Ayodhya Ram Mandir : राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठेची तारीख जाहीर, राम मंदिर जनतेसाठी कधी खुले होणार?

अयोध्या : अयोध्येतील राम मंदिर (Ram Mandir) जनतेसाठी कधी खुले होणार याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात असतानाच आता अयोध्येतील राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठेची तारीख राम मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी जाहीर केली आहे. १५ ते २४ जानेवारी २०२४ दरम्यान राम मंदिरात श्रीरामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.


प्राणप्रतिष्ठेच्या शेवटच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण दिले जाणार आहे. प्राणप्रतिष्ठेनंतर राम मंदिराचे दरवाजे सर्व भाविकांसाठी खुले केले जातील, असेही नृपेंद्र मिश्रा म्हणाले.


मिश्रा पुढे म्हणाले की, अयोध्येसाठी हा फार मोठा उत्सव असेल. देशभरातील काही ठिकाणी हा कार्यक्रम व्हर्चुअली दाखवला जाईल. परदेशातील भारतीय दूतावासांमध्ये प्राणप्रतिष्ठा लाईव्ह पाहता यावी, यासाठी तयारी सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.


दरम्यान राम मंदिरातील गाभाऱ्याच्या मुख्य दरवाजावर सोन्याचे कोरीव काम असणार आहे. तसेच मंदिराचा १६१ फुटांच्या कळसालाही सोन्याचे आच्छादन असेल.



मंदिराचा पहिला टप्पा ३० डिसेंबर २०२३ पर्यंत तर ३० डिसेंबर २०२४ पर्यंत दुसरा टप्पा पूर्ण होणार


अयोध्येतील राम मंदिराचा पहिला टप्पा ३० डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार असल्याची माहिती नृपेंद्र मिश्रा यांनी दिली. पहिल्या टप्प्यात तळ मजल्यावरील पाच मांडव पूर्ण करण्यात येण्यार आहेत. यामध्ये एक प्रमुख गर्भगृह असणार ज्यामध्ये भगवान रामाच्या मूर्तीची स्थापना केली जाणार आहे. या पाच मांडवांच्या निर्मितीसाठी जवळपास १६० खांब असणार आहेत. मंदिराच्या सर्वात खालच्या भागात भगवान रामाच्या दर्शनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच वीज, पाणी या सारख्या इतर सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ही सर्व कामे ३० डिसेंबर पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.


मंदिराच्या दुसऱ्या टप्प्याविषयी माहिती देताना नृपेंद्र मिश्रा म्हणाले, मंदिराचा पहिला आणि दुसरा मजला ३० डिसेंबर २०२४ पर्यंत पूर्ण होणार आहे. संपूर्ण मंदिराचे काम कधीपर्यंत पूर्ण होणार या प्रश्नाला उत्तर देताना समिती प्रमुख नृपेंद्र मिश्रा म्हणाले, डिसेंबर २०२५ पर्यंत संपूर्ण मंदिराचे काम पूर्ण होणार आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports,

Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

२० हजार लोकांना रोजगार देणारा फॉर्म्युला गृहमंत्री अमित शाहांनी सांगितला; पाच कोटी रुपयांची गुंतवणूक करून ४२ दिवसांत ३५ कोटी रुपये कमावले

नवी दिल्ली: पाच कोटींची गुंतवणूक, ३५ कोटींची कमाई! आणि याला फार काळ लोटलेला नाही. इतकेच नाही, तर २०,००० हून अधिक

दिल्ली आणि इंदूरमधील आगीच्या दुर्घटनांबद्दल पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त

नवी दिल्ली : दिल्लीतील पालम आणि मध्य प्रदेशातील इंदूर येथे वेगवेगळ्या आगीच्या दुर्घटनांबद्दल पंतप्रधान

गुजरातच्या मुंद्रा बंदरात ८०,८८६  मेट्रिक टन कच्चे तेल घेऊन 'जग लाडकी' जहाज दाखल

गांधीनगर : पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, भारतीय ध्वज असलेले कच्चे तेल वाहून नेणारे जहाज 'जग लाडकी'

धक्कादायक घटना, EV ने घेतला सात जणांचा बळी

इंदूर : मध्य प्रदेशमध्ये इंदूरच्या बंगाली स्क्वेअरजवळील बृजेश्वरी कॉलनीत एक धक्कादायक घटना घडली. मनोज पुगालिया

दिल्लीत चार मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : दक्षिण-पश्चिम दिल्लीतील साध नगर, पालम परिसरात बुधवारी चार मजली इमारतीला आग लागल्याची घटना घडली. या

२८ फेब्रुवारीपासून आखाती देशांमधून किती भारतीय परतले ?, परराष्ट्र मंत्रालयाकडून खुलासा

नवी दिल्ली: अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर बदललेल्या परिस्थितीत, आखाती देशांमधून मोठ्या