मनसुख हिरेन यांना संपवण्याचा निर्णय गुप्त बैठकीत घेतल्याचा एनआयएचा खळबळजनक दावा

मुंबई : मनसुख हिरेन हत्या प्रकरणात बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे आणि माजी एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांची २८ फेब्रुवारी २०२१ रोजी मलबार हिल येथे एक गुप्त बैठक झाली, जिथे त्यांनी ठाण्यातील व्यापारी मनसुख हिरेन यांना संपवण्याचा निर्णय घेतला आणि या बैठकीत शर्मा यांना हे काम सोपवण्यात आले, असा खळबळजनक दावा एनआयएने कोर्टात केला आहे.


२५ फेब्रुवारी २०२१ रोजी, उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या दक्षिण मुंबईतील घर, अँटिलियाच्या बाहेर एक महिंद्रा स्कॉर्पिओ आढळली होती. ज्यामध्ये तब्बल २० जिलेटिनच्या कांड्या असलेली बॅग आढळून आली होती. तसेच अंबानी कुटुंबातील सदस्यांना धमकी देणारी चिठ्ठी देखील होती. तसेच या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह ५ मार्च रोजी मुंब्राजवळील खाडीत सापडला होता.


एनआयएच्या खटल्यानुसार, हिरेन यांच्या मालकीची कार वाझे यांनी अंबानी कुटुंबाच्या निवासस्थानाबाहेर पार्क केली होती. तसेच एनआयएने दावा केला की, हिरेन यांना या कटाबद्दल बरीच माहिती असल्याने आणि त्यांनी या कटाबद्दल कुठे वाच्यता केल्यास शर्मा, वाझे आणि अटकेत असलेले बडतर्फ पोलीस अधिकारी सुनील माने यांना त्यांच्या या कटातून लाभ मिळवणे अवघड गेले असते.


एनआयएने पुढे सांगितले की, अंबानींच्या घराबाहेर वाहन लावल्यानंतर दोन दिवसांनी शर्मा आणि वाझे यांची मलबार हिल येथे गुप्त बैठक झाली. एजन्सीने म्हटले आहे की, कॉल डिटेल रेकॉर्डवरून ही माहिती कन्फर्म झाली आहे. एजन्सीने असा दावा केला आहे की या बैठकीत हिरेन यांना संपवण्याचा निर्णय घेण्यात आला होता आणि हे काम शर्मा यांना देण्यात आले होते आणि ते त्याबद्दल अधिक चर्चा करण्यासाठी वरळी सी फेस येथे गेले होते.


एनआयएने दावा केला आहे की, जेव्हा त्यांनी पहिल्यांदा वाझे यांना चौकशीसाठी बोलावले तेव्हा त्यांनी या प्रकरणात आपली भूमिका नाकारली आणि तपासात दिशाभूल केली.


एनआयएने असाही दावा केला आहे की वाझे खूप प्रभावशाली होते आणि म्हणूनच हिरेन यांचा मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला नव्हता. तर या घटनेत अपघाती मृत्यूची नोंद केली होती. ते पुढे म्हणाले की अटक करण्यापूर्वी वाझे हे सीआययू युनिटचे प्रमुख होते, त्यामुळे जामिनावर सुटल्यास ते साक्षीदारांचा शोध घेऊन त्यांना प्रभावित करू शकले असते.

Comments
Add Comment

मुंबईत मलेरियाच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ

मुंबई (खास प्रतिनिधी): मुंबईत मागील काही दिवसांपासून साथीच्या आजारांमध्ये प्रचंड वाढ होत असून मलेरियाच्या

मुंबईत पावसाचे टार्गेट पूर्ण, आतापर्यंत तब्बल १०३ टक्के पावसाची नोंद

मुंबई (खास प्रतिनिधी) : यंदा पावसाने वेळेआधीच हजेरी लावल्यानंतर ज्या प्रकारे बरसात करत आहे, ते पाहता आता मुंबईतील

दादर पश्चिमेला झाड कोसळलं, चारचाकी थोडक्यात बचावली

मुंबई: दादरच्या पश्चिम येथील पोर्तुगीज चर्च जवळील परिसरात झाड कोसळल्याची घटना घडली आहे. दादरच्या अमर हिंद

काहीही झाले तरी मुंबई महापौर महायुतीचाच असणार- देवेंद्र फडणवीस

मुंबई: राज्यात लवकरच महापालिकेच्या निवडणुका होणार आहे. त्यासाठी सर्वच पक्ष जोरदार तयारी करत आहे. नेत्यांच्या

मुंबईत देवींच्या आगमन मिरवणुकांनी परिसर उजळले

मुंबई: शारदीय नवरात्रोत्सवाच्या आधी शहरात सर्वात पूज्य देवींच्या मूर्तींचे उत्साही स्वागत करण्यात आले.

मुंबई मेट्रो स्टेशनच्या खराब डिझाइनवर प्रवासी नाराज

मुंबई: मेट्रो स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर पंख्यांची कमतरता असल्याबद्दल 'रेडिट'वरील एका पोस्टनंतर मुंबई मेट्रो