सिंधुदुर्गामध्ये 'शासन आपल्या दारी'चा चौथा कार्यक्रम

सिंधुदुर्ग : आज सिंधुदुर्गामध्ये महाराष्ट्र शासनाच्या 'शासन आपल्या दारी'चा मोठा कार्यक्रम पार पडणार आहे. राज्यातील हा चौथा कार्यक्रम असणार आहे. या कार्यक्रमाला स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमादरम्यान आपल्या भाषणात मुख्यमंत्री सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी नव्या योजनांची घोषणा करणार असल्याची माहिती मिळत आहे.


उद्योगमंत्री उदय सामंतदेखील स्वतः या कार्यक्रमाच्या तयारीवर लक्ष ठेवून आहेत. आज ज्या योजनांची घोषणा होईल त्यामध्ये 'सिंधुरत्न' ही एक योजना राबवण्यात येणार आहे. सिंधुरत्नचा मच्छीमारांना मोठा फायदा होणार असल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली.


सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी असलेल्या योजनांमधून अपंगांसाठी गाड्या, शेतकर्‍यांना ट्रॅक्टर्स, शेतीसाठी कुंपण तसेच कामगारांना युनिट देण्यात येणार आहेत, असं उदय सामंत म्हणाले. तसेच हा कार्यक्रम पुढे कायम चालू ठेवण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आलेल्या आहेत, असं उदय सामंत म्हणाले.

Comments
Add Comment

Mumbai-Goa Highway Accident : उभ्या कंटेनरला कारची भीषण धडक; दोन जणांचा जागीच मृत्यू, कुटुंबावर दुःखाचा डोंगर...

पोलादपूर: मुंबई-गोवा महामार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघाताची घटना घडली आहे. पोलादपूरजवळ झालेल्या या अपघातात दोन

Raigad Crime :मुंबईकर मुलीची माणगावमध्ये निर्घृण हत्या, मृतदेह जंगलात फेकला, परिसरात भीतीचं वातावरण

MANGAON : रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात एका १५ वर्षीय मुलीची निर्घृण हत्या करून तिचा मृतदेह जंगलात फेकून

Konkan Railway Alert : मांडवी, तेजस, मत्स्यगंधासह अनेक गाड्यांच्या वेळेत १५ जूनपासून मोठे बदल...

Mumbai-Goa Trains : कोकण रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आली आहे. पावसाळ्याचा विचार

सावंतवाडी रेल्वे स्थानकाला मधु दंडवते यांचे नाव

 मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय; शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना मुदतवाढ मुंबई : कोकण रेल्वेचे शिल्पकार आणि देशाचे

जहाज बांधणी क्षेत्रात २०३० पर्यंत ४० हजार नोकऱ्या- मंत्री नितेश राणे

रत्नागिरी, रायगड आणि पालघरच्या किनाऱ्यावर उभे राहणार विशाल 'शिप बिल्डिंग' प्रकल्प मुंबई (सुहास शेलार) :

Kokan Railway News : कोकणवासियांसाठी खुशखबर! पावसाळ्यापूर्वी कोकण रेल्वेची मोठी तयारी, युद्धपातळीवर कामे सुरू

नवी मुंबई : कोकणवासियांसाठी आणि कोकण रेल्वे (Konkan Railway) मार्गावरून प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी एक महत्त्वाची