Eknath Shinde:.....तर एकनाथ शिंदेंनी डोक्यात गोळी घातली असती!

मुंबई: राज्यात स्वाभिमान विरुद्ध गद्दार असा संघर्ष पेटला असताना शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाबाबत खळबळजनक विधान केलं आहे. एकनाथ शिंदे यांचं बंड यशस्वी झालं नसतं तर त्यांनी सर्व आमदारांना परत पाठवून स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून घेतली असती. शिंदे यांनी आमदारांसाठी जीवाचीही पर्वा केली नाही. त्यामुळे आम्ही त्यांच्या पाठीशी उभे आहोत, असं केसरकर म्हणाले.


केसरकर म्हणाले, एकनाथ शिंदे म्हटलं ज्यावेळी मला बंड यशस्वी होईल की नाही, असं वाटत होतं, त्यावेळी एकच केलं असतं, माझ्यासोबत आलेल्या सर्व आमदारांना परत पाठवलं असतं, एक फोन करून माझी चुक झाली, यात आमदारांची काही चूक नाही, असं सांगून तिथंच डोक्यात गोळी झाडून घेतली असती, असं केसरकर म्हणाले.


आमदारांचे नुकसान होऊ नये, प्रसंगी जीव गेला तरी चालेल, असं म्हणणाऱ्या माणसाच्या मागे लोक उभी राहणार तर कोणाच्या मागे राहणार. तुम्हाला सर्व काही परंपरेतून मिळालं. पण शिंद्यांना ते त्यांच्या वागण्यातून मिळाले. राजकारणात काय होईल ते होईल, पण एक सच्चा माणूस जनतेसाठी झगडतो, हा प्रेम करण्याजोगाच मनुष्य असतो. म्हणूनच हे प्रेम महाराष्ट्राच्या जनतेने त्यांना दिलं पाहिजे, त्यांना काम करण्याची संधी द्यावी, असे आवाहन केसरकर यांनी केले.



शरद पवारांची बंडखोरी, अन् आमची गद्दारी?


शरद पवार काही आमदारांसह बाहेर पडले, त्यावेळी त्यांनी बंड केलं. ते जर बंड असेल तर आमचा काय गद्दारी आहे काय? असा सवाल केसरकर यांनी उपस्थित केला आहे. अनेक आमदार, खासदारांना भेट मिळत नव्हती. ते राजा आहेत का, हवं तसं वागायला? अशी टीकाही केसरकर यांनी उद्धव ठाकरेंवर केली.

Comments
Add Comment

Megablock : विविध अभियांत्रिकी व देखभाल कामांसाठी मुंबईत आज तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक

मुंबई : रेल्वेने मुंबई विभागातील तिन्ही उपनगरीय मार्गांवर रविवारी १२ एप्रिल रोजी विविध अभियांत्रिकी व देखभाल

Maharashtra : अवजड वाहनांमध्ये क्लीनर बंधनकारक नाही, महाराष्ट्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय

मुंबई : अवजड मोटार वाहन (एचएमव्ही) चालकांना मोठा दिलासा देत महाराष्ट्र सरकारने क्लिनर ठेवण्याची अट रद्द केली आहे.

RTE साठी महाराष्ट्रातील १ लाख ५ हजार ८११ विद्यार्थ्यांची निवड

मुंबई : बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार, दरवर्षीप्रमाणे २५ टक्के प्रवेश प्रक्रिया

परिणामकारक महसूल सेवेसाठी राज्यातील राजपत्रित अधिकाऱ्यांच्या प्रतिनियुक्तीवर बंधने

मुंबई : महसूल विभागातील राजपत्रित अधिकारी वारंवार आणि दीर्घकाळ इतर विभाग किंवा महामंडळांमध्ये प्रतिनियुक्तीवर

BMC : स्वच्छतेबाबत अधिकाऱ्यांनी स्वयंशिस्त मोडमध्ये यावे!

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : नागरी स्वच्छता ही अत्यंत महत्वाची बाब असल्याचे नमुद केले. स्वच्छतेकडे एखाद्या

BMC : 'मुंबईत एकही गटाराचे झाकण उघडे राहता कामा नये'

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : कोणत्याही परिस्थितीत एकही मनुष्य प्रवेशिका अर्थात गटाराची झाकणे उघडी राहणार नाही, याची