Nashik : नाशिक जिल्ह्यातील 'आठ' ग्रामसेवकांवर कारवाई

तीन निलंबित, तीन बडतर्फ तर दोघांच्या सेवा समाप्ताचा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा निर्णय


नाशिक : जिल्हा परिषदेच्या सीईओ आशिमा मित्तल यांनी चौकशीअंती जिल्ह्यातील आठ ग्रामसेवकांवर कारवाई निश्चित केली आहे. त्यात तीन ग्रामसेवक निलंबित, तीन बडतर्फ तर दोन कंत्राटी ग्रामसेवकांची सेवा समाप्ताची कारवाई प्रस्तावित करण्यात आल्याचे बोलले जात आहे. या कारवाईची माहिती देण्यास जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभाग टाळाटाळ करीत असल्याबद्दल विभागाच्या कार्य पद्धतीवर संशय व्यक्त होत आहे.


स्थानिक पातळीवर गावांचा विकास व्हावा, यासाठी राज्य व केंद्र सरकारकडून मिळणारा निधी आता थेट ग्रामपंचायतींच्या खात्यावर वर्ग केला जात आहे. या निधीतून गावांचा विकास व्हावा या ऐवजी अनेक ग्रामपंचायतीतील ग्रामसेवक हे सरपंचांसह पदाधिकाऱ्यांना हाताशी धरून स्वतःचा विकास साधत असल्याच्या तक्रारी ग्रामस्थांकडून सातत्याने केल्या जात आहेत. दुरूस्तीची कामे न करताच बिले काढणे, मर्जीतील लोकांना कामे मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे, नोंदवह्या १ ते ३३ नोंदी अपुर्ण असणे अशा विविध प्रकारचे ठपके यापुर्वीच ग्रामसेवकांवर ठेवून अनेकांचे निलंबन देखील करण्यात आले आहे. अशाच प्रकारे कामात अनियमितता करतानाच विविध आरोपांवरून आठ ग्रामसेवकांवर कारवाई प्रस्तुत करण्यात आली आहे.


अनेक गावांत ग्रामसेवक हजर राहात नसल्याच्या तक्रारीं सातत्याने वाढत आहे. त्यामुळे विकासकामे देखील रखडली आहे. सरकारच्या विविध योजनांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी त्या त्या गावांतील ग्रामसेवकांवर असते. परंतु ग्रामसेवक त्याकडे दुर्लक्ष करतात. परिणामी, अनेक कामे अपूर्ण राहतात. ती मुदतीत पूर्ण होत नाहीत. त्यामुळे ग्रामसेवकांविरुद्ध ग्रामीण भागात तक्रारींचे प्रमाण दिवसेंदिवस वाढू लागले आहे. याबाबत प्रशासनाकडून कोणतीही कार्य वाही होत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

Comments
Add Comment

Solapur Accident: पिकअप गाडी विहिरीत कोसळून आठ जणांचा मृत्यू; परिसरात खळबळ!

सोलापूर : सोलापूरच्या माळशिरस मधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पिकअप गाडी विहिरीत कोसळल्यामुळे आठ जणांचा

The honor of the palanquin : पालखी रथ आणि चौघडागाडीचा मान पुन्हा संस्थानच्या बैलजोड्यांना

पुणे : जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात पालखी रथ ओढण्याचा तसेच चौघडागाडीचा मान यंदाही श्री संत

जून महिना अर्धा संपला तरीही उन्हाचे चटके कायम

लातूर : जून महिना अर्धा संपत आला असताना लातूर जिल्ह्यात उन्हाचा कडाका कायम आहे. मान्सूनच्या आगमनाकडे

Pune : धरणांतील जलसाठ्यात घट, पाणी जपून वापरण्याचे निर्देश

राज्‍यातील अपु-या पर्जन्‍यमानाच्‍या पार्श्‍वभूमीवर तसेच धरणातील उपलब्‍ध पाणीसाठा विचारात घेवून ३१ ऑगस्‍ट

Pan Masala Sumggling: शेगावात मध्यरात्री ७० लाखांच्या प्रतिबंधित पानमसाल्यासह ट्रक जप्त

Buldhana : पवित्र तीर्थक्षेत्र असलेल्या शेगाव शहरात अन्न व औषध प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने संयुक्तपणे मोठी कारवाई

Akola Murder Case: धक्कादायक! अकोल्यात 29 वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने हत्या; अनैतिक संबंधाच्या संशयातून खून

अकोला: अकोला (Akola) शहरात जुन्या वादातून 29 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या (Murder) करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली