पर्यटकांनी बहरले काशिद बीच

मुरूड : मुरूडमधील काशिद बीचवर मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पर्यटकांची अलोट गर्दी उसळलेली पहायला मिळत आहे. रस्त्यावर वाहनांच्या दुतर्फा रांगा तर नांदगाव बाजारपेठेत वाहनांची कोंडी झाली होती. पर्यटकांनी समुद्राच्या पाण्यात मनसोक्त डुंबण्याचा आनंद घेतला.



काशिद-बिच हे मुरूड तालुक्यातील एक रमणीय स्थळ आहे. विस्तीर्ण समुद्र किनारा, भरतीच्या वेळेस फेसाळणारे पाणी, उसळणाऱ्या लाटा, किनाऱ्यावरील शुभ्र वाळू पर्यटकांना आकर्षित करते. पर्यटकांसाठी येथे स्पीडबोट, पॅरेसेलिंगबोट, बनाना, बंफर तसेच घोडा-उंटावरील उपलब्ध आहे. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात येथील स्पिडबोट बंद करण्यात आल्या आहेत. कारण पावसाळा सुरू होण्याआधी समुद्राला उधाण येते. याठिकाणी खाद्यपदार्थंची रेलचेल आहे. याठिकाणी दर शनिवार, रविवार तसेच सुट्टीच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर पर्यटक भेट देतात. रस्त्यावर दुतर्फा वाहनांच्या रांगा लागलेल्या असतात. वेळप्रसंगी ट्रॅफिक जॅमलाही सामोरे जावे लागते.



स्वच्छ सुंदर समुद्रकिनारा!



पांढरी वाळू, निळाशार समुद्रकिनारा, हिरवी पर्वतराजी ही काशीद बीचची वैशिष्ट्ये. दोन टेकड्यांदरम्यानच्या तीन किलोमीटर लांबीच्या या बीचचे पाणी स्वच्छ आहे. पर्यटकांची गजबज असली, तरीही हा समुद्रकिनारा शांत असतो. अलिबागला येणारे जास्तीत जास्त पर्यटक काशीद बीचला भेट देतात. हा बीच गोव्या इतकाच सुंदर आहे. मॉन्सूनव्यतिरिक्तच्या काळात या बीचवर पाचसहा फुटांपर्यंतच्या लाटा उसळतात. पुरेशी सावधगिरी न बाळगता सर्फिंग करू नये. गाईड किंवा स्थानिकांच्या मार्गदर्शनाशिवास सर्फिंगचे धाडस करू नये. पावसाळ्यात येथील समुद्रकिनारा खवळलेला असतो. कोकणातील मासे व इतर पारंपरिक पदार्थांचा घरगुती आस्वाद घेता येतो. मुंबईबरोबरच पुण्यापासूनही तो जवळ आहे. या बीचपासून मुरुड जंजिरा किल्ला जवळच असून तुम्ही त्यालाही भेट देऊ शकता.

Comments
Add Comment

Coronation of Shivaji Maharaj : शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या तयारीला वेग; सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे'

रायगड : दुर्गराज रायगडावर तिथीनुसार २७ जून २०२६ रोजी साजऱ्या होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या तयारीला

Mantri Nitesh Rane : कोकणातील तीर्थस्थळे जलमार्गांनी जोडणार!

मंत्री नितेश राणे यांची संकल्पना; आंगणेवाडी, कुणकेश्वर, गणपतीपुळे, पाली बल्लाळेश्वर मंदिराचा समावेश मुंबई :

Narendra Modi : सिंधुदुर्ग आणि नाशिक जागतिक पर्यटन स्थळे म्हणून विकसित करणार!

नीती आयोगाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी मांडला रोडमॅप; २०४७ पर्यंत ५ ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट

Mumbai-Goa Highway Accident : उभ्या कंटेनरला कारची भीषण धडक; दोन जणांचा जागीच मृत्यू, कुटुंबावर दुःखाचा डोंगर...

पोलादपूर: मुंबई-गोवा महामार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघाताची घटना घडली आहे. पोलादपूरजवळ झालेल्या या अपघातात दोन

Raigad Crime :मुंबईकर मुलीची माणगावमध्ये निर्घृण हत्या, मृतदेह जंगलात फेकला, परिसरात भीतीचं वातावरण

MANGAON : रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात एका १५ वर्षीय मुलीची निर्घृण हत्या करून तिचा मृतदेह जंगलात फेकून

Konkan Railway Alert : मांडवी, तेजस, मत्स्यगंधासह अनेक गाड्यांच्या वेळेत १५ जूनपासून मोठे बदल...

Mumbai-Goa Trains : कोकण रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आली आहे. पावसाळ्याचा विचार