मुंबई : राज्याबाहेरून आलेल्या परप्रांतीय लोकांनी मोठ्या प्रमाणात नाल्यांवर बांधलेल्या झोपड्या, केलेली अतिक्रमणे आणि मतांसाठी त्यांना पाठीशी घालणारे लोकप्रतिनिधी यामुळेच मुंबईतील नाले पावसाळ्यात तुंबत असल्याचा आरोप मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे.
प्रत्येक संकटात लोकांच्या मदतीला मनसे धावते, मात्र मतदान पिळवणूक करणाऱ्यांनाच होते अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
मनसेच्या आपत्कालीन व्यवस्थापन पथकाच्या मेळाव्याला राज यांनी मार्गदर्शन केले. पक्षाची स्थापना करताना इतर पक्षांनी जे केले नाही ते आपल्याकडे असले पाहिजे, म्हणूनच नवनिर्माण हा शब्द वापरला. आणि त्यामुळेच पक्षाच्या वेगवेगळया शाखा तसेच आपत्कालीन व्यवस्थापन पथक स्थापन केले, असे प्रारंभीच स्पष्ट करून ठाकरे म्हणाले, आपत्कालीन परिस्थितीत मुंबईतील अग्निशमन दलाचे जवान, पोलीस कोणत्या परिस्थितीत काम करत असतात आपण पाहिले पाहिजे. पण त्यांचे ज्या प्रमाणात कौतुक व्हायला पाहिजे तितक्या प्रमाणात होत नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.
नवी दिल्ली : देशातील सर्वात स्पर्धात्मक परीक्षांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या UPSC CSE मध्ये दरवर्षी…
मुंबई : 'मुंबईतील लँड स्कॅमचा बादशाह जर कोणी असेल, तर तो उद्धव ठाकरेच!' अशा शब्दांत…
कोविड महामारी दरम्यान संसर्ग झालेल्या लोकांना हृदयरोगांचा धोका सर्वाधिक मुंबई: गेल्या वर्षातील आकडेवारी पाहिल्यास असे…
पुणे : विद्येचं माहेरघर असणाऱ्या पुण्यात गुन्हेगारीचं क्षेत्र वाढतं चाललं आहे. दररोज कोणत्या ना कोणत्या…
मुंबई : झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवर पाच वर्षांपूर्वी 'देवमाणूस' (Devmanus) ही मालिका सुरु झाली…
मुंबई: "भिऊ नको मी तुज्या पाठीशी आहे" संकट काळात स्वामी समर्थांच हे वाक्य जगण्यासाठी नवी…