वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनच्या अंतिम सामन्यावरही पावसाची वक्र दृष्टी?

  136

ओव्हलवर बुधवारी भारत - ऑस्ट्रेलिया भिडणार


लंडन (वृत्तसंस्था): ‘आयपीएल’नंतर आता भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ७ ते ११ जून दरम्यान आणखी एक मोठा अंतिम सामना पाहायला मिळणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची ही फायनल आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील हा अंतिम सामना लंडनच्या ओव्हल मैदानावर होणार आहे. यासाठी दोन्ही संघ पूर्णपणे सज्ज झाले आहेत. साहजिकच चाहत्यांचा मनात हा प्रश्न तर येणारच की या अंतिम लढतीत जर पावसाने हजेरी लावली तर काय? या सामन्यावरही पावसाची वक्र दृष्टी असल्याचे वृत्त आहे. इंडियन प्रीमियर लीगच्या अंतिम सामन्यात नुकताच पावसाने केलेला रंगाचा बेरंग सर्वांनी अनुभवला. चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यातील अंतिम सामना हा वेळापत्रकानुसार रविवार, २८ मे रोजी होणार होता. मात्र, पावसामुळे त्या दिवशी नाणेफेक होऊ शकली नाही आणि सामना एक दिवस पुढे ढकलण्यात आला. म्हणजेच बीसीसीआयने अंतिम सामन्यासाठी राखीव दिवस ठेवला होता. राखीव दिवशीही पाऊस पडला, पण रात्री उशिरा सामना संपला आणि २०२३ चा विजयी संघ आपल्याला मिळाला.


टी-२० आणि एकदिवसीय मालिकेसारख्या मोठ्या फायनलसाठी राखीव दिवस ठेवला जातो. तर डब्ल्यूटीसी फायनलसाठीही असेच काहीसे आहे. कारण कसोटी सामना हा पाच दिवस खेळवला जातो. कसोटी क्रिकेटला रोमांचक बनवण्यासाठी आयसीसीने ‘वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप’ सुरू केली आहे. अशा परिस्थितीत पाच दिवस चालणाऱ्या या अंतिम सामन्यासाठी आयसीसीकडून राखीव दिवसाची व्यवस्था करण्यात आली आहे. अशा प्रकारे, अंतिम सामन्याच्या पाचव्या दिवशी पाऊस पडला आणि त्याचा निकालावर परिणाम झाला, तर सामना एका दिवसाने पुढे ढकलण्यात येईल. आयसीसीने २०२१ मध्येच एक प्रकाशन जारी करून याची घोषणा केली होती.


या नियमानुसार, राखीव दिवशीही षटकांचा पूर्ण दिवसाचा कोटा टाकला जाईल आणि अंतिम सामन्याचा निकाल मिळेल. यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील जेणेकरून चॅम्पियनची निवड करता येईल. दुसरीकडे, अंतिम सामना जर अनिर्णित राहिला तर दोन्ही संघांना संयुक्त विजेता घोषित केले जाईल.

Comments
Add Comment

IND vs ENG Test 2 : भारताची विजयाकडे वाटचाल, ६०८ धावांचा पाठलाग करताना इंग्लंडने ३ विकेट गमावल्या

एजबॅस्टन: भारत आणि इंग्लंड (IND vs ENG Test 2 Day 4) यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना एजबॅस्टन

N C Classic: नीरज चोप्राने एनसी क्लासिक स्पर्धेत जिंकले सुवर्णपदक, घरच्या मैदानावर दमदार कामगिरी

बेंगळुरू: शनिवारी बेंगळुरूमधील श्री कांतीरवा स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत

IND vs ENG: कर्णधार शुभमन गिलची बॅट पुन्हा एकदा गरजली, आता दुसऱ्या डावातही शतक झळकावले

महान फलंदाज सुनील गावस्कर यांचा ५४ वर्षांचा जुना विक्रम मोडला  बर्मिंगहॅम: एजबॅस्टन मैदानावर इंग्लंडविरुद्ध

भारत - बांगलादेश क्रिकेट मालिका होणार की नाही होणार ? अखेर उत्तर मिळाले

मुंबई : भारत आणि बांगलादेश या दोन आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघांमध्ये ऑगस्ट २०२५ मध्ये तीन एकदिवसीय सामने आणि दोन

पराभवाची चाहूल लागताच संतापला इंग्रज, DRS वरुन पंचांवर भडकला बेन स्टोक्स

बर्मिंगहॅम : भारत आणि इंग्लंड यांच्यात एजबॅस्टन बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या कसोटी सामन्यात इंग्लंडला

IND vs ENG Test 2: तिसऱ्या दिवसअखेर भारताकडे २४४ धावांची आघाडी

एजबेस्टन: भारत आणि इंग्लंड यांच्यात बर्मिंगहॅमच्या एजबेस्टनमध्ये दुसरा कसोटी सामना खेळवला जात आहे. शुक्रवारी