आता पिंपरी-चिंचवडचे नावही बदलण्याची मागणी

भक्ती शक्ती प्रतिष्ठानकडून शहरात शंभरहून अधिक पोस्टर्स


पिंपरी-चिंचवड : राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून शहरे, महामार्गांना महान व्यक्तिमत्त्वांची नावे दिली जात आहेत. काही दिवसांपूर्वीच अहमदनगरचे नामकरण अहिल्यानगर करण्यात आले. तसेच औरंगाबादला छत्रपती संभाजीनगर, मुंबईतील कोस्टल रोडला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव तर वांद्रे-वरळी सागरी मार्गाला स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव देण्यात आले. यातच आता पिंपरी - चिंचवड शहराचं नाव बदलून 'जिजाऊनगर' ठेवण्यात यावं, अशी मागणी करण्यात आली आहे.


छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५०व्या राज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून भक्ती शक्ती प्रतिष्ठानने ही मागणी केली आहे. शहरातील विविध भागात पिंपरी-चिंचवड शहराचे जिजाऊ नगर नाव करण्यात यावे अशी मागणी आता जोर धरू लागलेली आहे. तशा आशयाचे शंभरहून अधिक पोस्टर्स पिंपरी-चिंचवड शहरात सर्वत्र लावण्यात आले आहेत. यामध्ये सहभागी होण्यासाठी लाईक करा आणि मिस कॉल द्या अशी मोहिम राबवण्यात आली आहे.


पिंपरी- चिंचवड शहराचं नाव बदलण्याची चर्चा या अगोदर २००६ -०७ ला झाली होती. तशा बातम्या देखील छापून आल्या होत्या. पण स्थानिकांनी पिंपरी- चिंचवड शहराचे नाव बदलण्यास विरोध केला होता. आता पुन्हा एकदा शहराचे नाव बदलण्याची मागणी होत आहे. त्यामुळे शहरात नामकरणाची चर्चा रंगू लागली आहे.

Comments
Add Comment

Maharashtra Heavy Rain : राज्यात पावसाचा कहर! १७ NDRF आणि 6 SDRF पथके तैनात; लोणावळ्यात तब्बल ६७० मिमी पावसाची नोंद

मुंबई : राज्यात मुसळधार पावसाचा जोर कायम असून काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीची परिस्थिती निर्माण झाली आहे.

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या विशेष फेरीस ८ जुलैपर्यंत मुदतवाढ

मुंबई : राज्यातील काही भागांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना सुटी जाहीर करण्यात

इंद्रायणीच्या पुरामुळे आळंदीत वारकऱ्यांची गैरसोय; मुंबई डबेवाले करणार भोजन व निवासाची व्यवस्था

Mumbai  : खेड, मावळ, पिंपरी-चिंचवड आणि लोणावळा परिसरात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे

Heavy Rain in Mumbai Pune : पावसाचा कहर! मुंबई-ठाण्यासाठी ऑरेंज अलर्ट तर पुण्यात १२ जुलैपर्यंत शाळांना सुट्टी जाहीर

मुंबई : राज्यात मुसळधार पावसाचा जोर कायम असून भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबई आणि ठाणे जिल्ह्यांसाठी उद्या

Flood in Indrayani : इंद्रायणीला पूर; वारकऱ्यांसाठी सरकारचे महत्त्वाचे आवाहन! आळंदीत न जाण्याचे प्रशासनाचे आवाहन

पुणे : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यानिमित्त आळंदीकडे निघालेल्या वारकरी आणि भाविकांसाठी राज्य

TET Exam Paper Leak : टीईटी पेपरफुटी प्रकरणात मोठी घडामोड! चारही आरोपींना १८ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी

भिवंडी : राज्यभरात गाजत असलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणात मोठी घडामोड झाली