Nitin Gadkari: नितीन गडकरी यांचा देशातील ट्रक चालकांना मोठा दिलासा!

नवी दिल्ली: केंद्रीय रस्ते, वाहतूक व दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी केलेल्या घोषणेनुसार आता देशातील प्रत्येक ट्रकमध्ये चालकाच्या केबिनमध्ये एसी बसवणं बंधनकारक करण्यात येणार आहे. २०२५ पासून हा निर्णय लागू होणार आहे. नितीन गडकरींनी हा नियम लागू करण्याच्या प्रस्तावावर स्वाक्षरी केली आहे.


अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, वाहन उद्योगाला या नियमानुसार बदल करण्यासाठी १८ महिन्यांचा वेळ आवश्यक आहे. रस्ते, वाहतूक मंत्रालयाने पहिल्यांदा २०१६ मध्ये याबाबतचा प्रस्ताव आणला होता. नितीन गडकरी म्हणाले, “आपल्या देशात काही चालक १२ ते १४ तास गाडी चालवतात. इतर देशांमध्ये बस आणि ट्रक चालकांच्या कामाचे तास निश्चित करण्यात आले आहेत. आपल्या देशात चालक ४३ ते ४७ अंश सेल्सियस तापमानात गाडी चालवतात. यावरून आपण आपल्याकडील चालकांच्या परिस्थितीचा अंदाज लावू शकतो.”


 “मी जेव्हा मंत्री झालो तेव्हाच मी ट्रकमध्ये एसी केबिन सुरू करण्यास इच्छूक होतो. मात्र, काही लोकांनी यामुळे खर्च वाढेल असं म्हणत याला विरोध केला. मात्र, आज (१९ जून) मी या निर्णयाच्या फाईलवर स्वाक्षरी केली आहे,” असंही नितीन गडकरींनी नमूद केलं.



अपघातही कमी होणार


नितीन गडकरी यांच्या या निर्णयानंतर भर उन्हात उष्णतेचा मारा सहन करत १२ ते १४ तास ट्रक चालवणाऱ्या ट्रक चालकांना मोठा दिलासा मिळणार आहे. या निर्णयावर मागील अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती. गाडी चालवण्याची कठीण परिस्थिती आणि रस्त्यांची अवस्था यामुळे तासंतास ट्रक चालवणारे चालक थकून जातात. याच कारणाने अनेक अपघातही होतात. म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचं नितीन गडकरींनी सांगितलं आहे.

Comments
Add Comment

COVID-19 Variant : आंध्र प्रदेशमध्ये कोरोना विषाणूचा नवा अवतार सक्रीय झाल्याची शक्यता, दोन मृत्यूंनी खळबळ

नवी दिल्ली : आंध्र प्रदेशमध्ये कोरोनाची लागण झाल्याने दोन रूग्णांचा मृत्यू झाला आहे. २०२२ नंतर पहिल्यांदाच

Madhya Pradesh : धार येथील भोजशाळा वाग्देवी मंदिरच, हायकोर्टाच्या निर्णयाला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

मुस्लिमांसाठी पर्यायी नमाजस्थळाची व्यवस्था करण्याचे निर्देश नवी दिल्ली : मध्यप्रदेशच्या धार येथील ऐतिहासिक

Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ला; लष्कर-ए-तोयबा प्रमुख हाफिज सईदविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी

जम्मू : पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या सुरू असलेल्या तपासाच्या संदर्भात, एका विशेष एनआयए न्यायालयाने

Hormuz Strait Attack : होर्मुझ हल्ल्यात भारतीय नाविकाच्या मृत्यूनंतर भारताने इराणी दूतावासाला बजावले समन्स

नवी दिल्ली : इराणच्या होर्मुझ सामुद्रधुनीत संयुक्त अरब अमिरातीच्या (युएई) तेलवाहू जहाजांवर झालेल्या हल्ल्यात

Lalu Prasad Yadav : चारा घोटाळा प्रकरणी लालू प्रसाद यादव यांचा जामीन कायम, सीबीआयची याचिका फेटाळली

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने यांना मोठा दिलासा दिला आहे. चारा घोटाळा प्रकरणात दोषी ठरल्यानंतर लालू प्रसाद

Dhar Bhojshala supreme court : धार भोजशाळा वाद : 'प्रकरण अत्यंत संवेदनशील', अंतिम निकाल येईपर्यंत नमाजसाठी पर्यायी जागेची व्यवस्था - सर्वोच्च न्यायालय

मध्य प्रदेशातील धार येथील वादग्रस्त भोजशाळा परिसराच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण अंतरिम