टीम इंडियावर फॉलोऑनचे संकट, भारत ३१८ धावांनी पिछाडीवर

Share

लंडन : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात लंडनच्या ओव्हल मैदानावर डब्लूटीसीचा फायनल सामना खेळला जात आहे. टीम इंडियाची दुसऱ्या दिवसअखेर पाच बाद १५१ अशी घसरगुंडी उडाली आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला त्या वेळी अजिंक्य रहाणे २९ धावांवर आणि श्रीकर भरत ५ धावांवर खेळत होते.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करत ऑस्ट्रेलियाच्या संघाने पहिल्या डावात ४६९ धावा केल्या. या सामन्याच्या दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्रात ऑस्ट्रेलियाचा संघ ऑलआऊट झाला. प्रत्युत्तरात भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. दुसऱ्या दिवसाअखेर भारतीय संघाने पाच विकेट्सच्या मोबदल्यात १५१ केल्या आहेत. अजिक्य रहाणे (२९ धावा) आणि एस श्रीकांत पाच धावा करून नाबाद आहेत. भारत ३१८ धावांनी पिछाडीवर आहे.

भारताला फॉलोऑनची नामुष्की टाळण्यासाठी किमान २७० धावांची मजल मारण्याची गरज आहे. त्यासाठी टीम इंडियाला अजूनही ११९ धावांची आवश्यकता आहे.

या सामन्यात नाणेफेक जिंकून भारताने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या दिवसाखेर ऑस्ट्रेलियाने ३ विकेट्स गमावून ३२७ धावा केल्या. प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या ऑस्ट्रेलियाचा संघाचा पहिला डाव दुस-या दिवशी ४६९ धावांवर संपुष्टात आला.

रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांना चांगली सुरुवात देता आली नाही. त्यानंतर अनुभवी चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहलीही स्वस्तात तंबूत परतले. झटपट ४ विकेट गमावल्यामुळे टीम इंडिया अडचीत सापडली आहे. रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी फक्त तीस धावांची सलामी दिली. रोहित शर्मा १५ धावांवर कमिन्सच्या चेंडूवर बाद झाला. तर शुभमन गिल याला १३ धावांवर बोलँड याने तंबूत पाठवले. चेतेश्वर पुजारा १४ धावांवर बाद झाला. कॅमरुन ग्रीन याने पुजाराचा अडथळा दूर केला. विराट कोहलीला स्टार्कने बाद केले. विराट कोहली १४ धावांवर बाद झाला.

टीम इंडियाचे आघाडीचे फलंदाज तंबूत परतल्यानंतर रविंद्र जाडेजा याने आक्रमक फलंदाजी केली. जाडेजाने चौफेर फटकेबाजी करत भारताचा डाव सावरला. अजिंक्य रहाणे याने संयमी फलंदाजी करत जाडेजाला चांगली साथ दिली. रविंद्र जाडेजा आणि अजिंक्य रहाणे यांनी पाचव्या विकेटसाठी ७१ धावांची भागिदारी केली. तर जाडेजाने ४८ धावांची खेळी केली. त्याने सात चौकार आणि एक षटकार लगावत ऑस्ट्रेलियाची गोलंदाजी फोडून काढली. दुसरीकडे अजिंक्य रहाणे याने संयमी फलंदाजी केली.

Recent Posts

Health Tips: उन्हाळ्यात या घरगुती गोष्टी चेहऱ्यावर लावा!

दिवसभर तुमची त्वचा ताजी राहील मुंबई: उन्हाळ्यात आपण आपल्या त्वचेची काळजी घेतली पाहिजे. कारण आता…

18 minutes ago

मोदी सरकार भारत – पाकिस्तान सीमा सील करण्यासाठी इस्रोच्या उपग्रहांची मदत घेणार

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान सागरी तसेच भू सीमा मोठी आहे. भू…

48 minutes ago

Pahalgam Terrorist Attack: जम्मू-काश्मीरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रीयन पर्यटकांची पहिली तुकडी मुंबईत दाखल

मुंबई : महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असलेल्या आणि जम्मू कश्मीर मध्ये दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यानंतर तिथे अडकलेल्या…

1 hour ago

RCB vs RR, IPL 2025: राजस्थान बेंगळुरूला पराभवाचा धक्का देणार!

मुंबई(ज्ञानेश सावंत): राजस्थानने सलग चार सामने गमावले आहेत त्यापैकी तीन सामने अगदी थोड्या अंतराने गमावले…

1 hour ago

मुंबईकरांनो लक्ष द्या! कुर्ला ते घाटकोपर भागांत शनिवार, रविवारी पाणीकपात

महापालिकेच्या वतीने पाणीपुरवठ्याची कामे हाती घेतली जाणार मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेतर्फे घाटकोपर (पश्चिम) येथे…

2 hours ago

Health: उन्हाळ्यात डोळ्यांचे विकार होण्याचा वाढतो धोका, डोळ्यांची घ्या अशी काळजी

ठाणे (प्रतिनिधी) : उष्म्याने ठाणेकर भलतेच हैराण झाले असून, एप्रिल महिन्यात उन्हाचा तडाखा वाढत चालला…

3 hours ago