Ubatha March : ठाकरेंचा मोर्चा पण पालिका कार्यालयाला तर सुट्टी

  318

निवेदन देणार कोणाला?


मुंबई : उबाठा सेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन ठाकरे गट मुंबई महापालिकेवर (BMC) विराट मोर्चा काढणार असून महापालिकेत प्रशासकीय राजवटीत सुरू असलेल्या उधळपट्टीला विरोध करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली. आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) या मोर्चाचं नेतृत्व करणार आहेत. परंतु आता ठाकरे गटाच्या समस्यांमध्ये आणखी भर पडली आहे. १ जुलै रोजी शनिवार असून या दिवशी पालिका मुख्यालयाला सुट्टी (Holiday) असते, त्यामुळे ठाकरे गट निवेदन देणार कोणाला? असा प्रश्न उपस्थित होत आहे.


ठाकरे गटाच्या या मोर्चाची पालिका वर्तुळात चर्चा रंगत होती. मात्र आता या नव्या बाबीमुळे ठाकरे गटाचा मोर्चा बारगळणार की काय, अशी चिन्हे दिसत आहेत. १ जुलै रोजी शनिवार असून या दिवशी पालिका मुख्यालयाला सुट्टी असते. पालिकेच्या कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा असल्याने शनिवारी व रविवारी पालिका मुख्यालय बंद असते. केवळ सुरक्षा रक्षक असतात. त्यामुळे या दिवशी मोर्चा आणून मागण्यांचे निवेदन कोणाला देणार असा प्रश्न ठाकरे गटासमोर उभा ठाकला आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार !

७ जुलैच्या डब्याची सोय करून ठेवा! मुंबई (प्रतिनिधी) :मुंबईच्या गर्दीतून, पावसातून आणि खचाखच भरलेल्या ट्रेनमधून

गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्यास रेल्वेचे तिकीट मिळेना

रात्रभर रांगेत जागूनही झाल्या दोन मिनिटांत गाड्या फुल्ल मुंबई (प्रतिनिधी) : गणेशोत्सवासाठी गावाकडे नाणान्य

मुंबईत भाजपा घेणार वॉर्डनिहाय आढावा, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांची घोषणा...

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता निवडणुकीत भाजपाला अपेक्षत यश मिळवण्याच्या दृष्टीने

पाणी चिंता मिटली ! मुंबईकरांच्या धरणात किती टक्के पाणीसाठा?

मुंबई :  मे आणि जून महिन्यात जास्त पाऊस पडल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमधील पाणीसाठ्यात

वरळी येथे अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन जण समुद्रात बुडाले, दोघांचा मृत्यू

मुंबई : वरळीतील हाजी अली जवळच्या लोटस जेट्टीवर शनिवारी अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन व्यक्ती समुद्रात बुडाले.

Police Officers Transfer: महाराष्ट्रात ५१ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणत्या पोलिस अधिकाऱ्यांना मिळाली महत्वाची जबाबदारी...

मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने (Home Department) ५१ भारतीय सेवा अधिकारी (IPS) आणि ८१ राज्य पोलिस सेवा