Fake Currency : २००० वर बंदी, मात्र ५०० रुपयाच्या नोटांनी उडवली आरबीआयची झोप!

मुंबई : २००० रुपयांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) घेतला असला तरी ५०० रुपयाच्या नोटांनी (Fake Currency) मात्र आरबीआयची झोप उडवली आहे.


२००० रुपयांच्या नोटेवर बंदी घालून त्यांच्या परतीची प्रक्रियाही देशातील सर्व बँकांमध्ये सुरू झाली आहे. २००० रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी दिलेली ३० सप्टेंबरची मुदत संपण्यापूर्वीच ५०० रुपयांच्या नोटांशी संबंधित (Fake Currency) मोठी अडचण रिझर्व्ह बँकेसमोर आली आहे.


आरबीआयच्या अहवालानुसार, २ हजाराच्या नव्हे तर ५०० रुपयांच्या बनावट नोटांचे प्रमाण (Fake Currency) मोठ्या प्रमाणावर वाढत चालले आहे. त्यामुळे आता बाजारातून ५०० रुपयांच्या बनावट नोटा चलनातून बाहेर काढण्याचे मोठे आव्हान आरबीआयसमोर आहे.


वर्ष २०२२-२३ मध्ये ५०० रुपयांच्या सुमारे ९१ हजार ११० बनावट नोटा (Fake Currency) पकडण्यात आल्या. वर्ष २०२१-२२ च्या तुलनेत याचे प्रमाण १४.६ टक्क्यांनी जास्त आहे. २०२०-२१ मध्ये ५०० रुपयांच्या ३९,४५३ बनावट नोटा पकडण्यात आल्या. तर २०२१-२२ मध्ये ७६ हजार ६६९ किमतीच्या बनावट नोटा पकडण्यात आल्या.


५०० रुपयांप्रमाणे २००० रुपयांच्या बनावट नोटाही (Fake Currency) आढळल्या आहेत. मात्र, २००० रुपयांच्या बनावट नोटांचे प्रमाण घटले आहे. २०२२-२३ या आर्थिक वर्षात २००० रुपयांच्या बनावट नोटांची संख्या २८ टक्क्यांनी घटून ९ हजार ८०६ नोटांवर आली आहे.


५०० आणि २ हजार रुपयांच्या नोटांशिवाय १००, ५०, २०, १० रुपयांच्या बनावट नोटाही (Fake Currency) पकडण्यात आल्या आहेत.


आरबीआयच्या अहवालानुसार, यावर्षी एकूण २ लाख २५ हजार ७६९ बनावट नोटा (Fake Currency) पकडल्या गेल्या होत्या, तर गेल्या वर्षी २ लाख ३० हजार ९७१ च्या बनावट नोटा सापडल्या होत्या.

Comments
Add Comment

‘तिरुपती’च्या २० कोटी लाडूंसाठी वापरले ‘भेसळयुक्त’ तूप

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): तिरुपती मंदिरात भेसळयुक्त तूप वापरून अंदाजे २० कोटी लाडू तयार करण्यात आले होते.

दिल्ली क्राईम ब्रँचची धडक कारवाई, आयएसआयशी संबंधित ४ आंतरराष्ट्रीय शस्त्र तस्करांना अटक

नवी दिल्ली: दिल्ली गुन्हे शाखेने पाकिस्तानी आयएसआयशी जोडलेल्या आंतरराष्ट्रीय शस्त्र तस्करीच्या टोळीतील चार

कोट्यावधींच्या सायबर फसवणुकीचा दिल्ली पोलिसांकडून पर्दाफाश; गुन्हेगारीचे मुळ उद्ध्वस्त करणाच्या हेतूने कारवाई

मुंबई : दिल्ली पोलिसांनी गेल्या ४८ तासांत मोठ्या प्रमाणावर सायबर गुन्हेगारीविरोधात मोहीम राबवत शेकडो फसवणूक

भारतात नवीन कामगार कायदे लागू, आत्मनिर्भर भारताच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल! काय होणार लाभ, जाणून घ्या सविस्तर

नवी दिल्ली: केंद्रीय श्रममंत्री मनसूख मांडवीय यांनी देशात चार नवीन कामगार कायदे लागू करत असल्याची मोठी घोषणा

नितीश कुमार यांनी २० वर्षांनी गृहमंत्री पद सोडले

१८ मंत्र्यांची खाती जाहीर पाटणा : बिहारच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर नितीश कुमार यांनी दुसऱ्या दिवशी

दिल्ली स्फोटासाठी घरघंटीत बनवली स्फोटके

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या भीषण कार स्फोटाच्या तपासात पोलिसांना मोठा