मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांनी तळ गाठला असून राज्य सरकारच्या पाटबंधारे विभागाने मुंबईसाठी राखीव साठ्यातून पाणीसाठा मंजूर केला आहे. यामुळे पुढील अवघे २० दिवस पुरेल एवढाच पाणी साठा शिल्लक राहिला आहे. पाऊस लांबणीवर पडल्यास किंवा जून मध्ये पाऊस कमी झाल्यास मुंबईला पाणीबाणीला तोंड द्यावे लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे पावसाळा सुरू होईपर्यंत मुंबईकरांना जपून पाणी वापरण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये फक्त ११.७६ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे महापालिकेकडून सरकारला अतिरिक्त पाण्यासाठी पत्र लिहिण्यात आले आहे.
पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणी साठा कमी झाल्याने महापालिका प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत. मुंबईला मुबलक प्रमाणात पाणी मिळावे यासाठी मुंबई महापालिकेने राज्य सरकारला अप्पर वैतरणा आणि भातसा धरणातील शिल्लक पाणी मुंबईसाठी द्यावे अशी विनंती केली होती. सध्याचा पाणी साठा पाहता पाटबंधारे विभाग/राज्य सरकार यांनी राखीव साठ्यातून पाणीसाठा मुंबईसाठी मंजूर केला आहे.
माझे कोकण: संतोष वायंगणकर गरिबी आहे, घरची परिस्थिती नाही यामुळे पुढे शिक्षण घेता येत नाही…
वैशाली शिरोडकर: पहलगाम निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केलेला काश्मीरचा भाग दहशतीच्या सावटाखालीही फुलतो आहे. गेल्या चार-पाच…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण वरुथिनि एकादशी, शके १९४७. शततारका नक्षत्र. योग ब्रम्हा. चंद्र राशी…
भारताचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काश्मीरमधील पहलगाममध्ये मंगळवारी दहशवाद्यांनी निष्पाप पर्यटकांवर हल्ला करून २८ जणांची…
हैदराबाद: इंडियन प्रीमियर लीग २०२५मधील ४१व्या सामन्यात आज २३ एप्रिलला मुंबई इंडियन्स संघाने सनरायजर्स हैदराबादला…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे २२ एप्रिल २०२५ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली…