लंडन : लंडनमधील ओव्हल क्रिकेट मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळला जात आहे. या जेतेपदाच्या लढतीत तीन दिवस खेळले गेले असून चौथ्या आणि पाचव्या दिवशीच्या खेळीवर पावसाचे सावट निर्माण झाले आहे. येथील स्थानिक हवामान संस्थेने दिलेल्या अहवालानुसार, आजपासून पुढील तीन दिवस पावसाचा अंदाज वर्तवला आहे. यामुळे ऑस्ट्रेलियन चाहत्यांची चिंता वाढली असून भारतीय चाहत्यांना मात्र आनंद झाला आहे.
चौथ्या दिवसाचा खेळ लंडनच्या स्थानिक वेळेनुसार सकाळी १०.३० वाजता आणि भारतीय वेळेनुसार दुपारी ३ वाजता सुरू होईल. ऑस्ट्रेलियन संघ आज भारतासमोर मोठे लक्ष्य ठेवू इच्छितो. परंतू Accuweather या हवामान संस्थेने दिलेल्या अहवालानुसार, केवळ चौथ्या दिवशीच नाही तर पाचव्या दिवशी आणि सोमवारी राखीव दिवशीही पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे.
आज चौथा दिवस असून दिवसभरात ५५ टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. शनिवारी ३.८८ मिमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच वादळी वाऱ्याची शक्यता आहे. त्याचवेळी, सुमारे एक तास विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. याशिवाय लंडनमध्ये शनिवारी दुपारी २ ते ९ या वेळेत वादळाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
त्यामुळे चालू असलेल्या सामन्यावर नजर टाकली तर दुसऱ्या आणि तिसऱ्या सत्राच्या खेळावर याचा परिणाम होऊ शकतो. दुसरीकडे, शनिवारनंतर रविवारी लंडनमध्ये ८८ टक्के पाऊस आणि सोमवारी ८० टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. याचा खेळावर परिणाम होऊ शकतो.
मात्र ड्रेनेजची व्यवस्था चांगली असल्याने दिवसभर वाहून जाण्याची शक्यता कमी आहे. मात्र दोन दिवसांत काही शक्य झाले नाही तर सहाव्या दिवशी निकालासाठी सामना होणार आहे.
गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…
फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…
महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…
मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…
मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…