त्यांच्या सुरक्षेची संपूर्ण काळजी घेतली जाईल

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली ग्वाही


मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना आलेल्या धमकीप्रकरणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत शरद पवार हे ज्येष्ठ नेते असून, त्यांच्याबदल आम्हाला सर्वांनाच आदर आहे. त्यांच्या सुरक्षेची संपूर्ण काळजी घेतली जाईल, असे ते म्हटले आहे.


ते म्हणाले, ज्येष्ठ नेते शरद पवार यांना ट्विटरवरुन आलेल्या धमकीची सरकारने गंभीर दखल घेतली असून वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांशी मी स्वतः बोललो आहे, तपासाच्या सूचना दिल्या आहेत. शरद पवार हे ज्येष्ठ नेते असून, त्यांच्याबदल आम्हा सर्वांनाच आदर आहे. त्यांच्या सुरक्षेची संपूर्ण काळजी घेतली जाईल. आवश्यकता असल्यास सुरक्षा व्यवस्थेत वाढही करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या आहेत, असे शिंदेंनी ट्विटमध्ये म्हटले.



कारस्थान हाणून पाडले जाईल...


ते पुढे म्हणाले, गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातले वातावरण बिघडण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न काही लोकांकडून सुरु आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यापासून काही लोक बिथरले आहेत, त्यातून महाराष्ट्रातले वातावरण बिघडवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. औरंगजेब, टिपू सुलतानाचे उदात्तीकरण करुन धार्मिक तणाव निर्माण करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. हे प्रयत्न यशस्वी होऊ देणार नाही. आपल्या राजकारणासाठी महाराष्ट्रातली कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचे कारस्थान हाणून पाडले जाईल, असा सज्जड दम त्यांनी भरला आहे.



सखोल तपासाची मागणी


दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तीन दिवस सुट्टीवर आहेत. ते आपल्या कुटूंबासह काश्मीरमध्ये गेले आहे. तिथून त्यांनी या परिस्थितीचा आढावा घेऊन हे ट्विट केले आहे. शरद पवार यांना धमकी देणाऱ्या व्यक्तीचे नाव सौरभ पिंपळकर असल्याचे समजते. त्याच्या ट्विटरच्या बायोवर भाजप कार्यकर्ता असल्याचा उल्लेख असल्याचे विरोधी पक्षनेते अजित पवारांनी म्हटले आहे. तसेच खरंच तो भाजपचा कार्यकर्ता आहे की, नाही याची माहिती नसल्याचे देखील त्यांनी सांगितले. या घटनेचा सखोल तपास करण्याची मागणी त्यांनी केली आहे.




Comments
Add Comment

Israel - Iran War : इराण-इस्रायल युद्धात मुंबईकर तरुणाचा मृत्यू, २५ वर्षीय दीक्षितचा ड्रोनने घेतला बळी

मध्य-पूर्वेतील महायुद्ध सुरु होऊन ५ दिवस झाले असून याची झळ आता भारतालाही बसली आहे. या युद्धात भारताच्या २५ वर्षीय

Mumbai News : वरळी नाका होणार 'ट्रॅफिक फ्री'! २ किमीचा वळसा आता संपणार, पालिकेचा मास्टरप्लॅन; २ नवीन पुलांमुळे प्रवासाचा वेळ वाचणार

मुंबई : दक्षिण मुंबईतील सर्वात गजबजलेला भाग असलेल्या वरळी नाक्यावरील वाहतुकीचा ताण कायमचा कमी करण्यासाठी मुंबई

BMC News : प्रभाग समितीचे भाजपचे उमेदवार ठरले, नावे झाली जाहीर!

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महापालिकेच्या १७ प्रभाग समितीपैकी ०९ प्रभाग प्रभाग समिती अध्यक्ष पदाचे उमेदवार

BMC : महापालिकेच्या टाऊनहॉल जिमखान्याची विट रचणार डि ठक्कर कंपनी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महापालिकेच्यावतीने महापालिका मुख्यालयासमोरील आझाद मैदान येथील जुन्या क्रिडा

BMC News : मुंबईतील १७ प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी बुधवारी होणार अर्ज सादर

प्रभाग समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत महायुतीचे पारडे जड भाजपच्या करिष्म्याकडे सर्वांचे लक्ष मुंबई (विशेष

मागासवर्गीय शासकीय वसतिगृहांना महापुरुषांची नावे देण्याचा सामाजिक न्याय विभागाचा निर्णय

मुंबई : सामाजिक न्याय विभागांतर्गत चालविण्यात येणाऱ्या मागासवर्गीय मुला-मुलींच्या शासकीय वसतिगृहांना