लवकरच भविष्यात कळेल....

ठाकरे गटाबाबत देवेंद्र फडणवीस यांनी केलं सुचक वक्तव्य


मुंबई: उबाठा गटाच्या सामना अग्रलेखातून भाजपवर केल्या गेलेल्या टीकेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ठाकरे गटात कमालीची अस्वस्थता असल्याची टीका त्यांनी केली आहे.


सामनाच्या अग्रलेखावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली असता ते म्हणाले की, संपूर्ण ठाकरे गटच अस्वस्थ आहे. तिकडे जेवढी अस्वस्थता आणि असंतुष्टता आहे, ती तीन-चार लोकांमुळे आहे. त्या संदर्भात मी बोलण्याऐवजी तुम्हाला भविष्यात कळेल, असा सूचक टोलाच फडणवीस यांनी लगावला. दुसरीकडे, शिवसेना किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असेल त्यांना माहिती आहे की पोपट मेला आहे. पण त्यांच्या कार्यकर्त्यांना निराश वाटू नये म्हणून अशा प्रकारची वक्तव्ये केली जात आहेत. पण अशा प्रकारच्या वक्तव्यांनी न्यायालयाचा कुठलाही निर्णय बदलत नसतो, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितले.


दरम्यान, ठाकरे गट वेगळा वर्धापन दिन साजरा करणार आहे, यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, प्रत्येक पक्षाला आपला वर्धापन दिन साजरा करण्याचा अधिकार आहे. त्यामुळे त्यांनी ठरवलं असेल. तर त्याबद्दल काय बोलणार, असे फडणवीस म्हणाले.

Comments
Add Comment

वरळीत शिउबाठाची दादागिरी; भाजपच्या कामगार संघटनेचा फलक लावण्यास विरोध

मुंबई : विधानसभा निवडणुकीत वरळीची जागा कशीबशी जिंकलेल्या शिउबाठाला अद्याप राजकीय स्थितीचे भान आलेले दिसत नाही.

पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून आरे कॉलनी व दिंडोशी वन क्षेत्रातील रहिवाश्यांना घरे द्या'

मुंबई : आरेमध्ये तसेच दिंडोशी येथील वन क्षेत्रात गेली अनेक वर्ष वास्तव्य रहिवाशी हि देखील माणसे असून ते मुलभूत

फडणवीस सरकारची ‘विकसित महाराष्ट्र २०४७’च्या दिशेने वाटचाल

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे; महायुती सरकारच्या वर्षपूर्ती निमित्त विशेष संवाद मुंबई : “पंतप्रधान नरेंद्र

डॉ. अविनाश ढाकणे यांनी स्वीकारला महापालिका अतिरिक्त आयुक्त पदाचा कार्यभार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) म्हणून डॉ. अविनाश ढाकणे यांनी

१० टोलनाक्यांवर नवीन टोल प्रणाली सुरू

गडकरी यांची लोकसभेत माहिती मुंबई : देशातील वाहनचालकांना आणि प्रवाशांना मोठी दिलासा देणारी घोषणा केंद्रीय

महावितरणमध्ये एआय तंत्रज्ञानाच्या आधारित डिजीटलायझेशन

तांत्रिक किचकट अडचणी दूर होणार मुंबई : राज्यात सौर ऊर्जेसह नवीनीकृत ऊर्जा स्त्रोतांच्या ‘डिजिटल ट्वीन’