Ayodhya Ram Mandir : राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठेची तारीख जाहीर, राम मंदिर जनतेसाठी कधी खुले होणार?

  157

अयोध्या : अयोध्येतील राम मंदिर (Ram Mandir) जनतेसाठी कधी खुले होणार याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात असतानाच आता अयोध्येतील राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठेची तारीख राम मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी जाहीर केली आहे. १५ ते २४ जानेवारी २०२४ दरम्यान राम मंदिरात श्रीरामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.


प्राणप्रतिष्ठेच्या शेवटच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण दिले जाणार आहे. प्राणप्रतिष्ठेनंतर राम मंदिराचे दरवाजे सर्व भाविकांसाठी खुले केले जातील, असेही नृपेंद्र मिश्रा म्हणाले.


मिश्रा पुढे म्हणाले की, अयोध्येसाठी हा फार मोठा उत्सव असेल. देशभरातील काही ठिकाणी हा कार्यक्रम व्हर्चुअली दाखवला जाईल. परदेशातील भारतीय दूतावासांमध्ये प्राणप्रतिष्ठा लाईव्ह पाहता यावी, यासाठी तयारी सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.


दरम्यान राम मंदिरातील गाभाऱ्याच्या मुख्य दरवाजावर सोन्याचे कोरीव काम असणार आहे. तसेच मंदिराचा १६१ फुटांच्या कळसालाही सोन्याचे आच्छादन असेल.



मंदिराचा पहिला टप्पा ३० डिसेंबर २०२३ पर्यंत तर ३० डिसेंबर २०२४ पर्यंत दुसरा टप्पा पूर्ण होणार


अयोध्येतील राम मंदिराचा पहिला टप्पा ३० डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार असल्याची माहिती नृपेंद्र मिश्रा यांनी दिली. पहिल्या टप्प्यात तळ मजल्यावरील पाच मांडव पूर्ण करण्यात येण्यार आहेत. यामध्ये एक प्रमुख गर्भगृह असणार ज्यामध्ये भगवान रामाच्या मूर्तीची स्थापना केली जाणार आहे. या पाच मांडवांच्या निर्मितीसाठी जवळपास १६० खांब असणार आहेत. मंदिराच्या सर्वात खालच्या भागात भगवान रामाच्या दर्शनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच वीज, पाणी या सारख्या इतर सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ही सर्व कामे ३० डिसेंबर पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.


मंदिराच्या दुसऱ्या टप्प्याविषयी माहिती देताना नृपेंद्र मिश्रा म्हणाले, मंदिराचा पहिला आणि दुसरा मजला ३० डिसेंबर २०२४ पर्यंत पूर्ण होणार आहे. संपूर्ण मंदिराचे काम कधीपर्यंत पूर्ण होणार या प्रश्नाला उत्तर देताना समिती प्रमुख नृपेंद्र मिश्रा म्हणाले, डिसेंबर २०२५ पर्यंत संपूर्ण मंदिराचे काम पूर्ण होणार आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports,

Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

सच्चा भारतीय असं बोलणार नाही, सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना फटकारले

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींविरुद्धच्या मानहानीच्या एका खटल्याला स्थगिती दिली. ही स्थगिती

काँग्रेसच्या महिला खासदारानं केली तक्रार, पोलीस अलर्ट, तपास सुरू

नवी दिल्ली : दिल्लीच्या चाणक्यपुरीत मॉर्निंग वॉक करताना चोरट्याने सोनसाखळी चोरली अशी तक्रार काँग्रेसच्या

झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन

नवी दिल्ली : झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे सोमवारी ४ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी प्रदीर्घ आजाराने निधन

Amarnath Yatra 2025: अमरनाथ यात्रेबद्दल सरकारचा मोठा निर्णय, एक आठवड्याआधीच यात्रा थांबवली! 'हे' आहे कारण

खराब हवामान आणि यात्रा मार्गांची बिघडलेली अवस्था जबाबदार श्रीनगर : वार्षिक अमरनाथ यात्रा आज (दिनांक ३ )

देवाला भेटण्यासाठी ५ व्या मजल्यावरून मारली उडी, महिलेची आत्महत्या

हैदराबाद: तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये एका धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. हिमायतनगर येथील ४३ वर्षीय पूजा

Operation Akhal: जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये ३ दिवसांपासून चकमक सुरू, आतापर्यंत ३ दहशतवादी ठार; २ दहशतवाद्यांना घेराव

कुलगाम: जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये ३ दिवसांपासून लष्कराचे ऑपरेशन अखल सुरू आहे. याद्वारे एके-४७ रायफल, एके