Juhu Chowpatty : जुहू चौपाटीवर बुडालेल्या तीन मुलांचे मृतदेह सापडले, एकजण अद्यापही बेपत्ता!

  252

मुंबई : जुहू चौपाटीवर (Juhu Chowpatty) सोमवारी सायंकाळी समुद्रात बुडालेल्या तीन मुलांचे मृतदेह तब्बल २० तासांच्या शोध मोहिमेनंतर सापडले आहेत. परंतु जय रोहन ताजभारिया (१६) याचा शोध अद्याप सुरू आहे.


'बिपरजॉय' चक्रीवादळामुळे पर्यटकांनी समुद्रात जाऊ नये, असा इशारा हवामान विभाग, पालिका प्रशासनाकडून देण्यात आला असतानाही सांताक्रूझ वाकोला येथील पाच मुले जीवरक्षक दल, पोलीस तसेच स्थानिकांची नजर चुकवून समुद्रात गेले. या पाचही जणांना स्थानिकांनी हटकले आणि तेथून निघून जाण्यास सांगितले. मात्र, त्याकडे मुलांनी दुर्लक्ष केले. याचा परिणाम म्हणजे खवळलेल्या समुद्रात ते बुडाले, अशी माहिती स्थानिकांनी दिल्याचे अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले.


ही मुले समुद्रात बुडत असल्याचे निदर्शनास आल्यावर तेथील कोळी बांधवांनी धर्मेश ताजभारिया (१६) याला कसेबसे समुद्राबाहेर काढण्यात यश आले. मात्र, इतर चौघे जण समुद्रात बुडाले.


सोमवारी वाकोला परिसरातील ८ मुलांनी पाऊस पडत असल्याने ते क्रिकेट खेळायला जात आहेत, असे सांगितले. त्यांनी १० ते २० रुपये घेतले. पण ते जुहू चौपाटीवर जात असल्याची माहिती दिली नाही. संध्याकाळी मुले बुडाल्याचे समजले. यापैकी दोघे सख्खे भाऊ आहेत.



मृत मुलांची नावे


मनीष योगेश ओगानिया (१६)
शुभम योगेश ओगानिया (१५)
धर्मेश वालजी फौजिया (१६)

Comments
Add Comment

नारायण राणे यांचे उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्ले

नारायण राणे यांचे धक्कादायक विधान मुंबई : खासदार नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी

“पक्षाने माझ्यावर उपकार केलेत” - रविंद्र चव्हाण

भाजप प्रदेशाध्यक्ष झाल्यावर व्यक्त केले मनोगत मुंबई : अतिशय सामान्य कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या

बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार

मुंबई : बीड येथील अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन

अधिक व्याजाचे आमिष देणाऱ्या योजनांविरोधात पोलिसांची विशेष मोहीम

मुंबई : राज्यात अधिक व्याजदराचे आमिष दाखवून नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या योजनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी

अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतात महाराष्ट्राची भरारी

सहकारातून प्रथमच पंपस्टोरेज प्रकल्प; १००८ कोटी रुपये गुंतवणूक, २४० मेगावॉट वीजनिर्मिती मुंबई : महाराष्ट्राने

मोठी बातमी! पंढरपूर आषाढी वारीदरम्यान अपघात किंवा मृत्यू झाल्यास सरकार देणार ४ लाखांची मदत

मुंबई : महाराष्ट्राचा आध्यात्मिक उत्सव मानला जाणारा पंढरपूर आषाढी वारी सोहळा सध्या उत्साहात सुरू आहे. अशातच आता