मुंबईतील नाले का तुंबतात? राज ठाकरे यांनी स्पष्टच सांगितले…

Share

मुंबई : राज्याबाहेरून आलेल्या परप्रांतीय लोकांनी मोठ्या प्रमाणात नाल्यांवर बांधलेल्या झोपड्या, केलेली अतिक्रमणे आणि मतांसाठी त्यांना पाठीशी घालणारे लोकप्रतिनिधी यामुळेच मुंबईतील नाले पावसाळ्यात तुंबत असल्याचा आरोप मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे.

प्रत्येक संकटात लोकांच्या मदतीला मनसे धावते, मात्र मतदान पिळवणूक करणाऱ्यांनाच होते अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

मनसेच्या आपत्कालीन व्यवस्थापन पथकाच्या मेळाव्याला राज यांनी मार्गदर्शन केले. पक्षाची स्थापना करताना इतर पक्षांनी जे केले नाही ते आपल्याकडे असले पाहिजे, म्हणूनच नवनिर्माण हा शब्द वापरला. आणि त्यामुळेच पक्षाच्या वेगवेगळया शाखा तसेच आपत्कालीन व्यवस्थापन पथक स्थापन केले, असे प्रारंभीच स्पष्ट करून ठाकरे म्हणाले, आपत्कालीन परिस्थितीत मुंबईतील अग्निशमन दलाचे जवान, पोलीस कोणत्या परिस्थितीत काम करत असतात आपण पाहिले पाहिजे. पण त्यांचे ज्या प्रमाणात कौतुक व्हायला पाहिजे तितक्या प्रमाणात होत नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.

Recent Posts

UPSC CSE Result : ‘यूपीएससी’चा निकाल जाहीर! महाराष्ट्राचा अर्चित डोंगरेने मारली बाजी

नवी दिल्ली : देशातील सर्वात स्पर्धात्मक परीक्षांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या UPSC CSE मध्ये दरवर्षी…

21 minutes ago

लँड स्कॅमचा बादशाह उद्धव! आशिष शेलारांचा थेट घणाघात

मुंबई : 'मुंबईतील लँड स्कॅमचा बादशाह जर कोणी असेल, तर तो उद्धव ठाकरेच!' अशा शब्दांत…

23 minutes ago

Heart Attack: गेल्या काही वर्षांत हृदयविकाराच्या घटनांमध्ये वाढ का झाली आहे? अभ्यासात मोठा खुलासा

कोविड महामारी दरम्यान संसर्ग झालेल्या लोकांना हृदयरोगांचा धोका सर्वाधिक मुंबई: गेल्या वर्षातील आकडेवारी पाहिल्यास असे…

58 minutes ago

Pune News : पुण्यात रोड रेजचा धक्कादायक प्रकार; हॉर्न वाजवला म्हणून जोडप्याला मारहाण

पुणे : विद्येचं माहेरघर असणाऱ्या पुण्यात गुन्हेगारीचं क्षेत्र वाढतं चाललं आहे. दररोज कोणत्या ना कोणत्या…

1 hour ago

Devmanus 3 : ‘या माप घेतो म्हणत’ देवमाणूस परत आला! पहा थरारक प्रोमो

मुंबई : झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवर पाच वर्षांपूर्वी 'देवमाणूस' (Devmanus) ही मालिका सुरु झाली…

1 hour ago

Abhijna Bhave: स्वामींच्या मठात जाताना अभिनेत्रीच्या नवऱ्याला आला वेगळाच अनुभव!

मुंबई: "भिऊ नको मी तुज्या पाठीशी आहे" संकट काळात स्वामी समर्थांच हे वाक्य जगण्यासाठी नवी…

3 hours ago