कच्छ: किनारपट्टीला धडकल्यानंतर बिपरजॉय चक्रीवादळाचा वेग सातत्याने कमी होत आहे. पण, धोका मात्र टळलेला नाही. जखाऊ आणि मांडवीसह कच्छ आणि सौराष्ट्रातील बहुतांश भागात मुसळधार पाऊस सुरु आहे. आता बिपरजॉय चक्रीवादळ राजस्थानच्या दिशेने पुढे सरकत आहे. येथील वाऱ्याचा वेग ताशी ७५ ते ८५ किलोमीटर इतका आहे.
बिपरजॉय चक्रीवादळामुळे आज आणि उद्या गुजरात आणि राजस्थानमध्ये मुसळधार पाऊस पडणार असल्याचं हवामान खात्यानं सांगितलं आहे. गुजरातशिवाय आणखी चार राज्यांमध्ये या चक्रीवादळाचा परिणाम दिसून येणार आहे. पुढील चार दिवस राजस्थान, पंजाब, हरियाणा, नवी दिल्ली आणि उत्तर प्रदेशमध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तसेच महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे.
गुजरातमधील अनेक जिल्ह्यांमध्ये बिपरजॉय चक्रीवादळाच्या प्रभावामुळे मुसळधार पावसासह जोरदार वादळी वारे वाहत आहेत. समुद्रातून उंच लाटा उसळत आहेत. किनारपट्टी भागात एनडीआरएफच्या आधीच्या १७ टीम्ससह एसडीआरएफच्या १२ तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी १५ टीम एअरलिफ्टसाठी तैनात करण्यात आल्या आहेत.
हेही वाचा…
मुंबई: सध्या सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. काश्मीर खोऱ्यातील पहलगाम (Pahalgam Terror Attack) येथे दहशतवाद्यांनी…
मुंबई(ज्ञानेश सावंत):मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद हा सामना हैदराबादमध्ये राजीव गांधी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम येथे…
अतिधोकादायक उपकरप्राप्त इमारतींची संख्या ९५ वर मुंबई (प्रतिनिधी) : दक्षिण मुंबईतील अंदाने १४ हजार इमारतीची…
पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्हा नियोजनमधून २ कोटी ३७ लाख दिला निधी सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) :…
नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात भारतीय नौदलाचे एक अधिकारी आणि आयबीच्या एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचा…