छत्रपती संभाजीनगर: कोल्हापूरातील हिंसाचाराची परिस्थिती पाहता छत्रपती संभाजीनगरमधील पोलीस यंत्रणा अलर्ट झाली आहे. तर जिल्ह्याभरातील सर्वच पोलीस ठाणेप्रमुखांना पेट्रोलींग वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सोबतच सोशल मिडीयावर विशेष लक्ष ठेवण्याच्या सूचना देखील वरिष्ठांकडून देण्यात आल्या आहेत.
कोल्हापूर शहरात झालेल्या हिंसाचाराच्या घटनेनंतर याचे पडसाद जिल्ह्यात उमटू नयेत याची खबरदारी छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांकडून घेण्यात येत आहे. दरम्यान या पार्श्वभूमीवर ग्रामीण पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया यांनी सर्वच ठाणेप्रमुखांना ग्रुप कॉलिंगवर विशेष सूचना दिल्या आहेत.
दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यात झालेल्या हिंसाचाराच्या घटनेनंतर शहरात सद्या तणावपूर्ण वातावरण आहेत. तसेच जिल्हाधिकारी यांच्यासोबत पोलिसांची बैठक होणार असून, ज्यात शहरातील इंटरनेट सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. सद्या शहरात अनेक अफवा पसरवल्या जात आहे. तसेच काही व्हिडिओ देखील व्हायरल होत आहेत. त्यामुळे हे सर्व रोखण्यासाठी शहरातील इंटरनेट बंद होण्याची शक्यता आहे.
बारामुला : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे अतिरेक्यांनी पर्यटकांना लक्ष्य करुन गोळीबार केला. या हल्ल्यात २६…
मुंबई: सध्या सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. काश्मीर खोऱ्यातील पहलगाम (Pahalgam Terror Attack) येथे दहशतवाद्यांनी…
मुंबई(ज्ञानेश सावंत):मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद हा सामना हैदराबादमध्ये राजीव गांधी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम येथे…
अतिधोकादायक उपकरप्राप्त इमारतींची संख्या ९५ वर मुंबई (प्रतिनिधी) : दक्षिण मुंबईतील अंदाने १४ हजार इमारतीची…
पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्हा नियोजनमधून २ कोटी ३७ लाख दिला निधी सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) :…
नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात भारतीय नौदलाचे एक अधिकारी आणि आयबीच्या एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला…