मुंबई: उबाठा गटाच्या सामना अग्रलेखातून भाजपवर केल्या गेलेल्या टीकेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ठाकरे गटात कमालीची अस्वस्थता असल्याची टीका त्यांनी केली आहे.
सामनाच्या अग्रलेखावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली असता ते म्हणाले की, संपूर्ण ठाकरे गटच अस्वस्थ आहे. तिकडे जेवढी अस्वस्थता आणि असंतुष्टता आहे, ती तीन-चार लोकांमुळे आहे. त्या संदर्भात मी बोलण्याऐवजी तुम्हाला भविष्यात कळेल, असा सूचक टोलाच फडणवीस यांनी लगावला. दुसरीकडे, शिवसेना किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असेल त्यांना माहिती आहे की पोपट मेला आहे. पण त्यांच्या कार्यकर्त्यांना निराश वाटू नये म्हणून अशा प्रकारची वक्तव्ये केली जात आहेत. पण अशा प्रकारच्या वक्तव्यांनी न्यायालयाचा कुठलाही निर्णय बदलत नसतो, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितले.
दरम्यान, ठाकरे गट वेगळा वर्धापन दिन साजरा करणार आहे, यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, प्रत्येक पक्षाला आपला वर्धापन दिन साजरा करण्याचा अधिकार आहे. त्यामुळे त्यांनी ठरवलं असेल. तर त्याबद्दल काय बोलणार, असे फडणवीस म्हणाले.
वादळ, हिमनद्या वितळणे, अवकाळी पावसासारख्या वाढल्या आपत्तीच्या घटना ठाणे (प्रशांत सिनकर) : जगभरात २२ एप्रिल…
ऑर्लँडो : अमेरिकेतील ऑर्लँडो आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Orlando International Airport) डेल्टा एअरलाइन्सच्या विमानाला आग लागली. मात्र,…
मुंबई: यंदाच्या वर्षी ३० एप्रिलला अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त आहे. या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले…
मुंबई(ज्ञानेश सावंत): दिल्लीचा संघ सध्या अव्वल तीन संघा मध्ये आहे व पहिल्या फेरीत दिल्लीने लखनऊ…
मुंबई: सध्या सगळीकडेच उष्णतेच्या लाटेने नागरिक त्रस्त आहेत. राज्यातही तापमानाचा पारा दिवसेंदिवस चांगलाच वाढत आहे.…
कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या ठाण्यापर्यंत धावणार रत्नागिरी : मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाटांच्या…