सौरभ पिंपळकर भाजपचाच पण त्याने धमकी दिली नाही : चंद्रशेखर बावनकुळे

श्रीकांत शिंदेंची नाराजी केली दूर


मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना काल सोशल मिडीयावर धमकी देण्यात आली होती. ही धमकी सौरभ पिंपळकर नावाच्या एका व्यक्तीच्या ट्विटर हॅंडलवरुन आल्याचे समोर आले होते. ही व्यक्ती भाजपचा अमरावतीतील कार्यकर्ता असल्याचे सांगण्यात येत होते. यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सौरभ हा भाजपचाच कार्यकर्ता असल्याचे मान्य केले. मात्र सौरभने कोणत्याही प्रकारची धमकी दिलेली नाही, असा दावा त्यांनी केला. 'धमकी देणे भाजपच्या रक्तात नाही' या कालच्या वक्तव्यावर ते ठाम असल्याचे दिसून येत आहे.


कुठलेही रेकॉर्ड काढून तपासा सौरभ पिंपळकरने शरद पवार साहेबांना धमकी दिलेली नाही, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. धमकी वेगळ्या अकाऊंटवरुन आहे, त्यामुळे त्याला सपोर्ट करणंदेखील वाईट आहे आणि त्याचं आम्ही समर्थन करत नाही, असं ते म्हणाले. तसेच मागच्या अडीच वर्षांत मविआच्या काळात देवेंद्र फडणवीसांबद्दल याहून वाईट, धमकीवजा अश्लील भाषेत मोठ्या प्रमाणावर जे लिहिलं गेलं त्यावरदेखील कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी चंद्रशेखर बावनकुळेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे केली आहे.



श्रीकांत शिंदेंना यावेळी जास्त मतांनी निवडून आणू


'कल्याण-डोंबिवली मतदारसंघात भाजप आणि शिवसेना या दोन पक्षांत सगळं काही आलबेल नाही आहे' या खासदार श्रीकांत शिंदे यांच्या वक्तव्यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. यावेळी भाजप-सेना युती घट्ट असल्याचं ते म्हणाले. याबाबत बैठक घेणार असून आम्ही शिंदे गटाला ताकद देऊ आणि श्रीकांत शिंदेंना यावेळी जास्त मतांनी निवडून आणू, असं ते म्हणाले.



संबंधित बातमी -

Comments
Add Comment

Rain Update : मुंबईसह राज्यात मुसळधार पावसाचा धुमाकूळ

मुंबई : राज्यातील अनेक जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याचं पाहायला मिळालं.मुंबई,

मत्स्यव्यवसाय व पशुसंवर्धन क्षेत्रात विकासासाठी महाराष्ट्रात मोठ्या संधी

मत्स्यव्यवसाय सुधारणा व दीर्घकालीन विकासासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक मुंबई : राज्यात

सूर्यकुमार यादवला पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या संतोष जगदाळेंच्या पत्नीने सुनावले

पहलगाम हल्ल्यातील बळींना विजय समर्पित करण्याऐवजी, पाकिस्तानविरुद्ध खेळायलाच नको होते. डोंबिवली: भारताने आशिया

महिला क्रिकेटपटूंचा एमसीएकडून खास सन्मान!

मुंबईची ऐतिहासिक वाटचाल एका भिंतीवर मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) महिला क्रिकेटपटूंना अनोख्या पद्धतीने

...म्हणून मुंबईत वाढला पावसाचा जोर

मुंबई : गणेशोत्सवानंतर काही दिवस पावसाचा जोर एकदम ओसरला होता. पण १२ सप्टेंबरपासून पावसाचा जोर हळू हळू वाढत गेला.

नारळासाठी ४५ रुपयांची फोडणी; आवक घटल्याने मुंबईकरांना भुर्दंड

मुंबई : सण, उत्सव कालावधीत नारळाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मुंबईकरांना सध्या या नारळासाठी ४५ ते ५० रुपये मोजावे