मुंबई: झी मराठी वाहिनीवरील बहुचर्चित ‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमाच्या तिसऱ्या सिझनमध्ये केंद्रीय सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांची राजकीय मुलाखत विशेष रंगली. यावेळी नारायण राणेंनी अनेक गौप्यस्फोट केले. मला शिवसेनेतून काढण्यासाठी उद्धव ठाकरेंनी कुटुंबासह दोनदा घर सोडलं, असा गौप्यस्फोट नारायण राणे यांनी केला.
नारायण राणे याआधीच्या सिझनमध्येही पत्नीसह सहभागी झाले होते. त्यावेळीही राणे यांनी गुप्तेंचा मंच गाजवला होता. यावेळी पहिला गौप्यस्फोट करताना ते म्हणाले, ‘ सध्या उबाठा गटाची जी परिस्थिती आहे ती त्यांनीच निर्माण केली आहे. आम्ही सगळे जायला तेच कारणीभूत आहेत. मी शिवसेनेत असतो तर त्यांची वाईट अवस्थाही झाली नसती. एक आमदार इकडचा तिकडे जाऊ शकत नव्हता. ४० तर सोडाच’ असं वक्यव्य नारायण राणे यांनी केलं.
‘बाळासाहेबांना जे वाटायचं राज्य कारभाराबद्दल ते मला चांगलं माहिती होतं. त्यामुळे त्यांना खात्री होती, की याला सांगायची गरज नाही, हा करणार. त्यांना एखादं पुस्तक मला द्यायचं असेल, तर ते लिहायचे, माझा शिवसैनिक नारायण राणे. नुसतं नारायण राणे म्हणून कधी पत्र लिहिलं नाही, माझा शिवसैनिक असायचंच’ अशी आठवणही राणेंनी सांगितली.
‘मला पक्षातून काढण्यासाठी उद्धव ठाकरेंनी दोनदा घर सोडलं. हॉलिडे इनमध्ये कुटुंबासह राहायला गेले होते. मात्र दोन्ही वेळा बाळासाहेबांना तयार करुन मी जाऊन आणलं, ते साहेबांना एकच धमकी द्यायचे, घर सोडायची’ असा खळबळजनक गौप्यस्फोट नारायण राणेंनी केला.
संजय राऊत यांना खासदार मी केला, तेव्हा खासदार झाले नसते, तर पुढे कधीच झाले नसते, हे माझं पाप आहे, अशी संजय राऊत यांच्याबद्दल खंतही यावेळी नारायण राणे यांनी बोलून दाखवली.
प्रा. नंदकुमार काकिर्डे मोदी सरकारने सुरू केलेल्या काही योजना देशातील सर्वसामान्यांपर्यंत चांगल्या रीतीने पोहोचल्या असून…
उमेश कुलकर्णी जागतिक व्यापार संघटनेला ट्रम्प यांच्या टॅरिफ राजवटीने एक मोठा झटका दिला आहे. त्याविरोधात…
डॉ. सर्वेश सुहास सोमण, samrajyainvestments@gmail.com शेअर बाजारात दीर्घकालीन गुंतवणूक ही नेहमीच फायद्याची ठरत आलेली आहे.…
महेश देशपांडे सरत्या आठवड्यामध्ये ऑटो जगताच्या दृष्टीने काही महत्त्वाच्या बातम्या समोर आल्या. पहिली म्हणजे ग्रामीण…
- अल्पेश म्हात्रे, मुंबई डॉट कॉम मुंबईची दुसरी लाईफ लाईन असलेल्या बेस्ट उपक्रमाबद्दल गेले महिनाभर…
- सुनील जावडेकर सत्ताकारणाला समाजकारणाची जोड दिली तर एखादा राजकीय नेता त्याच्या आयुष्यात काय चमत्कार…