पाच विकेट्स राखत चेन्नईची पाचव्यांदा बाजी

Share

अहमदाबाद : पावसामुळे अडकलेला चेन्नई सुपर किंग्ज व गुजरात टायटन्स या दोन तगड्या संघांमधील आयपीएलचा अंतिम सामना काल नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडला आणि अखेरीस चेन्नईने आयपीएलच्या ट्रॉफीवर आपले नाव कोरले. महाविजेतेपद पटकावत धोनीच्या संघाने आयपीएलमध्ये पाचव्यांदा बाजी मारली आहे.

रविवारी पावसामुळे रद्द झालेला अंतिम सामना सोमवारी वेळेवर सुरू झाला. मात्र दुसऱ्या इनिंगमध्ये पावसाने गोंधळ घातल्याने जवळपास तीन तासांचा खेळ वाया गेला. पंचांनी दोन ते तीन वेळा खेळपट्टीची पाहणी केली. त्यानंतर सामना खेळवण्याचा निर्णय घेतला. डकवर्थ लुईसच्या नियमानुसार चेन्नईला विजयासाठी १५ षटकात १७१ धावांचे नवीन टार्गेट देण्यात आले होते.

शेवटच्या षटकात रवींद्र जडेजाने कमालीची खेळी केली आणि चेन्नईला विजय मिळवून दिला. चेन्नई संघाला विजयासाठी शेवटच्या षटकात १३ धावांची गरज होती. गुजरातकडून शेवटच्या षटकात गोलंदाजीची जबाबदारी मोहित शर्माकडे सोपवण्यात आली होती. मोहितने पहिल्या चेंडूवर एकही धाव दिली नाही. यानंतरच्या तीन चेंडूंवर जडेजाने सलग एक-एक धाव काढली.

शेवटच्या चेंडूवर मात्र दमदार चौकार ठोकत चेन्नईनं अंतिम सामना जिंकला. एमएस धोनीसारख्या शैलीत खेळत त्याने शेवटच्या २ चेंडूत १० धावांची गरज असताना एक षटकार आणि एक चौकार मारून चेन्नई सुपर किंग्जला पाचव्यांदा इंडियन प्रीमियर लीग जेतेपदावर नेले.

Recent Posts

Horoscope: जुलै महिन्यात या ४ राशींचे जीवन होणार सुखकर, होणार हे बदल

मुंबई: जुलै महिन्याला सुरूवात झाली आहे. जुलै २०२४मध्ये ४ मोठे ग्रह शुक्र, बुध, मंगळ आणि…

3 mins ago

Indian Team: टीम इंडियाच्या परतण्याला पुन्हा उशीर, चक्रवाती वादळामुळे सातत्याने येतायत अडचणी

मुंबई: भारतीय क्रिकेट संघ अद्याप बार्बाडोसमध्येच अडकला आहे. टीम इंडियाने बार्डाडोसमध्ये फायनल सामना जिंकत टी-२०…

1 hour ago

आजपासून महाग Jioचे सर्व प्लान, ग्राहकांना द्यावे लागणार इतके पैसे

मुंबई:रिलायन्स जिओचे प्लान आजपासून महाग होत आहेत. आता ग्राहकांना रिचार्ज कऱण्यासाठी आधीपेक्षा १२ ते २५…

2 hours ago

Belly Fat: १५ दिवसांत बाहेर निघालेले पोट होईल कमी, वापरा हे उपाय

मुंबई: पोटापासून अनेक आजार सुरू होतात. यासाठी त्यांच्यावर उपचार करणे गरजेचे असते. जर तुम्हीही पोटाच्या…

3 hours ago

हिंदूंचा अपमान हा विरोधकांचा अजेंडा; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका

नवी दिल्ली : आज मला एका गंभीर विषयाकडे तुमचे आणि देशवासीयांचे लक्ष वेधायचे आहे. काल…

12 hours ago

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’त वयाची मर्यादा ६५ वर्षापर्यंत वाढवली

कागदपत्रांची पुर्तता करण्यासाठी लाभार्थींची कसरत! अर्ज करण्यासाठी आता ३१ ऑगस्टपर्यंत मुदत, दोन अटी केल्या शिथिल…

12 hours ago