भारत आणि ऑस्ट्रेलिया अंतिम सामन्यावर पावसाचे सावट!

ऑस्ट्रेलियन चाहत्यांची चिंता वाढली तर भारतीय चाहत्यांना झाला आनंद


लंडन : लंडनमधील ओव्हल क्रिकेट मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळला जात आहे. या जेतेपदाच्या लढतीत तीन दिवस खेळले गेले असून चौथ्या आणि पाचव्या दिवशीच्या खेळीवर पावसाचे सावट निर्माण झाले आहे. येथील स्थानिक हवामान संस्थेने दिलेल्या अहवालानुसार, आजपासून पुढील तीन दिवस पावसाचा अंदाज वर्तवला आहे. यामुळे ऑस्ट्रेलियन चाहत्यांची चिंता वाढली असून भारतीय चाहत्यांना मात्र आनंद झाला आहे.


चौथ्या दिवसाचा खेळ लंडनच्या स्थानिक वेळेनुसार सकाळी १०.३० वाजता आणि भारतीय वेळेनुसार दुपारी ३ वाजता सुरू होईल. ऑस्ट्रेलियन संघ आज भारतासमोर मोठे लक्ष्य ठेवू इच्छितो. परंतू Accuweather या हवामान संस्थेने दिलेल्या अहवालानुसार, केवळ चौथ्या दिवशीच नाही तर पाचव्या दिवशी आणि सोमवारी राखीव दिवशीही पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे.


आज चौथा दिवस असून दिवसभरात ५५ टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. शनिवारी ३.८८ मिमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच वादळी वाऱ्याची शक्यता आहे. त्याचवेळी, सुमारे एक तास विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. याशिवाय लंडनमध्ये शनिवारी दुपारी २ ते ९ या वेळेत वादळाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.


त्यामुळे चालू असलेल्या सामन्यावर नजर टाकली तर दुसऱ्या आणि तिसऱ्या सत्राच्या खेळावर याचा परिणाम होऊ शकतो. दुसरीकडे, शनिवारनंतर रविवारी लंडनमध्ये ८८ टक्के पाऊस आणि सोमवारी ८० टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. याचा खेळावर परिणाम होऊ शकतो.


मात्र ड्रेनेजची व्यवस्था चांगली असल्याने दिवसभर वाहून जाण्याची शक्यता कमी आहे. मात्र दोन दिवसांत काही शक्य झाले नाही तर सहाव्या दिवशी निकालासाठी सामना होणार आहे.

Comments
Add Comment

Jasprit Bumrah : आयसीसी टी-२० क्रमवारी जसप्रीत बुमराहची टॉप ५ मध्ये नोंद

मुंबई : भारताने ८ मार्च रोजी टी२० विश्वचषक जिंकल्यापासून एकही टी२० आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही आणि

Gudi Padwa 2026 : सचिन तेंडुलकर, सूर्यकुमार आणि अजिंक्य रहाणेने यांच्यासह अनेक खेळाडूंनी दिल्या गुढीपाडव्याच्या शुभेच्छा

गॉड ऑफ क्रिकेट सचिन तेंडुलकर, नुकताच भारताला टी-२० विश्वचषक जिंकून देणारा सूर्यकुमार यादव, माजी फिरकी गोलंदाज

SRH IPL 2026 : ईशान किशन आणि अभिषेक शर्मावर हैदराबाद संघाने टाकली मोठी जबाबदारी

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२६ च्या आधी, सनरायझर्स हैदराबादने एक मोठा निर्णय घेतला आहे. भारताच्या नुकत्याच

खेळाडूंची ‘A+’ श्रेणीच रद्द? BCCIचा मोठा निर्णय; बुमराह- जडेजाच्या मानधनात होणार घट

मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआय २०२५-२६ हंगामासाठी क्रिकेटपटूंच्या वार्षिक करार आणि मानधन

आयपीएल 2026 : विराट कोहली बंगळूरुमध्ये दाखल

बंगळुरु : रॉयल चॅलेंजर्स बंगळूरचा माजी कर्णधार आणि महान क्रिकेटपटू विराट कोहली आयपीएल २०२६ साठी संघात सामील

Chinnaswamy Stadium IPL 2026 : चिन्नास्वामी स्टेडियमवर आरसीबीचे सामने आयोजित करण्यास हिरवा कंदील

आयपीएल २०२६ दरम्यान बंगळुरूमधील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे सामने आयोजित करण्यातील