नवी दिल्ली : जगप्रसिद्ध मिस वर्ल्ड स्पर्धेचे आयोजन यंदा भारतात करण्यात येणार आहे. या निमित्ताने तब्बल २७ वर्षांनी भारताला पुन्हा एकदा ‘मिस वर्ल्ड’ स्पर्धेचे यजमानपद भूषवण्याचा बहुमान मिळणार आहे. यापूर्वी १९९६ मध्ये भारतात मिस वर्ल्ड स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यंदा ही सौंदर्य स्पर्धा नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे.
७१ व्या मिस वर्ल्ड स्पर्धेचे आयोजन भारतात करण्यात येईल, अशी घोषणा मिस वर्ल्ड ऑर्गनायझेशनच्या अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) ज्युलिया मोर्ले यांनी पत्रकार परिषदेत केली. यावेळी ज्युलिया मोर्ले म्हणाल्या, “७१ व्या मिस वर्ल्डसाठी स्पर्धेसाठी भारताची निवड करताना मला अत्यंत आनंद होत आहे. येथील वैविध्यपूर्ण संस्कृती, जागतिक वारसा स्थळे याची माहिती जगभरात पोहोचवण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.”
“७१ व्या मिस वर्ल्ड स्पर्धेच्या निमित्ताने आम्ही एक महिना संपूर्ण देशभरातील विविध प्रेक्षणीय स्थळांना भेटी देणार आहोत. जवळपास एक महिना सुरु राहणाऱ्या या कार्यक्रमात १३० हून अधिक देशांतील स्पर्धक सहभागी होणार आहेत”, असे ज्युलिया मोर्ले यांनी सांगितले. सध्याची मिस वर्ल्ड कॅरोलिना बिलाव्स्का सुद्धा या पत्रकार परिषदेला उपस्थित होती.
दरम्यान, भारताने ‘मिस वर्ल्ड’चा खिताब तब्बल सहा वेळा जिंकला असून आतापर्यंत रिटा फारिया (१९६६), ऐश्वर्या राय (१९९४), डायना हेडन (१९९७), युक्ता मुखी (१९९९), प्रियांका चोप्रा (२०००) आणि मानुषी छिल्लर ( २०१७) या सौंदर्यवतींनी ‘मिस वर्ल्ड’ होण्याचा बहुमान मिळवला आहे.
नवी दिल्ली : देशातील सर्वात स्पर्धात्मक परीक्षांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या UPSC CSE मध्ये दरवर्षी…
मुंबई : 'मुंबईतील लँड स्कॅमचा बादशाह जर कोणी असेल, तर तो उद्धव ठाकरेच!' अशा शब्दांत…
कोविड महामारी दरम्यान संसर्ग झालेल्या लोकांना हृदयरोगांचा धोका सर्वाधिक मुंबई: गेल्या वर्षातील आकडेवारी पाहिल्यास असे…
पुणे : विद्येचं माहेरघर असणाऱ्या पुण्यात गुन्हेगारीचं क्षेत्र वाढतं चाललं आहे. दररोज कोणत्या ना कोणत्या…
मुंबई : झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवर पाच वर्षांपूर्वी 'देवमाणूस' (Devmanus) ही मालिका सुरु झाली…
मुंबई: "भिऊ नको मी तुज्या पाठीशी आहे" संकट काळात स्वामी समर्थांच हे वाक्य जगण्यासाठी नवी…