बोईसर : बोईसर येथील अवध नगर भागातील भंगार गोडाऊनला रात्री दोन वाजताच्या सुमारास लागलेल्या अग्नितांडवात (Boisar Fire) भंगाराची १५ गोडाऊन जळून खाक झाली. त्यातच बिपरजॉय चक्रीवादळाच्या वादळी वाऱ्यामुळे आगीने रौद्ररूप घेतले. आगीशी झुंज देत पहाटे साडे सहा वाजताच्या सुमारास तारापूर अग्निशमन दलाच्या जवानांना सहा गाड्यांसह आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले.
गेल्या अनेक वर्षांपासून अनधिकृतपणे उभारण्यात आलेली बांधकामे, चाळी, बेकायदेशीर गोदामे याकरिता अवध नगर परिसर ओळखले जाते. याठिकाणी सुमारे दोन ते तीन एकरमध्ये दाटीवाटीने उभारण्यात आलेली ही भंगार गोडाऊन असून, या भीषण आगीत सुदैवाने जीवितहानी झाली नसली, तरी एक पिकअप गाडी जळून खाक झाली आहे़ तर दोन छोटे टेम्पो व लागून असलेली वीस ते पंचवीस गोडाऊन वाचविण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे.
हे अग्नितांडव आटोक्यात आणण्यासाठी तारापूर एमआयडीसी अग्निशमन दलाच्या दोन गाड्या, पालघर नगरपरिषद १, तारापूर अणुऊर्जा केंद्र १, वसई-विरार महानगरपालिका १ व डहाणूच्या अदानी पॉवर स्टेशनची १ गाडी अशा एकूण सहा अग्निशमन गाड्यांवरील जवान शर्तीचे प्रयत्न करीत होते.
दरम्यान, वादळी वाऱ्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवण्याकरता प्रचंड अडचणी येत होत्या, पाच तासांच्या अथक प्रयत्नाअंती अग्नीशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले असले तरी सकाळी १० वाजता पुन्हा आगीने थोडे डोके वर काढले होते.त्या वेळी पुन्हा लागलीच आग विझविण्यात आली. सदर आग विझविण्यासाठी सुमारे दीड ते दोन लाख लिटर पाणी लागले असुन सुदैवाने ती आग लोकवस्तीपर्यंत पोहोली नसल्याने मोठी जीवितहानी टळली असली तरी मात्र दाटीवाटीने उभारण्यात आलेल्या या भंगार गोदामांवर संबधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी जोर धरत आहे. दरम्यान लागलेल्या आगीचे निश्चित कारण स्पष्ट झाले नाही.
मुंबई(ज्ञानेश सावंत): रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा संघ पावसामुळे मागच्या सामन्यात पंजाब कडून दारुण पराभूत झाला. सुरुवातीचे…
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील आठवड्यात सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार,…
ग्राहकांची फसवणूक करणाऱ्यांचे परवाने रद्द होणार मुंबई (प्रतिनिधी) : बनावट पनीर किंवा चीन ऍनालॉग वापरणाऱ्यांवर…
पालिका क्षेत्रात चार हजार ४०७ इमारती धोकादायक ठाणे (वार्ताहर) : ठाणे पालिका क्षेत्रात धोकादायक व…
काटकसरीने पाण्याचा वापर करण्याचे पालिकेचे आवाहन मुंबई (प्रतिनिधी): मुंबई चेंबूर येथील अमर महल जंक्शनजवळ नागरिकांना…
साप्ताहिक राशिभविष्य, रविवार, १३ ते १९ एप्रिल २०२५ आर्थिक परिस्थिती मनासारखी राहील मेष : हा…