नाशिकमध्ये खंडणीचा अजब प्रकार उघडकीस!

वृक्षप्रेमी असल्याचा रचला बनाव...अन् मग....


नाशिक: थेट कायदेशीर नोटरी करून प्रत्येक महिन्याला कंत्राटदारकडून वीस हजार रुपये देण्याची हमी मिळविण्याचे बेकायदेशीर काम करणाऱ्या एका कथित वृक्ष प्रेमी वर गंगापूर रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.


या संदर्भात गंगापूर रोड पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, नितीन कोठावदे यांचे महापालिका हद्दीत वृक्ष तोडण्याचे कंत्राट आहे. हे कंत्राट राबवितांना त्याच्या कामाविषयी मनपा प्रशासनाकडे तक्रार करू नये म्हणून एका तरुणाने कोठावदे यांच्याकडे प्रत्येक महिन्याला वीस हजार रुपयांची मागणी केली. हा तरुण केवळ मागणी करून थांबला नाही तर थेट नोटरी करून तशी हमीच घेतली. नोटरीची प्रत ताब्यात मिळताच कंत्राटदार कोठावदे यांनी थेट गंगापूर रोड पोलिस ठाणे गाठून आपली कैफियत मांडली. गंगापूर रोडचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रियाज शेख यांनी प्रकरणाचे गांभीर्य ओळखून तात्काळ खंडणीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. कोठावदे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंवि कलम ३८५ व ५०६ अन्वये गुन्हा दाखल करून त्यास ताब्यात घेतले आहे. दरम्यान आरोपीची न्यायालयाने जामीनावर मुक्तता केली आहे.



शहनिशा करणार 


दरम्यान, याबाबत तपासी अंमलदार सहायक पोलिस निरीक्षक महेश येसेकर यांनी आरोपीकडून नोटरीची मूळ प्रत जप्त करून शहनिशा केली जाईल. त्यानंतर पुढील तपास करून निर्णय घेतला जाईल असे दैनिक प्रहारशी बोलतांना सांगितले.

Comments
Add Comment

Ujjain Mahakaleshwar : महाकालच्या भक्तांसाठी खुशखबर ! आता घरबसल्या घ्या भस्म आरतीचं दर्शन

बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या उज्जैनच्या श्री महाकालेश्वराच्या दर्शनानं आपल्या आयुष्यातील संकटे आणि

जाणून घ्या लसूण आणि मधाचे चमत्कारिक फायदे

- रोज सकाळी रिकाम्या पोटी सेवन करणे ठरते फायदेशीर तुम्हाला माहित आहे का की रोजच्या जेवणाची चव वाढवणारा लसूण

'या' फळाचं नियमित सेवन ठरेल फायदेशीर, जाणून घ्या फायदे

आपल्या आरोग्यासाठी फळे ही अंत्यत फायदेशीर असतात. त्यामुळे फळांच सेवन करणं महत्वाचं मानलं जातं. यापैकीच चिकू हे

जाणून घ्या चैत्र नवरात्रीत देवीची पूजा, विधी कसे करावेत ? आणि कोणत्या गोष्टी असतात लाभदायक

मुंबई : गुढीपाडवा हा हिंदू पंचांगातील महत्वाचा सण आहे. या सणापासून चैत्र महिन्याला सुरुवात होते. आणि गुडीपाडवा या

शाहरुख, सलमानला भेटा, ५० रुपयांत वांद्रयात फिरा

सध्या सगळीकडेच महागाई प्रचंड वाढली आहे. त्यामुळे अनेकांना वाटतं की मुंबईत फिरणं म्हणजे आपल्याला काही परवडणार

एकादशीच्या दिवशी 'या' गोष्टी केल्यास भगवान विष्णू होतील प्रसन्न !

धार्मिक मान्यतेनुसार हिंदू धर्मात एकादशी व्रताचे विशेष महत्त्व आहे. मान्यतेनुसार या दिवशी मनोभावे पूजा