मला दाऊद इब्राहिमच्या नावाने धमकी!

  119

समीर वानखेडेंच्या दाव्याने खळबळ


मुंबई: एनसीबीचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी एफआयआर रद्द करण्याची मागणी करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. यावर वानखेडे यांच्या विरोधातील एफआयआर योग्यच असल्याचा दावा करत सीबीआयने मुंबई हायकोर्टात प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. तसेच, सीबीआयने वानखेडेंच्या याचिकेवर आक्षेप घेत याचिका फेटाळून लावण्याची मागणी केली आहे. दुसरीकडे समीर वानखेडे यांनी आपणास जीवे मारण्याची धमकी येत असल्याचा दावा केला आहे. याप्रकरणी त्यांनी कुख्यात डॉन दाऊद याचे नाव घेतले आहे.



बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान यांचा मुलगा आर्यन खान याला कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणातून सोडून देण्यासाठी समीर वानखेडे यांनी २५ कोटी रुपयांची मागणी शाहरुखकडे केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी सीबीआयने वानखेडेंविरोधात एफआयआर दाखल केला असून तो रद्द करण्यात यावा, अशी मागणी करीत वानखेडे यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. मात्र, ही याचिका योग्यच असल्याचे सीबीआयने कोर्टात म्हटले आहे. तर, दुसरीकडे मला डॉन दाऊद इब्राहिमच्या नावाने जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याचं वानखेडे यांनी म्हटलं आहे. खोट्या ट्विटर अकाऊंटवरुन त्यांना ही धमकी आल्याची तक्रार मुंबई पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली. तसेच, मला वा माझ्या कुटुंबीयांस काही झाल्यास जबाबदार कोण? असा सवालही वानखेडे त्यांनी उपस्थित केला.

Comments
Add Comment

भाईंदर येथे खून करुन बिहारला फरार झालेला आरोपी १३ वर्षांनी दिल्लीत सापडला

भाईंदर : भाईंदर पूर्वेतील नवघर पोलीस ठाणे हद्दीत १३ वर्षांपूर्वी घडलेल्या एका धक्कादायक खुनाचा गुंता आता सुटला

उबाठा-मनसे एकत्र येण्याआधीच काँग्रेसचा महाआघाडीला झटका!

महापालिका निवडणुका स्वबळावर लढवण्याची तयारी मुंबई : हिंदी सक्तीच्या विषयावरून मनसेप्रमुख राज ठाकरे आणि उबाठा

मुंबईत मरीन ड्राईव्हपेक्षा मोठा समुद्री पदपथ तयार! कधी सुरु होणार?

या मार्गाला धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता असे नाव मुंबई : मुंबईकरांसाठी

विकसित महाराष्ट्र घडविण्याच्या दिशेने काम करणार - मुख्य सचिव राजेश कुमार

मुंबई : महाराष्ट्र हे सर्व क्षेत्रात प्रगत राज्य आहे. राज्याचा मुख्य सचिव म्हणून २०४७ च्या विकसित महाराष्ट्र

माजी मंत्री थोरात हे समाजकारणातील हिरो : सयाजी शिंदे

संगमनेर : चिंचोली गुरव येथे झालेल्या पाणी परिषदेमुळे निळवंडे येथे धरणाची जागा निश्चित झाली. धरण व कालव्यासाठी

डोक्यात हवा जाऊ देऊ नका, कार्यकर्त्याला मोठं केलं की पक्षही आपोआप मोठा होतो! - एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदेंची पक्षाच्या मुख्य नेतेपदी निवड मुंबई : पक्षफुटीनंतर शिवसेनेचे दोन गट वेगळे झाले. शिवसेनेत