Fake Currency : २००० वर बंदी, मात्र ५०० रुपयाच्या नोटांनी उडवली आरबीआयची झोप!

मुंबई : २००० रुपयांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) घेतला असला तरी ५०० रुपयाच्या नोटांनी (Fake Currency) मात्र आरबीआयची झोप उडवली आहे.


२००० रुपयांच्या नोटेवर बंदी घालून त्यांच्या परतीची प्रक्रियाही देशातील सर्व बँकांमध्ये सुरू झाली आहे. २००० रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी दिलेली ३० सप्टेंबरची मुदत संपण्यापूर्वीच ५०० रुपयांच्या नोटांशी संबंधित (Fake Currency) मोठी अडचण रिझर्व्ह बँकेसमोर आली आहे.


आरबीआयच्या अहवालानुसार, २ हजाराच्या नव्हे तर ५०० रुपयांच्या बनावट नोटांचे प्रमाण (Fake Currency) मोठ्या प्रमाणावर वाढत चालले आहे. त्यामुळे आता बाजारातून ५०० रुपयांच्या बनावट नोटा चलनातून बाहेर काढण्याचे मोठे आव्हान आरबीआयसमोर आहे.


वर्ष २०२२-२३ मध्ये ५०० रुपयांच्या सुमारे ९१ हजार ११० बनावट नोटा (Fake Currency) पकडण्यात आल्या. वर्ष २०२१-२२ च्या तुलनेत याचे प्रमाण १४.६ टक्क्यांनी जास्त आहे. २०२०-२१ मध्ये ५०० रुपयांच्या ३९,४५३ बनावट नोटा पकडण्यात आल्या. तर २०२१-२२ मध्ये ७६ हजार ६६९ किमतीच्या बनावट नोटा पकडण्यात आल्या.


५०० रुपयांप्रमाणे २००० रुपयांच्या बनावट नोटाही (Fake Currency) आढळल्या आहेत. मात्र, २००० रुपयांच्या बनावट नोटांचे प्रमाण घटले आहे. २०२२-२३ या आर्थिक वर्षात २००० रुपयांच्या बनावट नोटांची संख्या २८ टक्क्यांनी घटून ९ हजार ८०६ नोटांवर आली आहे.


५०० आणि २ हजार रुपयांच्या नोटांशिवाय १००, ५०, २०, १० रुपयांच्या बनावट नोटाही (Fake Currency) पकडण्यात आल्या आहेत.


आरबीआयच्या अहवालानुसार, यावर्षी एकूण २ लाख २५ हजार ७६९ बनावट नोटा (Fake Currency) पकडल्या गेल्या होत्या, तर गेल्या वर्षी २ लाख ३० हजार ९७१ च्या बनावट नोटा सापडल्या होत्या.

Comments
Add Comment

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी 'झोहो' मेल स्वीकारला, 'स्वदेशी' तंत्रज्ञानाला दिला जोर

नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आता ई-मेलसाठी गूगल आणि मायक्रोसॉफ्ट यांसारख्या परदेशी

भारतीय वायु दलाचा ९३वा वर्धापन दिन! हवाई दलाच्या शौर्याचे प्रदर्शन करणारे 'हे' चित्रपट पाहाच

वायु मार्गाद्वारे देशाचे रक्षण करणाऱ्या हवाईदलाचा आज ९३ वा वर्धापन दिन आहे. स्वातंत्र्यापूर्व काळात

मोदी सरकारची रेल्वेच्या २४ हजार ६३४ कोटींच्या प्रकल्पांना मंजुरी, महाराष्ट्राच्या वर्धा - भुसावळ तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेला मंजुरी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहारविषयक केंद्रीय समितीने रेल्वे

बिलासपूरमध्ये भूस्खलनाचा भीषण अपघात; बसवर दरड कोसळल्याने १५ प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू, बचाव कार्य सुरू

बिलासपूर: हिमाचल प्रदेशमधील बिलासपूर

दिवाळी-छटसाठी देशभरात धावणार १२ हजार विशेष गाड्या

नवी दिल्ली  : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीतील निर्णयानुसार यंदा दिवाळी आणि छट यांसारख्या सणांच्या

भारत-ब्रिटनमध्ये 'व्हिजन २०३५' वर निर्णायक चर्चा! PM मोदी 'या' खास पाहुण्याचं करणार स्वागत

ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टारमर यांचा पहिला भारत दौरा; फिनटेक आणि आर्थिक सहकार्यावर लक्ष मुंबई: पंतप्रधान