Exclusive : मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांची दिल्लीत रात्रीची खलबतं!

मंत्रिमंडळ विस्ताराबाबत नक्की काय घडलं.. केंद्रात कोणाला मिळणार मंत्रीपद?


मुंबई : राज्यातील राजकीय घडामोडी सध्या वेगवान झाल्याचे पाहायला मिळत आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रात्रीच दिल्लीत दाखल झाले आहेत. त्यांनी दिल्लीतल्या वरिष्ठांशी चर्चा केली. यावेळी रात्रीची खलबतं नक्की काय झाली?


येत्या १९ जूनच्या आधी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र त्यापूर्वी किंवा राज्य मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी केंद्राच्या कॅबिनेटचा विस्तार होईल, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.


आगामी निवडणुका आणि मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातही मंत्रिमंडळ विस्तार करावा अशी मागणी त्यांनी केली आहे. मंत्रीमंडळात कोणाला घ्यावे, महत्त्वाची खाते कोणाकडे असावी यावरूनही दिल्लीतल्या वरिष्ठांशी चर्चा झाल्याचे समजते.


मंत्रीमंडळ विस्तार रखडल्यास नाराजी वाढण्याची शक्यता असल्याने लवकरात लवकर मंत्री मंडळ विस्तार करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.


दरम्यान, त्यांनी मंत्रिमंडळ विस्तारावर केंद्रीय मंत्री अमित शाहांशी चर्चा केली. शिवसेनेच्या दोन खासदारांना केंद्रामध्ये मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे.


दरम्यान, दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या बंगल्यावर काल संध्याकाळी महत्त्वाच्या नेत्यांची बैठक पार पडली. ही बैठक जवळपास दोन तास चालू होती. त्यानंतर फडणवीस दिल्लीला रवाना झाले. त्यामुळे या बैठकीत नेमके काय खलबत झाले, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या बंगल्यावर झालेल्या बैठकीतून अनेक अर्थ काढले जात आहेत. दोनच दिवसापूर्वी भाजपचे आमदार आशिष शेलार हे मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर गेले होते. त्यानंतर लगेचच देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली. त्यामुळे बैठकीत नेमकी काय खलबते झाली याची जोरदार चर्चा आहे. या बैठकीला मुंबईतील सर्व आमदार आणि खासदार उपस्थित होते. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणनीती ठरवली गेली का? अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.


दरम्यान, १९ जून हा शिवसेनेचा वर्धापन दिन आहे. त्याआधी मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकतो, अशी शक्यता आहे. काल रात्री उशिरा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंद आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बैठक झाली. काल पुण्यातील कार्यक्रम आटोपून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीकडे रवाना झाले. त्यानंतर सायंकाळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूरमधील कार्यक्रम आटोपून दिल्लीला रवाना झाले. रात्री १० वाजता उभय नेत्यांनी देशाचे गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. तिघांमध्ये दीड तासांहून अधिक वेळ चर्चा झाली.

Comments
Add Comment

Intelligence Bureau : पालघरमध्ये 'इंटेलिजन्स ब्युरो'साठी हक्काची जागा

- महसूल विभागाचा मोठा निर्णय; वसईत कार्यालय आणि निवासस्थानांचा मार्ग मोकळा मुंबई : पालघर जिल्ह्याच्या

Cyclone Shelter Center in Dapoli : दापोली तालुक्यातील चक्रीवादळ निवारा केंद्रासाठी महसूलकडून विनामूल्य जागा

मुंबई : कोकण किनारपट्टीवरील आपत्ती व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला

Onion processing industry: कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी कांदा प्रक्रिया उद्योगास चालना देणार - मंत्री जयकुमार रावल

मुंबई : राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांदा दरातील चढ-उतारांपासून संरक्षण मिळून स्पर्धात्मक दर मिळावा,

Industries Minister Dr. Uday Samant : पांढरकवडा येथे 86 हेक्टरवर नवीन औद्योगिक क्षेत्र स्थापनेला गती - उद्योग मंत्री डॉ.उदय सामंत

मुंबई : यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा तालुक्यात औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी केळापूर तालुक्यातील मौजे

Industries Minister Dr. Uday Samant - 'एमआयडीसी’कडे लवकरच हस्तांतरित करणार : उद्योग मंत्री डॉ.उदय सामंत

मुंबई : धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील विखरन येथील 250 मेगावॅट सौर ऊर्जा प्रकल्पासाठी संपादित जमिनीपैकी

Ashok Kharat : 'लक्ष्मण' ते भोंदूबाबा 'अशोक खरात'; ४० वर्षांपूर्वीच गावकऱ्यांनी दिला होता बेदम चोप!

अहिल्यानगर : महिलांच्या लैंगिक शोषणाप्रकरणी सध्या तुरुंगात असलेल्या अशोक खरात याच्या कृत्यांची मुळं चाळीस