Cabinet Decision : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आले 'हे' महत्त्वाचे निर्णय

कंत्राटी कामगार व शेतक-यांना मोठा दिलासा


मुंबई : आज सकाळी ११ वाजता सुरु झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या (Cabinet Decision) बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. या बैठकीत कंत्राटी कामगार व शेतक-यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कंत्राटी ग्रामसेवकांच्या वेतनात तब्बल १० हजार रुपयांची वाढ होणार आहे. तर पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सुधारित दराने तात्काळ मदत करण्यात येणार असून १,५०० कोटींची मान्यता देण्यात आली आहे.


कंत्राटी ग्रामसेवकांचे वेतन ६ हजार होते, मात्र आता त्यात १० हजारांची वाढ होऊन वेतन १६ हजार होणार असल्याने ही त्यांच्यासाठी खुशखबर आहे. तसंच शेतक-यांना आताच्या नवीन दराप्रमाणे मदत मिळणार आहे. जिरायती शेतीला ८,५०० तर बागायती शेतीला १७,००० रुपये या दराने मदत मिळणार आहे. त्यामुळे ही शेतक-यांसाठी दिलासादायक बाब आहे.


या मोठ्या निर्णयासोबतच आणखी काही महत्त्वाचे निर्णय राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले आहेत.


१. कंत्राटी ग्रामसेवकांच्या मानधनात वाढ वेतनात १० हजार रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.


२. सततच्या पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यासाठी १,५०० कोटी रुपयांची मान्याता देण्यात आली आहे.


३. अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी निर्वाह भत्त्यात सुधारणा करण्यात आलेली आहे.


४. पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी शिष्यवृत्तीत वाढ करण्यात आली आहे.


५. अतिरिक्त न्यायालये व जलदगती न्यायालयांना दोन वर्षांची मुदतवाढ देण्यात आलेली आहे.


६. चिमूर आणि शिर्डी येथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय स्थापन केलं जाणार आहे.


७. लातूर येथे पशुरोग निदान प्रयोगशाळा स्थापन करण्यात येणार आहे.


८. पुणे येथे ४ अतिरिक्त कौटुंबिक न्यायालये स्थापन केली जाणार आहेत.


९. मानसिक आजारमुक्त व्यक्तींकरता पुनर्वसन गृहे योजना राबवण्यात येणार आहे.


१०. स्वातंत्र्य सैनिकांना घरांसाठी जमीन देण्यासाठी कौटुंबिक मासिक उत्पन्न मर्यादा वाढविली आहे.

Comments
Add Comment

Poison Capsule Case: विषारी कॅप्सूल वाटप प्रकरणात सायको किलरचा मास्टरप्लॅन; AI ला विचारले नको ते प्रश्न 

मुंबई: मुंबईतील (Mumbai) मोहरम मिरवणुकीदरम्यान विषारी कॅप्सूल वाटप (Poison Capsule Case) करण्याच्या संशयित कटाचा मुंबई

लोकल प्रवाशाच्या हत्येनंतर रेल्वे पोलिसांचा निर्णय; स्थानकांवर बॅगांची होणार तपासणी

मुंबई : मुंबईची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या उपनगरीय लोकल रेल्वेत प्रवाशाच्या हत्येनंतर रेल्वे पोलिसांनी

'निवडक प्रकल्पांमुळे पालघर जिल्हा होणार राज्याच्या विकासाचे ग्रोथ इंजिन'

वाढवण बंदर, बुलेट ट्रेन, विमानतळ आणि सागरी सेतूची मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली पाहणी पालघर : राज्याच्या पायाभूत

Mumbai News: मुंबईकरांसाठी धोक्याची घंटा! पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील साठा ७.०८ टक्क्यांवर

मुंबई : मुंबईला (Mumbai) पाणीपुरवठा करणाऱ्या सात प्रमुख तलावांतील पाणीसाठा अद्याप चिंताजन

Bhendi Bazaar Fire : दक्षिण मुंबईत मध्यरात्री खळबळ! भेंडी बाजारजवळ बीएमसीच्या भूमिगत केबलला आग; परिसरात भीतीचे वातावरण

मुंबई : दक्षिण मुंबईतील भेंडी बाजार परिसरात रविवारी उशिरा रात्री भूमिगत बीएससी (BSC) केबलला अचानक आग लागल्याने

मढ-वर्सोवा पूलाच्या बांधकाम आता जोरात; विविध पर्यावरणीय परवानगी प्राप्त

कांदळवन विभागाला भरणार साडेबारा कोटींचे शुल्क मुंबई : मुंबई महानगरपालिकेने हाती घेतलेल्या के/पश्चिम व पी/उत्तर