Cyclone Biparjoy : मुंबईतही समुद्र खवळला! पोलिसांनी सर्व चौपाट्या बंद केल्या

चौपाटीवर सकाळी ८ ते रात्री ११ दरम्यान जीवरक्षक, सुरक्षा रक्षकांचा कडक पहारा


मुंबई : बिपरजॉय चक्रीवादळाचा (Biparjoy Cyclone Update) परिणाम मुंबईतही जाणवू लागला असून मुंबईचा समुद्र खवळला आहे. समुद्रात उंचच उंच लाटा उसळत आहेत. यामुळे खबरदारी म्हणून मुंबईच्या सर्व चौपाट्या आणि सीफेस बंद करण्यात आले आहेत. चौपाटींवर जाणा-या लोकांना पोलिसांकडून अडवण्यात येत आहे. शिवाय जीवरक्षक ही चौपाट्यांवर खबरदारीचा उपाय म्हणून तैनात केले आहेत.


बिपरजॉय चक्रीवादळ आज रात्री गुजरातवर धडकणार आहे. हे चक्रीवादळ सध्या किनाऱ्यापासून १८० किमी अंतरावर आहे. बिपरजॉय आता समुद्रात ज्या ठिकाणी आहे, तिथे वाऱ्याचा वेग ताशी १२० किमी एवढा आहे. मुंबईत समुद्रकिनारी आणि चौपाट्यांवर नागरिक मोठ्या प्रमाणात जात असतात. त्यांनी पोहण्यासाठी किंवा इतर कोणत्याही कारणाने समुद्रात शिरु नये, यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने खबरदारी घेण्यात आली आहे. तरी देखील काही नागरिक समुद्रात जातात व प्रसंगी बुडण्याच्या काही घटना घडतात. यामुळे गिरगाव, दादर, जुहू, वर्सोवा, आक्सा आणि गोराई या चौपाट्या बंद केल्या असून याठिकाणी सकाळी ८ ते रात्री ११ दरम्यान दोन शिफ्टमध्ये प्रत्येकी ६० जीवरक्षक, सुरक्षा रक्षकांचा कडक पहारा ठेवण्यात आला आहे.


मुंबईला सुमारे १४५ किलोमीटर लांबीचा अरबी समुद्राचा किनारा लाभला आहे. गिरगाव आणि दादर चौपाटी शहर विभागामध्ये तर जुहू, वर्सोवा, आक्सा आणि गोराई या चौपाटी पश्चिम उपनगरात आहेत. नागरिक तसेच पर्यटकांनी समुद्राच्या पाण्यात जाऊ नये, यासाठी प्रशिक्षित सुरक्षा रक्षक आणि जीवरक्षक आवाहन करणार आहेत.


महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांच्या निर्देशांनुसार १२० प्रशिक्षित सुरक्षा रक्षकांची (Security Guards) नेमणूक करण्यात आली आहे. महानगरपालिकेच्या वतीने विविध उपाययोजना करूनही बरेचदा नागरिक किंवा पर्यटक नियमभंग करतात. १२ जून २०२३ रोजी वर्सोवा, सांताक्रुझ (पूर्व) येथील ८ तरुण अशाच प्रकारे समुद्रात शिरले. दुर्दैवाने ते समुद्राच्या लाटेत ओढले गेले आणि त्यापैकी चार तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. जीवरक्षकांनी मज्जाव केला तरीही त्यांचे लक्ष चुकवून या तरुणांनी समुद्राच्या पाण्यात उतरण्याचा प्रयत्न केल्याने ही दुर्घटना घडली. अशाप्रकारच्या घटना भविष्यात घडू नये यासाठी सहाही समुद्र चौपाट्यांवर पूर बचावाचे प्रशिक्षण घेतलेले शहर आपत्ती प्रतिसाद पथकातील सुरक्षा रक्षक नेमणूक करण्याचे निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांनी आपत्कालीन व्यवस्थापन विभागाच्या आढावा बैठकीत दिले.


दरम्यान, गुजरातमध्ये लँडफॉल झाल्यावर ताशी १२० ते १४५ किमी इतक्या भयंकर वेगानं वारे वाहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. खबरदारी म्हणून तब्बल ७४ हजार नागरिकांना सुरक्षितस्थळी हवलण्यात आले आहे. गुजरातमध्ये एनडीआरएफच्या १८ तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. लष्कर, नौदल आणि वायुदलाची देखील मदत घेण्यात आली आहे.

Comments
Add Comment

ससून डॉकचे आधुनिकीकरण आणि डिजिटायझेशन करण्यासाठी फिनलंडच्या प्रतिनिधींसोबत मंत्री नितेश राणे यांची चर्चा

मुंबई : मुंबईतील ससून डॉकच्या डिजिटायझेशन आणि आधुनिकीकरण संदर्भात मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

Mumbai Local Train Murder Case: मुंबई लोकलमधील थरारक हत्याकांडाचा उलगडा; आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

मुंबई पोलिसांच्या तात्काळ कारवाईने आरोपीला २४ तासाच्या आत अटक  Mumbai Local Train Murder Case : मुंबई: मुंबईच्या (Mumbai) लोकल

Nitesh Rane : भारतात बाबासाहेबांचे संविधानच चालेल, 'शरिया कानून' नाही!

परतूरच्या घटनेवरून मंत्री नितेश राणेंनी ठणकावले; जिहाद आणि शरिया कायद्याची भाषा करणाऱ्या संघटनांवर बंदी

Nilesh Rane : सिंधुदुर्गमधील घरकुलांसाठी गायरान आणि शासकीय जमिनी देणार

आमदार निलेश राणे यांच्या प्रश्नावर ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे सकारात्मक उत्तर; नवीन घरकुलांना जमीन

CM Devendra Fadnavis: २०२९-३० पर्यंत महाराष्ट्रातील वीज दर गुजरातपेक्षाही स्वस्त होणार; मुख्यमंत्र्यांचे विधान परिषदेत आश्वासन

वीज यंत्रणा सक्षम होणार, ३ वर्षांत 'डीपी' फेल होणे थांबणार मुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेच्या पावसाळी

नाशिक TCS धर्मांतर प्रकरणावर विधान परिषदेत चर्चा : मुख्यमंत्र्यांकडून विशेष महिला समितीची घोषणा

मुंबई : राज्यातील बहुराष्ट्रीय आणि आयटी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या उच्चशिक्षित महिलांना लक्ष्य करून त्यांचे