नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत सहभागासाठी आयसीसी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून हमी घेणार आहे. त्याकरिता आयसीसीचे अधिकारी पाकिस्तानात पोहोचले आहेत.
एकदिवसीय विश्वचषक ५ ऑक्टोबरपासून भारतात होणार आहे. आयसीसी अधिकाऱ्यांचा लाहोर दौरा पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष नजम सेठी यांच्या वक्तव्यानंतर झाला आहे. जर टीम इंडिया आशिया चषकासाठी पाकिस्तानात येणार नसेल, तर पाकिस्तानही विश्वचषकासाठी भारतात जाणार नाही, असे पीसीबी अध्यक्षांनी म्हटले आहे. नजम सेठी यांच्या या वक्तव्यानंतर आयसीसीचे अध्यक्ष ग्रेग बार्कले आणि सीईओ ज्योफ अलर्डिस लाहोरला गेले आहेत आणि त्यांना पीसीबीकडून वर्ल्ड कपमध्ये सहभागी होण्यासाठी लेखी हमी हवी आहे.
विश्वचषकापूर्वी सप्टेंबरमध्ये पाकिस्तानात आशिया चषक स्पर्धा होणार आहे. आशिया चषक स्पर्धेसाठी पाकिस्तानचा दौरा करणार नसल्याचे भारताने आधीच स्पष्ट केले आहे. अशा परिस्थितीत आशिया चषक तटस्थ ठिकाणी किंवा अन्य कुठल्यातरी देशात आयोजित करण्याची चर्चा आहे. मात्र, आशियाई क्रिकेट परिषदेकडून अद्याप कोणतेही स्पष्ट वक्तव्य आलेले नाही.
मुंबई: उन्हाळा आला की तो आपल्यासोबत अनेक आव्हाने घेऊन येतो. घामामुळे आणि तीव्र सूर्यप्रकाशामुळे त्वचेला…
दिवसभर तुमची त्वचा ताजी राहील मुंबई: उन्हाळ्यात आपण आपल्या त्वचेची काळजी घेतली पाहिजे. कारण आता…
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान सागरी तसेच भू सीमा मोठी आहे. भू…
मुंबई : महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असलेल्या आणि जम्मू कश्मीर मध्ये दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यानंतर तिथे अडकलेल्या…
मुंबई(ज्ञानेश सावंत): राजस्थानने सलग चार सामने गमावले आहेत त्यापैकी तीन सामने अगदी थोड्या अंतराने गमावले…
महापालिकेच्या वतीने पाणीपुरवठ्याची कामे हाती घेतली जाणार मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेतर्फे घाटकोपर (पश्चिम) येथे…