एम पश्चिम विभागात

मुंबई (खास प्रतिनिधी) : जनगणना - २०२७ च्या तयारीचा एक भाग म्हणून, पूर्वचाचणी घेतली जाणार आहे. ज्यामध्ये जनगणनेच्या

महाराष्ट्रातील ७ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई: महाराष्ट्र शासनाने नुकतेच प्रशासकीय कामकाजात मोठे फेरबदल केले असून, सात वरिष्ठ भारतीय प्रशासकीय सेवा (IAS)

नोव्हेंबर महिन्यात कोणत्या दिवशी बँका राहणार बंद? जाणून घ्या...

मुंबई : नोव्हेंबर महिन्यात बँकांशी संबंधित कोणतेही काम करायचे असल्यास आधीच सावधान राहा, कारण नोव्हेंबरमध्ये

कबुतर खान्यांसाठी जैन समाजाच्या शिष्टमंडळाने घेतली मुंबई महापालिका आयुक्तांची भेट, केली ही मागणी...

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबईतील कबुतरखान्यांसाठी जनतेला तथा नागरिकांना त्रास होणार नाही, अशा पर्यायी जागांचा

इयत्ता पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा ८ फेब्रुवारी रोजी

मुंबई : पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता पाचवी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता

उद्धव ठाकरे हे स्वतःच 'अजगर'- बावनकुळेंचा जोरदार हल्ला, 'आयत्या बिळावर नागोबा' म्हणत शेलारांची टीका

मुंबई : सध्या महाराष्ट्रातील राजकारण अ‍ॅनाकोंडा, अजगर या शब्दांच्या टीकेवरून चांगलेच तापले आहे. उद्धव ठाकरेंनी