बिपरजॉय चक्रीवादळ येत्या २४ तासात धडकणार!

Share

महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा आणि गुजरात या चार राज्यांना सतर्कतेचा इशारा

मुंबई : ‘बिपरजॉय’ चक्रीवादळ हे येत्या २४ तासात आणखी तीव्र होणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. कोकणसह गुजरातमधील किनारपट्टीवर ५० ते ६० किमी प्रतितास वेगाने वारे वाहत आहेत. त्यामुळे महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा आणि गुजरात या चार राज्यांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पुढील दोन दिवसांत ते उत्तर आणि उत्तर-पश्चिम दिशेने सरकेल. या पार्श्वभूमीवर मच्छिमारांनी अरबी समुद्रात जाऊ नये, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.

कोकण किनारपट्टीसह गुजरातच्या किनारपट्टीवर देखील वेगाने वारे वाहू लागले आहेत. गणपतीपुळे येथील गणेश मंदिराच्या पाय-यांवरुन मंदिरात लाटा उसळत आहेत. वलसाडमध्येही मोठ्या लाटा उसळत आहेत. डुमास आणि सुवलीमध्ये वेगाने वारे वाहू लागले असून १४ जूनपर्यंत येथील किनारी भाग बंद करण्यात आला आहे. मच्छिमारांना आणि पर्यटकांना समुद्रकिनाऱ्यावर जाण्यास मनाई करण्यात आली आहे.

भारतासह ओमान, इराण, पाकिस्तान या देशांवर चक्रीवादळाचा परिणाम होण्याची शक्यता

या चक्रीवादळाचा परिणाम भारत, ओमान, इराण आणि पाकिस्तानसह अरबी समुद्राला लागून असलेल्या देशांवर होण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे.

बिपरजॉय चक्रीवादळ आता पूर्व-मध्य अरबी समुद्रातून हळूहळू उत्तर आणि वायव्येकडे सरकत आहे. त्यामुळे किनारपट्टी भागात मेघगर्जनेसह हलक्या पावसाची शक्यता आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार या वादळामुळे ताशी १३५ ते १४५ किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात. याचा परिणाम किनारी भागात होऊ शकतो. यामुळे किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Recent Posts

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, २१ एप्रिल २०२५

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण अष्टमी, शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तराषाढा, योग साध्व. चंद्र राशी…

23 minutes ago

Summer Tips : उन्हाळ्यात कशी घ्यावी डोळ्यांची काळजी, जाणून घ्या ‘या’ गोष्टी!

मुंबई : उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागली आहे. कडक सूर्यप्रकाशात घराबाहेर पडणे त्रासदायक वाटू लागले आहे.…

44 minutes ago

क्रिकेटपटूंच्या कराराची BCCI ने केली घोषणा, ३४ खेळाडूंशी करार; फक्त चार खेळाडूंचा ए+ मध्ये समावेश

मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने ३४ क्रिकेटपटूंसोबतच्या कराराची घोषणा केली आहे. रोहित…

1 hour ago

काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा २६/११ च्या हल्ल्यामागे अदृश्य हात, भाजपाच्या माधव भांडारींचा आरोप

मुंबई : मोहम्मद अजमल कसाबसह दहा पाकिस्तानी अतिरेक्यांनी मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ रोजी हल्ला केला.…

2 hours ago

Benefits Of Watermelon : कलिंगड खा अन् हायड्रेट राहा!

ऊन्हाळ्याच्या दिवसांत शरीराला हायड्रेट ठेवणं खूप महत्वाचं असते. ऊन्हाळ्याच्या दिवसांत खाण्यापिण्याच्या गोष्टींची विशेष काळजी घ्यावी…

2 hours ago