उघड्या मॅनहोलमुळे यंदाही अपघातांचा धोका

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईच्या रस्त्यांवरील उघड्या मॅनहोलचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मुंबई शहर व दोन्ही उपनगरात मलनिस्सारण व पर्जन्य जल वाहिनी विभागाचे मिळून एक लाखांहून अधिक मॅनहोल आहेत. मात्र त्यापैकी ७४ हजार मलनिस्सारण वाहिन्या असलेल्या १,९०० मॅनहोलच्या फ्लडिंग पाईट्सवर, तर शहरातील २५ हजार पर्जन्य वाहिनी असलेल्या तीन हजार मॅनहोलवर संरक्षक जाळ्या बसवण्यात आल्या आहेत. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात उघड्या मॅनहोलचा धोका निर्माण झाला आहे.



डॉ. दीपक अमरापूरकर यांचा ऑगस्ट २०१७ मध्ये परळ येथील उघड्या मॅनहोलमध्ये पडून मृत्यू झाला होता. या दुर्घटनेनंतर मुंबईतील मॅनहोलचा प्रश्न ऐरणीवर आला होता. मुंबईत एक लाखांहून अधिक मॅनहोल असून यात पर्जन्य वाहिनी विभागाच्या अखत्यारीत २५ हजार ६००, तर मलनिस्सारण विभागाच्या अखत्यारीत ७४, ६८२ मॅनहोल आहेत. मलनिस्सारण विभागाच्या अखत्यारीत असलेल्या ७४ हजार मॅनहोलपैकी फ्लडिंग पाईट्सजवळ असलेल्या १९०० मॅनहोलवर संरक्षक जाळ्या बसवण्यात आल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. त्यामुळे अमरापूरकर यांचा २०१७ मध्ये मॅनहोलमध्ये पडून मृत्यू झाला त्याला सहा वर्षे उलटून गेल्यानंतरही एक लाख मॅनहोलपैकी फक्त पाच हजार मॅनहोलवर संरक्षक जाळ्या बसवण्यात आल्या आहेत. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात उघडी मॅनहोल मुंबईकरांसाठी मृत्यूचे दार ठरू शकते.



यंदाच्या पावसाळ्याला काहीच दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे इतक्या मोठ्या संख्येने असलेल्या मॅनहोलना संरक्षण जाळ्या बसवण्याचे आव्हान पालिकेसमोर आहे. या उघड्या मॅनहोलमुळे पावसाळ्यात रस्त्यावरून चालताना नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला असून तातडीने हे काम पूर्ण करावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.




  • एकूण एक लाख मॅनहोल
    पर्जन्य जलवाहिन्या विभाग
    एकूण मॅनहोल - २५ हजार ६००, संरक्षक जाळ्या बसवल्या - ३ हजार

  • मलनिस्सारण विभाग
    शहर - २७,०७८
    पूर्व उपनगर - १५,९८३
    पश्चिम उपनगर - ३१,६२१
    एकूण मॅनहोल - ७४ हजार ६८२, संरक्षक जाळ्या बसवल्या - १,९००

Comments
Add Comment

स्वतंत्र न राहता दोन्ही राष्ट्रवादी आणि समाजवादी पक्ष येणार एकत्र

गट स्थापन करत आपला नेमणार गटनेता, विविध समित्यांमध्ये मिळवणार स्थान मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत

Dahisar Bhayandar Metro 9 Line Railway : दहिसर-भाईंदरकरांची प्रतीक्षा संपली! मेट्रो-९ ला 'ग्रीन सिग्नल', १० स्थानके, १३ किमी मार्गाचा रुट; फेब्रुवारीत धावणार पहिली ट्रेन

मुंबई : मुंबईच्या पश्चिम उपनगरातील प्रवाशांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत

महाराष्ट्र जिल्हा परिषद निवडणुका: मुंबई विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षा पुन्हा एकदा पुढे,कधी आहेत?

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या रणधुळीमध्ये विद्यार्थ्यांच्या परीक्षा ह्या पुढे ढकलण्यात

मुख्यमंत्र्यांनी केली तिसऱ्या मुंबईतील रायगड-पेण ग्रोथ सेंटरची घोषणा; एक लाख कोटींची गुंतवणूक येणार

मुंबई : स्वित्झर्लंडमध्ये वर्ल्ड ईकॉनॉमिक फोरमच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्या

बारावी–दहावी परीक्षेआधी महाराष्ट्र बोर्डाचा निर्णय, नियम, मार्गदर्शन, प्रेरणा सर्व काही यूट्यूब चॅनेलवर

मुंबई : बारावी आणि दहावी परीक्षांच्या आधी, महाराष्ट्र बोर्डाने विद्यार्थी, शाळा आणि परीक्षा केंद्र अधिकाऱ्यांना

टीईटीच्या निकालात यंदा ८.५३ टक्के उमेदवार पात्र

पावणेचार लाख उमेदवारांनी दिली परीक्षा उत्तीर्ण बंधनकारक केल्याने वाढली संख्या मुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या