जगण्यातला पाऊस

मनातले कवडसे : रूपाली हिर्लेकर


घन घन माला नभी दाटल्या
कोसळती धारा...
आभाळाचा शॉवर ऑन झालाय आणि त्यात आपण सर्व मनसोक्त भिजण्यास तयार झालो आहोत. यावेळी पावसाचं आगमन जरा उशिराच झालंय. तरीही तो आल्यामुळे सर्वांच्या चेहऱ्यावर हसू उमटलंय. मनं उल्हसित झाली आहेत.


प्रखर उन्हाच्या झळा सोसून उष्णतेचे चटके घेत घेत घामाच्या धारा वाहत असताना माणूस एकटक आभाळाकडे डोळे लावून पावसाच्या धारांची चातकाप्रमाणे वाट पाहत असतो आणि तसाही प्रत्येक सजीव-निर्जीव घटक या वर्षा ऋतूचीच आतुरतेने वाट पाहत असतो.


गदिमांनी केलेलं वर्णन आठवतं -
माऊलीच्या दुधापरी
आले मृगाचे तुषार…
भुकेजल्या तान्ह्यासम
तोंड पसरी शिवार…...
तापलेली, तृषार्त धरती पहिल्या पावसाच्या थेंबांनी सुगंधित होते. तिचा मत्त गंध सर्वत्र दरवळू लागतो. पावसांच्या सरींसोबत मनातही नवचैतन्याचा वर्षाव होतो. पहिल्या पावसात भिजणारी लहान मुलं, त्यांचा तो नाच पाहून वाटतं, त्या मुलांसोबत पानं, फुलं, वेली, रस्ते, दगड, माती, सारेच चिंब होऊन नाचतायत. पावसाच्या सरींचं गाणं त्यात सामील होतं. त्यांना साथ देत मग सर्वजण ताल धरतात. धमाल करतात.


पण हा पाऊस कधीकधी आपल्याला अंतर्मुखही बनवतो. पावसाची रूपं आणि माणसाचा जीवनक्रम यात मला खूप साधर्म्य जाणवतं. बघा ना, आपलं बालपण कसं छान, निरागस, लोभसवाणं असतं. बाळ जसं हळूहळू रांगतं, त्याप्रमाणे पाऊसही थेंबा-थेंबांनी जणू रांगत आपल्याकडे येतो. जसं बाळ मोठं होऊ लागतं, तसाच पाऊसही जोरदार हवेसोबत आपला आवेग वाढवतो. तारुण्यात माणसाचा उत्साह उच्च कोटीला असतो. त्याचप्रमाणे पाऊस ढगांच्या गडगटासह, विजांच्या लखलखाटासह धुवांधार बरसत असतो. तारुण्याच्या ऐन उंबरठ्यावर असताना जसं आपण गुलाबी रंगात न्हाऊन निघतो,  तसाच पाऊसही हलके- हलके, रिमझिम-रिमझिम प्रेमधारांनी वर्षाव करू लागतो. माणूस पोक्त होऊ लागतो, बरे-वाईट अनुभव घेऊन स्थिर होतो. शांत होतो. त्याचप्रमाणे पाऊसही धुवांधार बरसून झाल्यावर शांत होतो. स्थिर होतो. असं हे पावसाचं आणि माणसाचं नातं किंवा रूप सर्वच स्तरांवर एकसारखं जाणवतं.


पाऊस कधी सुखद रिमझिम धारा, तर कधी भीषण वादळं घेऊन येतो. माणसाच्या आयुष्यातही सुखदुःखही पावसाच्या सरींप्रमाणे येतात आणि जातात. माणसाचं आयुष्य असंच पावसाच्या वेगासारखं आहे.


पाऊस म्हणजे नवनिर्मितीची चाहूल. माणूसही आयुष्यात बऱ्याच सर्जनशील गोष्टींचा नव्याने वेध घेतो. चुकतो-धडपडतो, पुन्हा उठतो-सुधारतो. हे चक्र आयुष्यभर चालूच राहातं. पावसाचंही तसंच. पाऊस येतो आणि जातो. पुन्हा त्याच वेळेप्रमाणे येतो आणि आसमंत बहरून टाकतो. चराचर सृष्टीला हिरवा साज चढवतो. आपण म्हणतो ना की, 'नेमेची येतो मग पावसाळा, हे सृष्टीचे कौतुक जाण बाळा!'


चला तर मग, आपल्या मनमोराचा पिसारा फुलवलेल्या या पावसाचा आपणही पुरेपूर आनंद घेऊ या आणि त्याच्याप्रमाणेच सर्वत्र आनंदाची बरसात करू या!

Comments
Add Comment

‘असंभव’ वाटणारा थरार

टर्निंग पॉइंट : युवराज अवसरमल  अभिनय करता करता एखाद्या अभिनेत्याला दिग्दर्शक व्हावस वाटणं आपण समजू शकतो; परंतु

‘मी संसार माझा ...’ मालिकेतून सुरू होणार अनुप्रियाची गोष्ट

‘सन मराठी’वर ‘मी संसार माझा रेखिते’ या मालिकेचा प्रोमो पाहताच प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

‘अ परफेक्ट मर्डर’मध्ये दीप्ती भागवतचा रहस्यमय प्रवास!

“हिचकॉक म्हणजे थ्रिलचा राजा! त्यांच्या कलाकृतींमध्ये असलेला गूढपणा, रोमांच आणि भीतीचा सूक्ष्म खेळ नेहमीच मला

प्रयोग क्रमांक १३३३३... आणि प्रशांत दामले...!

राजरंग : राज चिंचणकर (अरे, हाय काय आणि नाय काय...) मराठी रंगभूमीवरचे ‘विक्रमादित्य’ म्हणून सार्थ ओळख असलेले

दिग्दर्शक देखील उपेक्षितच असतो! (भाग दोन)

भालचंद्र कुबल : पाचवा वेद मागच्या लेखावरून पुढे जाताना दिग्दर्शक हा नाट्यनिर्मितीच्या प्रक्रियेत उपेक्षितच

नाटकाच्या प्रयोगासाठी ‘उदकशांत’ करताना...

राजरंग : राज चिंचणकर नाटक हे नाटक असते आणि नाटकांच्या बाबतीत व्यावसायिक व प्रायोगिक असा भेदभाव केला जाऊ नये, अशी