चक्रीवादळ कोकण किनारपट्टीवर धडकणार!

हवामान विभागाचा सावधगिरीचा इशारा


पुणे : मान्सूनचे आगमन लांबले आहे. त्यातच अरबी समुद्रातील चक्रीवादळ कोकण किनारपट्टीला धडकण्याची शक्यता असल्याने काळजी घेण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे.


याबाबत हवामान विभागाने अद्याप अलर्ट जारी केला नसला तरी कोकण किनारपट्टीवरील नागरिकांनी सावधगिरी बाळगावी असे आवाहन केले आहे.


अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे. यामुळे चक्रीवादळ येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर, अरबी समुद्रात तयार होणाऱ्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी परिपत्रक काढत काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. हे परिपत्रक काल मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले.


दरम्यान, या संदर्भात हवामान विभागाचे मुंबईचे अधिकारी सुनील कांबळे म्हणाले की, काही मॉडेलनुसार चक्रीवादळाची शक्यता वर्तवली जात असली तरी भारतीय हवामान विभागाने चक्रीवादळाचा इशारा दिलेला नाही. चक्रीय वात स्थितीनंतर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होईपर्यंत पुढील स्थितीबद्दल सांगितले जात नाही, असेही ते म्हणाले.


तर पुण्यातील हवामान संशोधन आणि सेवा विभागाचे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनी हवामान अंदाजासाठी वापरल्या जाणाऱ्या सगळ्या मॉडेलमध्ये चक्रीवादळाबद्दल एकवाक्यता नसल्याचे स्पष्ट केले. हवामान विभागाने ही प्रणाली तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यापर्यंत पोहोचण्याची शक्यताही कमी असल्याचे म्हटले आहे.


मात्र असे असले तरी कमी दाबाचे क्षेत्र या प्रणालीची व्यापकताही मोठी असते. त्यामुळे त्या अनुषंगाने मच्छिमारांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Comments
Add Comment

Rice productivity : कोकणातील तांदूळ उत्पादकतेत १२ टक्क्याने घट

खारजमिनीत वाढ, हवामान बदल आणि वाढत्या नागरिकरणाचा विपरीत परिणाम रायगड : कोकण किनारपट्टीचे मुख्य, पारंपरिक आणि

Nitesh Rane : महाडला मिळणार आधुनिक मच्छी मार्केट; १५ दिवसांत प्रस्ताव सादर करण्याचे नितेश राणेंचे निर्देश

मुंबई : प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत रायगड जिल्ह्यातील महाड शहरात आधुनिक मच्छी मार्केट इमारत

MLA Pramod Jathar : 'वनतारा'च्या धर्तीवर तिलारी खोऱ्यात राष्ट्रीय उद्यान?

- भाजप आमदार प्रमोद जठार यांची मागणी; वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मुंबई : सिंधुदुर्ग

Ratnagiri : गणपतीपुळे दुर्घटनेतील उर्वरित चार तरुणांचे मृतदेहही सापडले

रत्नागिरी : गणपतीपुळे येथे पर्यटनासाठी आलेल्या आणि समुद्रात बुडून बेपत्ता झालेल्या छत्रपती संभाजीनगर

RTI : माहिती अधिकार कायद्यात मोठे बदल; महाराष्ट्र शासनाचे नवे नियम लागू

रायगड : माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत अर्जदारांसाठी महाराष्ट्र शासनाने काही महत्त्वपूर्ण बदल लागू केले

गणपतीपुळे दुर्घटनेतील पाचपैकी एकाचा मृतदेह सापडला

रत्नागिरी : गणपतीपुळे येथे आज सकाळी घडलेल्या दुर्घटनेत बेपत्ता झालेल्या पाच पर्यटकांपैकी एका तरुणाचा मृतदेह