Nitesh Rane : संजय राऊत पिसाळलेला कुत्रा!

  217

Nitesh Rane : आमदार नितेश राणे यांचा संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल


मुंबई : दिल्लीत एक भटका पिसाळलेला कुत्रा फिरतो आहे. तो दिसेल त्याला चावतो. येणाऱ्या जाणाऱ्या सगळ्यांना चावतो. त्या कुत्र्याची नसबंदी कधी करणार, असा सवाल भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी उपस्थित केला. काल मयुर शिंदे प्रकरणी संजय राऊत (Sanjay Raut) यांनीच हा बनाव रचल्याचा गौप्यस्फोट केल्यानंतर आज आमदार नितेश राणे यांनी राऊतांवर हल्लाबोल केला. त्यांनी म्हटले, की पाळीव कुत्रे हे मालकावर प्रेम करतात भटके कुत्रे आपल्या मालकालाही चावतात. ते कोणालाही चावू शकतात असं म्हणत नितेश राणे यांनी संजय राऊत यांना टोला लगावला.



ते म्हणाले, काल संपूर्ण महाराष्ट्राला संजय राऊत यांचं सत्य समजल्यावर हे श्री ४२० दिल्लीला पळून गेले. काल दिवसभर गायब होते. बघतो तर काय, हे दिल्लीत उगवलेले. पण मुंबई पोलिस त्यांना सोडणार नाहीत. आजचा सामनाचा अग्रलेख त्यांनी या प्रकरणापासून लक्ष विचलित करण्यासाठीच लिहिला आहे. पण खरंतर कालपासून राऊत बंधूंची गाळण उडाली आहे. ते भयभीत झाले आहेत. मयुर शिंदे हा दुसऱ्याच पक्षाचा असल्याचा आणखी एक बनाव ते रचत आहेत. पण भांडूपमध्ये यांचा कलेक्टर कोण आहे हे सर्वांना माहित आहे.



बर्नोलची मागणी वाढली


ते पुढे म्हणाले, काल आमच्या जय-वीरुची दोस्ती सर्वांनी पाहिली तेव्हापासून बर्नोलची मागणी वाढली आहे. महाविकास आघाडीच्या ऑफिसेसमधून बर्नोल खुप विकत घेतलं जातंय. तिथे लंडनलापण बर्नोल गेलंय असं मला समजलं आहे. आमचं महायुतीचं सरकार गुण्यागोविंदाने चालत आहे हे यांना हजम होतच नाहीये. त्यात त्यांनी कितीही मीठाचा खडा टाकायचा प्रयत्न केला तरी त्यांचे प्रयत्न सफल होत नाहीयेत. त्यामुळे संजय राऊतांनी आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करणं बंद करावं. आमचे टक्के काढण्यापेक्षा अडीज वर्षात तुम्ही किती टक्के खाल्ले हे पाहावं. संजय राऊत यांनी बर्नोलचा बॉक्स आता लंडनला पाठवावा असा खोचक सल्लाही यावेळी नितेश राणे यांनी दिला.



समान नागरी कायदा हवाच


यावेळी समान नागरी कायद्याला विरोध करणाऱ्यांचाही नितेश राणे यांनी समाचार घेतला. उद्धव ठाकरेंचं सरकार हे हिंदूविरोधी होतं. आमचं सरकार हे हिंदूंचा विचार करणार आहे. देशातील प्रत्येक नागरिकाला समान नागरि कायदा यावं असं वाटतं. पण महाविकास आघाडीच्या सुप्रिया सुळे यांनी मोदी सरकारने केलेला ट्रिपल तलाक विरोधी कायद्यावर टीका केली होती. ट्रिपल तलाक कायदा करुन मोदींनी मुस्लीम भगिनींना त्यांचा हक्क मिळवून दिला होता. आता यावर एक अग्रलेख लिहा असं आव्हान नितेश राणे यांनी संजय राऊत यांना दिलं आहे. संजय राऊत सुप्रिया सुळेंच्या वक्तव्यावर काही अग्रलेख लिहिणार नाहीत कारण अर्धा पगार बंद होईल असा टोलाही नितेश राणे यांनी लगावला.

Comments
Add Comment

राज्यात यापुढे पायाभूत सोयी सुविधेचा प्रकल्प तीन वर्षात पूर्ण करावा – मुख्यमंत्री

बोरिवली ते ठाणे दुहेरी बोगदा प्रकल्पाचा घेतला आढावा मुंबई : राज्यात यापुढे कुठलाही पायाभूत सोयी सुविधेचा

Ramdas Athawale : हिंदी ही राष्ट्रभाषा आहे आणि तिला विरोध करणं योग्य नाही, रामदास आठवलेंची प्रतिक्रिया...

मुंबई : राज्यात शाळांमध्ये त्रिभाषा सूत्र राबण्याचा सरकारने घेतलेला निर्णय वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. याच

Pratap Sarnaik : वाहतूक व्यवसायकांना फायदा होणार ! ई-चलन समस्या सोडवण्यासाठी समिती स्थापन करावी, परिवहन मंत्र्यांचे आदेश...

मुंबई : गेले अनेक वर्षापासून वाहतूक व्यावसायकांना ई-चलन संदर्भात अडचणींचा सामना करावा लागतोय, ही बाब सरकारच्या

हिंदी सक्ती विरोधात चढाओढ! ठाकरेंचे मोर्चे मराठीसाठी की राजकीय शक्ती दाखवण्यासाठी?

मुंबई : एक मुद्दा… पण दोन मोर्चे! आणि दोघंही 'ठाकरे'. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन बंधू एकत्र येतील, असं काही

Nitin Gadkari : दुचाकी चालकांकडून कोणत्याही टोल घेतला जाणार नाही, नितीन गडकरी यांची सोशल मीडियावरती पोस्ट...

मुंबई : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने १५ जलै २०२५ पासून दुचाकी वाहन चालकांकडून टोल वसूल करण्यात येईल. अशा

आदिवासी समाजाला अतिरिक्त आरक्षण ? मुख्यमंत्र्यांना पाठवणार प्रस्ताव...

मुंबई : राज्यात काही जिल्ह्यांमध्ये आदिवासी समाजाची संख्या जास्त आहे.  आदिवासी समाजातील तरुणांना नोकऱ्यांमध्ये